शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मार्गशीर्षात दत्त जयंतीच्या उत्सवाइतकेच दत्त उपासनेलाही एवढे महत्त्व का? ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 07:00 IST

आयुष्यात केवळ भोग नाही तर त्याग, वैराग्य या गोष्टीही अंगी बाणून घेणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी ही दत्त उपासना मार्गशीर्षातच का? ते जाणून घ्या!

हिंदू पंचागानुसार चैत्र, वैशाखादी मासगणनेतील `मार्गशीर्ष' हा नववा महिना. ह्याच्या पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले.  गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी `मासानां मार्गशीर्षोऽहम' म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. १३ डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. त्यानिमित्त ही सविस्तर माहिती...  

बहुत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकर:।

गायनात बृहत्साम योग्य श्रुती, छंदांमध्ये गायत्री छंद, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि ऋतुंमध्ये वसंत ऋतू श्रेष्ठ आहे, असे वरील श्लोकात म्हटले आहे. त्यानुसार या महिन्यात गंगास्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे, तसेच दान-धर्म करून पुण्यसंचय करावा, असे म्हटले जाते. 

इतर नक्षत्रांप्रमाणे मृृगशीर्ष नक्षत्रालादेखील अग्रहायणी म्हणजेच वर्षारंभीचे नक्षत्र म्हटले आहे. मृगादि नक्षत्रगणना जेव्हा प्रचारात होती, तेव्हा  मृग नक्षत्राला अग्रस्थान मिळाले. त्यावरून मार्गशीर्ष महिन्यालाही पुढे श्रेष्ठत्व आले असतावे, हा विचार लोकमान्य टिळकांनी आरोयन या ग्रंथातून मांडला आहे. 

आपल्याकडे बारा महिन्यांच्या एकेक अधिदेवता आहेत. पैकी मार्गशीर्ष महिन्याची अधिदेवता केशव आहे. हेमंत आणि शिशिर ऋतूंमध्ये करावयाच्या अनरक ह्या ऋतुव्रताचा प्रारंभ मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला करतात. रोज केशवाची पूजा आणि त्याच्या ह्याच नावाचा १०८ वेळा मंत्रजप असा व्रताचा विधी आहे. याखेरीजही मार्गशीर्ष महिन्यात अनेक व्रतांचा सुकाळ असतो. एक दोन नाही, तर तब्बल नव्वदाहून अधिक व्रत वैकल्ये मार्गशीर्ष महिन्यात असतात. यथाशक्ती ही व्रत-वैकल्ये करून आपली आध्यात्मिक बैठक पक्की करणे, हाच त्यामागील मुख्य हेतू असतो. 

मार्गशीर्षाच्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत भक्तीभावाने केले जाते. आयुष्यात सुख, समाधान हवे आणि संयम बाळगता यावा, म्हणून हे व्रत केले जाते.  मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीचा उत्सव हे मुख्य आकर्षण असते. त्यानिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. दत्तबावनी म्हटली जाते. याशिवाय याच महिन्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगायला सुरुवात केली होती. विश्वाला मार्गदर्शन करणारा हा तत्त्वज्ञानरूपी ग्रंथ या मासात सुरु झाला, ती तिथीदेखील गीता जयंती म्हणून साजरी केली जाते. म्हणून या महिन्यात भगवद्गीता वाचन, विष्णुसहस्रनाम पठण, गजेन्द्रमोक्ष वाचन जरूर करावे. ओम केशवाय नम:, ओम दामोदराय नम: या मंत्रांचा जप करावा.    

भक्तीभावाला, परमार्थाला, आत्मचिंतनाला पुरक असा हा महिना असल्यामुळे या मासात शक्यतो अपेयपाय, अभक्ष्यभक्षण केले जात नाही. एवढेच काय, तर कांदा-लसूणही खाल्ले जात नाही. या सर्व गोष्टींमुळे मन चंचल होते, ब्रह्मचर्य ढळते आणि प्रभुकार्यात अडथळे येतात, म्हणून शास्त्राने त्यावर बंधन घातले आहे.  

त्यामुळे आपणही मनाने व शरीराने पथ्य पाळून प्रभूकार्यात मन गुंतवावे आणि या मासाचे स्वामी विष्णू तथा दत्त गुरु यांना प्रार्थना करावी-

शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता!तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हितकर्ता,तू आत्मस्वजन, भ्राता, सर्वथा तूची त्राता,भयकर्ता तू भयहर्ता दंडधर्ता तू परिपाता,तुजवाचुनि न दुजी वार्ता, तू आर्ता आश्रयदत्ता।