शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रामध्ये गर्भसंस्काराला महत्त्व का दिले आहे? त्यामुळे गर्भावर काय प्रभाव पडतो? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 08:00 IST

गर्भसंस्काराचे महत्त्व पुराणकाळापासून असल्याचे आपल्याला ऐकिवात आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिमन्यू. चक्रव्यूह भेदण्याचे प्रशिक्षण त्याला गर्भातच मिळाले होते. 

आपण सगळेच जण या सृष्टीचा एक भाग आहोत. परंतु, सृष्टीतून सृष्टीनिर्माता होण्याची संधी नियतीने स्त्रिजातीला बहाल केली आहे. गर्भावस्था हे सृष्टीचे, परमात्म्याचे वरदान आहे. एका जीवाला जन्म देणे आणि घडवणे, हे मोठे पुण्याचे काम आहे. मूल जन्माला आल्यानंतर त्यांची जडण घडण करायची आहेच, परंतु हिंदू शास्त्राने द्रष्टेपणाने विचार करून गर्भावस्थेपासून बाळावर संस्कार घालण्याचा आग्रह धरला आहे. कारण बाळाची जडण घडण जन्माला आल्यानंतर नाही, तर गर्भावस्थेपासून सुरू झालेली असते. या विधानाला विज्ञानानेदेखील पुष्टी दिलेली आहे.

सद्यस्थितीतील तरुणांना पाहता, संस्कारांचे पतन होताना दिसते. वयात आल्यानंतर मुलांना वळण लावणे कठीण जाते, कारण ते काहीही ऐकण्याच्या, समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. म्हणून ओल्या मातीला वळण दिले पाहिजे. ही ओली माती गर्भात असल्याच्या स्थितीपासून तयार होते. मनुष्याच्या मूळ स्वभावाला संस्काराचे वळण नियंत्रित करू शकते. 

आपण पाहतो, काही मुले अतिशय शांत असतात, तर काही मस्तीखोर, तर काही आक्रस्ताळी असतात. हा केवळ स्वभावाचा भाग नसून संस्कारांचाही भाग असतो. मुले आपल्या अवतीभोवती जे पाहतात, त्याचे अनुकरण करतात. वाईट गोष्टी पटकन शिकतात. गर्भात असल्यापासून मातेच्या माध्यमातून त्यांच्यावर बाह्य परिस्थितीचाही परिणाम होत असतो. म्हणून गर्भवती स्त्रियांना सतत आनंदी ठेवण्याचा कुटुंबाचा प्रयत्न असतो. मातासुद्धा आपल्या शिशुसाठी सर्व वेदना सहन करून चांगल्या गोष्टी अर्भकापर्यंत पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करत असते.

गर्भसंस्काराचे महत्त्व पुराणकाळापासून असल्याचे आपल्याला ऐकिवात आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिमन्यू. चक्रव्यूह भेदण्याचे प्रशिक्षण त्याला गर्भातच मिळाले होते. 

गर्भसंस्कारासाठी विशेष काही कष्ट घ्यावे लागतात का?

तर नाही. मात्र, गर्भ संस्कार विज्ञान नीट समजून घेतले पाहिजे. अलीकडे गर्भ संस्काराच्या नावावर उथळ माहिती देणारे क्लासेस लोकांकडून पैसे उकळतात. परंतु, गर्भ संस्कार विज्ञानामागे वेदांचा मोठा अभ्यास आहे. अनेक तज्ज्ञ वर्षानुवर्षे त्याचा अभ्यास आणि संशोधन करत आहेत. मन, बुद्धी, संस्कार यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या मंत्रांचा त्यात समावेश असतो. शांत चित्ताने ते मंत्र केवळ ऐकायचे असतात. गर्भ संस्कारात ८० टक्के भाग हा केवळ ऐकण्यावर अवलंबून असतो. त्या संस्कारांचा बाळांवर सकारात्मक परिणाम होतो. भविष्यात त्यांची प्रगतीही दिसून येते. यासाठी योग्य गर्भसंस्कार वर्गांची निवड केली पाहिजे. केवळ नावावर, भूलथापांवर विश्वास ठेवून पैशांचा आणि वेळेचा व्यय न करता याबाबत ज्येष्ठांकडून अधिक माहिती घ्यावी व गर्भधारणेची बातमी कळल्यापासून गर्भ संस्कार सुरू करावेत.

गर्भवती होणे हे स्त्रिसाठी वरदान आहे, तर आई होऊन बाळावर संस्कार करणे हे बाळासाठी आणि समाजासाठी मोठे वरदान आहे. प्रत्येक आईसाठी आपले बाळ ही भविष्यातील मोठी गुंतवणूक आहे. उद्या कोणी तुमच्या सोबत असो न असो, बाळ तुमची साथ कधीच सोडणार नाही. त्याला कारणीभूत, जगाआधी ९ महिने जास्त केलेले गर्भसंस्कार असणार आहेत.