शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

'एकटीच राहू दे मला' म्हणत एकनाथ महाराज कोणाला देत आहेत निर्वाणीचे संकेत? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 17:52 IST

सामाजिक घडामोडींवर नाथांनी आपल्या भारुडातून वेळोवेळी चपखल भाष्य केले आणि समाजाला सावधतेचा इशाराही दिला!

एकनाथ महाराजांची भारुडे कमी शब्दात मोठा आशय सांगणारी आहेत. मनुष्याच्या वर्मावर बोट ठेवणारी आहेत. म्हणून एवढा काळ लोटूनही ती आजही प्रचलित आहेत. धर्मावर ओरखडा काढणाऱ्या विचारांचे समूळ उच्चाटून नाथ महाराजांनी वेळोवेळी केले. त्यातलेच एक मागणे देवीकडे मागितले- 

सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥ १ ॥सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥ २ ॥सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥ ३ ॥जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर गं तिला ॥ ४ ॥नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे तिला ॥ ५ ॥दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥ ६ ॥एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥ ७ ॥

वरकरणी भारुडातले शब्द प्रापंचिक स्त्रीचे मागणे वाटत असले तरी त्यात फार मोठा गर्भितार्थ दडला आहे. यात त्यांनी वापरलेली नाती ही विकाराचे रूपक सांगणारी आहेत. सासरा म्हणजे अहंकार, देहबुद्धी म्हणजे सासू, वासना म्हणजे जाऊ, आशा-मनीषा ही नणंद, मोह त्यांचा मुलगा, संकल्पाचा भाऊ विकल्प हा नवरा हे सगळे अध्यात्म मार्गाच्या आड येणारे आहेत, म्हणून त्यांना परस्पर खपव आणि मला एकटीलाच राहू दे म्हणजे मला वैराग्य दे असे दान देवीकडे मागितले आहे. 

संसार आणि ऐहिक सुखं ही क्षणभंगुर आहेत. एक ना दिवस ती लोप पावणार आहेत. हे सत्य जितक्या लवकर मनुष्य आत्मसात करतो, तेवढा तो या मोह पाषापासून अलिप्त होतो आणि परमार्थाला लागतो. एकटे राहणे म्हणजे विलग होणे नाही तर आत्मनिर्भर होणे. हा संकेत महाराजांनी वरील भारुडातून दिला आहे. तो आदर्श आपणही डोळ्यापुढे ठेवूया आणि तन, मन, धनाने म्हणूया 'राम कृष्ण हरी!'