शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

'एकटीच राहू दे मला' म्हणत एकनाथ महाराज कोणाला देत आहेत निर्वाणीचे संकेत? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 17:52 IST

सामाजिक घडामोडींवर नाथांनी आपल्या भारुडातून वेळोवेळी चपखल भाष्य केले आणि समाजाला सावधतेचा इशाराही दिला!

एकनाथ महाराजांची भारुडे कमी शब्दात मोठा आशय सांगणारी आहेत. मनुष्याच्या वर्मावर बोट ठेवणारी आहेत. म्हणून एवढा काळ लोटूनही ती आजही प्रचलित आहेत. धर्मावर ओरखडा काढणाऱ्या विचारांचे समूळ उच्चाटून नाथ महाराजांनी वेळोवेळी केले. त्यातलेच एक मागणे देवीकडे मागितले- 

सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥ १ ॥सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥ २ ॥सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥ ३ ॥जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर गं तिला ॥ ४ ॥नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे तिला ॥ ५ ॥दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥ ६ ॥एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥ ७ ॥

वरकरणी भारुडातले शब्द प्रापंचिक स्त्रीचे मागणे वाटत असले तरी त्यात फार मोठा गर्भितार्थ दडला आहे. यात त्यांनी वापरलेली नाती ही विकाराचे रूपक सांगणारी आहेत. सासरा म्हणजे अहंकार, देहबुद्धी म्हणजे सासू, वासना म्हणजे जाऊ, आशा-मनीषा ही नणंद, मोह त्यांचा मुलगा, संकल्पाचा भाऊ विकल्प हा नवरा हे सगळे अध्यात्म मार्गाच्या आड येणारे आहेत, म्हणून त्यांना परस्पर खपव आणि मला एकटीलाच राहू दे म्हणजे मला वैराग्य दे असे दान देवीकडे मागितले आहे. 

संसार आणि ऐहिक सुखं ही क्षणभंगुर आहेत. एक ना दिवस ती लोप पावणार आहेत. हे सत्य जितक्या लवकर मनुष्य आत्मसात करतो, तेवढा तो या मोह पाषापासून अलिप्त होतो आणि परमार्थाला लागतो. एकटे राहणे म्हणजे विलग होणे नाही तर आत्मनिर्भर होणे. हा संकेत महाराजांनी वरील भारुडातून दिला आहे. तो आदर्श आपणही डोळ्यापुढे ठेवूया आणि तन, मन, धनाने म्हणूया 'राम कृष्ण हरी!'