शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

माझ्याबाबतीतच सगळं वाईट का घडतंय? असे वाटेल तेव्हा 'हे' उदाहरण कायम लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 15:42 IST

कठीण परिस्थिती आपल्याला कमकुवत नाही तर कणखर बनवत असते. स्वतःला घडवत राहा. म्हणजे 'या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीतच वाईट का घडल्या' या प्रश्नांची भविष्यात उकल होईल!

आपल्यापैकी प्रत्येकाला, आयुष्यात वाईट घटना घडू लागतात, तेव्हा हे माझ्याच बाबतीत का घडत आहे, असा प्रश्न पडतो. त्याचवेळेस दुसऱ्यांचे आयुष्य अगदी सुरळीत सुरु आहे असे वाटत असते. दरवेळी आपल्याला आपण केलेल्या चुकांचीच शिक्षा मिळते असे नाही, तर कधी कधी न केलेल्या चुकांचीही शिक्षा आपल्याला भोगावी लागते. परिस्थिती आपल्या हातात असते असे नाही. अशा वेळी हातून निसटून गेलेल्या गोष्टीचा शोक करण्यापेक्षा पुढे काय करता येईल, याचा विचार केला पाहिजे. 

परंतु आपण जुन्या गोष्टी उगाळून दुःख कुरवाळत बसतो. दुःख प्रत्येकाला आहे. कारणं वेगवेगळी असतील. परंतु पूर्ण सुखी कोणीच नाही. म्हणून जेव्हा परिस्थिती आपल्या हातात नसते अशा वेळी शांत राहा. धीर धरा. वेळ जाऊ द्या. हळू हळू चित्र बदलेल. निश्चित बदलेल. जेव्हा आपल्याला वाटते, की आता सगळे काही हातातून निसटून जात आहे, अशा वेळी लक्षात ठेवा, 'परमेश्वर जेव्हा एखादी गोष्ट हिरावून आपली ओंजळ रिकामी करतो, तेव्हा त्याच ओंजळीत तो आणखी काहीतरी चांगले देण्याची तजवीज करत असतो!'

परिस्थिती बिघडत आहे, चित्र विस्कटत आहे, काहीच चांगले घडत नाहीये असे वाटत असताना आपण परिस्थितीची एक बाजू पाहत आहोत हे ध्यानात ठेवा. ज्याप्रमाणे भरत काम सुरु असताना कापडाच्या एका बाजूला रंगीबेरंगी दोऱ्यांचा गुंता दिसत असतो, त्याच वेळेस कापडाच्या विरुद्ध बाजूला सुंदर नक्षीकाम आकार घेत असते. सुंदर नक्षीकाम घडत असताना त्यालाही गुंतलेल्या दोऱ्यांची पार्श्वभूमी असतेच. 

त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात गुंता झालेला असताना भविष्याची सुंदर नक्षी आकार घेत असू शकेल, यावर विश्वास ठेवा. स्वतःच्या कर्तृत्त्वावर विश्वास ठेवा. कठीण परिस्थिती आपल्याला कमकुवत नाही तर कणखर बनवत असते. स्वतःला घडवत राहा. म्हणजे 'या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीतच वाईट का घडल्या' या प्रश्नांची भविष्यात उकल होईल!