शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

गुरुमंत्र लाभलेली व्यक्ती भाग्यवान का म्हटली जाते? गुरुमंत्र मिळाल्यावर नेमके काय करावे? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 16:20 IST

आयुष्यात प्रत्येकाने गुरु केलेच पाहिजेत, गुरुमंत्राचे अनुसरण केले पाहिजे, मात्र गुरुमंत्रच मिळाला नसेल तर काय करायचे? सविस्तर वाचा... 

>> शंतनू ठाकरे 

हिंदू धर्मात गुरुंची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गुरू आणि देवामध्ये प्रथम गुरूची पूजा केली जाते. गुरूच आपल्याला खरा मार्ग दाखवतात. त्यांच्या आशीर्वादानेच जीवनात यश मिळते.

गुरुमंत्र देऊन गुरु आपल्या शिष्याला मायेच्या पसार्‍यातून खेचून वर काढतात. तेवढे गुरुमंत्रात "बळ" असते. "गुरुमंत्र" हा गुरूंच्या संकल्पाच्या रूपात असल्याने आणि एकदा का गुरूंनी "गुरुमंत्र" दिला, म्हणजे त्यांनी आपले पूर्ण दायित्व घेतले, असे असल्याने जीव आपोआपच जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊ लागतो.

मात्र, गुरुमंत्राच्या साहाय्याने उन्नती करवून घेण्याचे क्रियमाणकर्म मात्र त्याने चोख पार पाडले पाहिजे, तरच गुरुमंत्राच्या साहाय्याने तो पुढे निर्गुणाची शिडी चढू शकतो.’ "गुरुमंत्र" केवळ अक्षरच नाही; अपितु ज्ञान, चैतन्य आणि आशीर्वाद देखील आहे. गुरुमंत्रामुळे परमार्थात शीघ्र प्रगती होते. त्या चैतन्ययुक्त गुरुमंत्राला "सबीजमंत्र" किंवा "दिव्यमंत्र" म्हणतात. 

ज्याला "गुरुमंत्र" लाभला, तो भाग्यवान असतो, त्याला फार मोठे वरदान प्राप्त झाले असे समजावे. गुरु आपल्याला आपल्या योग्यतेनुसार "गुरुमंत्र" देतात. आपल्याला त्याची उपासना/साधना या गुरुमंत्राद्वारे करावी लागते. गुरुंनी आपल्याला जो "गुरु मंत्र" दिला असेल तर त्या "गुरुमंत्राचा" आपण दररोज जप केला पाहिजे. जसे आपण शाळेत जातो तेव्हा रोज हजेरी घेतली जाते, तसेच रोज "जप" केल्यास आपली हजेरी "सद्गुरू" दरबारात लागली जाते."गुरु मंत्र" नसेल तर आपल्या ईष्ट दैवत म्हणजेच आपले आवडते दैवत त्यांच्या नामाचा जप करावा. "गुरु मंत्रा" मध्ये जितके अक्षर असतील तितके लाख जप झाल्यास मंत्र सिद्ध होतो, आणि सद्गुरूंच्या मुखातून घेतलेला "मंत्र" हा "सिद्धच" असतो.

"ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला"गुरु हे "ईश्वरी तत्व" आहे, शरीर नाही. सर्व तिर्थ हे गुरुंच्या चरणाजवळ असतात. सारे तीरथ धाम आपके चरणो मे । हे गुरुदेव प्रणाम आपके चरणो मे । 

"सद्गुरुंचे चरण" आपल्या घरास लागले म्हणजे जणु काही सर्व तिर्थच आपल्या अंगणात आले, असं समजावे.....