शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गुरुमंत्र लाभलेली व्यक्ती भाग्यवान का म्हटली जाते? गुरुमंत्र मिळाल्यावर नेमके काय करावे? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 16:20 IST

आयुष्यात प्रत्येकाने गुरु केलेच पाहिजेत, गुरुमंत्राचे अनुसरण केले पाहिजे, मात्र गुरुमंत्रच मिळाला नसेल तर काय करायचे? सविस्तर वाचा... 

>> शंतनू ठाकरे 

हिंदू धर्मात गुरुंची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गुरू आणि देवामध्ये प्रथम गुरूची पूजा केली जाते. गुरूच आपल्याला खरा मार्ग दाखवतात. त्यांच्या आशीर्वादानेच जीवनात यश मिळते.

गुरुमंत्र देऊन गुरु आपल्या शिष्याला मायेच्या पसार्‍यातून खेचून वर काढतात. तेवढे गुरुमंत्रात "बळ" असते. "गुरुमंत्र" हा गुरूंच्या संकल्पाच्या रूपात असल्याने आणि एकदा का गुरूंनी "गुरुमंत्र" दिला, म्हणजे त्यांनी आपले पूर्ण दायित्व घेतले, असे असल्याने जीव आपोआपच जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊ लागतो.

मात्र, गुरुमंत्राच्या साहाय्याने उन्नती करवून घेण्याचे क्रियमाणकर्म मात्र त्याने चोख पार पाडले पाहिजे, तरच गुरुमंत्राच्या साहाय्याने तो पुढे निर्गुणाची शिडी चढू शकतो.’ "गुरुमंत्र" केवळ अक्षरच नाही; अपितु ज्ञान, चैतन्य आणि आशीर्वाद देखील आहे. गुरुमंत्रामुळे परमार्थात शीघ्र प्रगती होते. त्या चैतन्ययुक्त गुरुमंत्राला "सबीजमंत्र" किंवा "दिव्यमंत्र" म्हणतात. 

ज्याला "गुरुमंत्र" लाभला, तो भाग्यवान असतो, त्याला फार मोठे वरदान प्राप्त झाले असे समजावे. गुरु आपल्याला आपल्या योग्यतेनुसार "गुरुमंत्र" देतात. आपल्याला त्याची उपासना/साधना या गुरुमंत्राद्वारे करावी लागते. गुरुंनी आपल्याला जो "गुरु मंत्र" दिला असेल तर त्या "गुरुमंत्राचा" आपण दररोज जप केला पाहिजे. जसे आपण शाळेत जातो तेव्हा रोज हजेरी घेतली जाते, तसेच रोज "जप" केल्यास आपली हजेरी "सद्गुरू" दरबारात लागली जाते."गुरु मंत्र" नसेल तर आपल्या ईष्ट दैवत म्हणजेच आपले आवडते दैवत त्यांच्या नामाचा जप करावा. "गुरु मंत्रा" मध्ये जितके अक्षर असतील तितके लाख जप झाल्यास मंत्र सिद्ध होतो, आणि सद्गुरूंच्या मुखातून घेतलेला "मंत्र" हा "सिद्धच" असतो.

"ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला"गुरु हे "ईश्वरी तत्व" आहे, शरीर नाही. सर्व तिर्थ हे गुरुंच्या चरणाजवळ असतात. सारे तीरथ धाम आपके चरणो मे । हे गुरुदेव प्रणाम आपके चरणो मे । 

"सद्गुरुंचे चरण" आपल्या घरास लागले म्हणजे जणु काही सर्व तिर्थच आपल्या अंगणात आले, असं समजावे.....