शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रामध्ये गर्भसंस्काराला महत्त्व का दिले आहे? त्यामुळे गर्भावर काय प्रभाव पडतो? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 08:00 IST

गर्भसंस्काराचे महत्त्व पुराणकाळापासून असल्याचे आपल्याला ऐकिवात आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिमन्यू. चक्रव्यूह भेदण्याचे प्रशिक्षण त्याला गर्भातच मिळाले होते. 

आपण सगळेच जण या सृष्टीचा एक भाग आहोत. परंतु, सृष्टीतून सृष्टीनिर्माता होण्याची संधी नियतीने स्त्रिजातीला बहाल केली आहे. गर्भावस्था हे सृष्टीचे, परमात्म्याचे वरदान आहे. एका जीवाला जन्म देणे आणि घडवणे, हे मोठे पुण्याचे काम आहे. मूल जन्माला आल्यानंतर त्यांची जडण घडण करायची आहेच, परंतु हिंदू शास्त्राने द्रष्टेपणाने विचार करून गर्भावस्थेपासून बाळावर संस्कार घालण्याचा आग्रह धरला आहे. कारण बाळाची जडण घडण जन्माला आल्यानंतर नाही, तर गर्भावस्थेपासून सुरू झालेली असते. या विधानाला विज्ञानानेदेखील पुष्टी दिलेली आहे.

सद्यस्थितीतील तरुणांना पाहता, संस्कारांचे पतन होताना दिसते. वयात आल्यानंतर मुलांना वळण लावणे कठीण जाते, कारण ते काहीही ऐकण्याच्या, समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. म्हणून ओल्या मातीला वळण दिले पाहिजे. ही ओली माती गर्भात असल्याच्या स्थितीपासून तयार होते. मनुष्याच्या मूळ स्वभावाला संस्काराचे वळण नियंत्रित करू शकते. 

आपण पाहतो, काही मुले अतिशय शांत असतात, तर काही मस्तीखोर, तर काही आक्रस्ताळी असतात. हा केवळ स्वभावाचा भाग नसून संस्कारांचाही भाग असतो. मुले आपल्या अवतीभोवती जे पाहतात, त्याचे अनुकरण करतात. वाईट गोष्टी पटकन शिकतात. गर्भात असल्यापासून मातेच्या माध्यमातून त्यांच्यावर बाह्य परिस्थितीचाही परिणाम होत असतो. म्हणून गर्भवती स्त्रियांना सतत आनंदी ठेवण्याचा कुटुंबाचा प्रयत्न असतो. मातासुद्धा आपल्या शिशुसाठी सर्व वेदना सहन करून चांगल्या गोष्टी अर्भकापर्यंत पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करत असते.

गर्भसंस्काराचे महत्त्व पुराणकाळापासून असल्याचे आपल्याला ऐकिवात आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिमन्यू. चक्रव्यूह भेदण्याचे प्रशिक्षण त्याला गर्भातच मिळाले होते. 

गर्भसंस्कारासाठी विशेष काही कष्ट घ्यावे लागतात का?

तर नाही. मात्र, गर्भ संस्कार विज्ञान नीट समजून घेतले पाहिजे. अलीकडे गर्भ संस्काराच्या नावावर उथळ माहिती देणारे क्लासेस लोकांकडून पैसे उकळतात. परंतु, गर्भ संस्कार विज्ञानामागे वेदांचा मोठा अभ्यास आहे. अनेक तज्ज्ञ वर्षानुवर्षे त्याचा अभ्यास आणि संशोधन करत आहेत. मन, बुद्धी, संस्कार यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या मंत्रांचा त्यात समावेश असतो. शांत चित्ताने ते मंत्र केवळ ऐकायचे असतात. गर्भ संस्कारात ८० टक्के भाग हा केवळ ऐकण्यावर अवलंबून असतो. त्या संस्कारांचा बाळांवर सकारात्मक परिणाम होतो. भविष्यात त्यांची प्रगतीही दिसून येते. यासाठी योग्य गर्भसंस्कार वर्गांची निवड केली पाहिजे. केवळ नावावर, भूलथापांवर विश्वास ठेवून पैशांचा आणि वेळेचा व्यय न करता याबाबत ज्येष्ठांकडून अधिक माहिती घ्यावी व गर्भधारणेची बातमी कळल्यापासून गर्भ संस्कार सुरू करावेत.

गर्भवती होणे हे स्त्रिसाठी वरदान आहे, तर आई होऊन बाळावर संस्कार करणे हे बाळासाठी आणि समाजासाठी मोठे वरदान आहे. प्रत्येक आईसाठी आपले बाळ ही भविष्यातील मोठी गुंतवणूक आहे. उद्या कोणी तुमच्या सोबत असो न असो, बाळ तुमची साथ कधीच सोडणार नाही. त्याला कारणीभूत, जगाआधी ९ महिने जास्त केलेले गर्भसंस्कार असणार आहेत.