शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एकाकी पडलेल्या माणसाला पाहून 'याला कुणी वाली नाही' असं का म्हणतात? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 10:46 IST

आयुष्यात महाभारत सुरू झाल्याशिवाय आपण रामायणात डोकावत नाही हेच खरं!

बोलीभाषेत अनेक शब्द आपण सहज वापरतो, ते त्याठिकाणी अचूक बसतातही; मात्र त्या शब्दांचा, वाक्प्रचारांचा अर्थ समजत असला तरी दर वेळी आपल्याला संदर्भ माहीत असतोच असे नाही. तसाच एक परवलीचा वाक्प्रचार म्हणजे 'याला कोणी वाली नाही!' याचा संदर्भ शोधायचा तर आपल्याला रामायणात डोकवावे लागेल. 

वाली हे नाव वाचताच रामायणाशी असलेले कनेक्शन तुमच्याही लक्षात आले असेलच. परंतु रावणाइतके बलाढ्य सैन्य असून सुद्धा तो एकाकी का पडला? आणि त्याच्यावरून एकटे पडण्याच्या संकल्पनेला मूर्त रूप कसे आले ते जाणून घेऊया. 

वाली किश्किंधाचा वानर राजा होता आणि सुग्रीव त्याचा भाऊ. तारा ही वालीची पत्नी होती. जेव्हा वाली एका दैत्याशी लढण्यासाठी गुहेत गेला तेव्हा त्याने सुग्रीवाला सांगितले की जर मी मारला गेलो आणि बाहेर येऊ शकलो नाही तर त्या दैत्याला या गुहेत बंद करून टाक. बराच काळ लोटला तरी वाली बाहेर आला नाही, आणि गुहेतून रक्त वहात बाहेर आले. सुग्रीवाला वाटले की आपला बंधू मारला गेला आणि हे त्याचेच रक्त आहे. अत्यंत दुःखी होऊन त्याने एका भल्या मोठ्या दगडाने गुहेचे तोंड बंद करून टाकले आणि तो तिथून निघून गेला. परंतु वाली प्रत्यक्षात जिंकला होता. 

वालीच्या पश्च्यात सुग्रीवाने राज्याची सूत्रं हाती घेतली आणि तो प्रामाणिकपणे राज्यकारभार करू लागला. वाली जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याने पहिले की त्याच्या जागी त्याचा भाऊ सुग्रीव राज्य करत आहे. त्याला वाटले की राज्य प्राप्तीसाठी सुग्रीवाने आपल्याला धोका दिला आणि गुहेत बंद केले. त्याने सुग्रीवाचे कोणतेही म्हणणे ऐकले नाही. त्याला पदावरून काढले आणि सत्ता आपल्या हाती घेतली. एवढेच नाही तर सुग्रीवाची बायको बळकावली आणि त्याला युद्धासाठी आव्हान दिले. तेव्हा सुग्रीवाने प्रभू श्रीरामांकडे मदत मागितली. श्रीराम आणि सुग्रीव यांच्यात तह झाला. सुग्रीवाचे राज्य आणि पत्नी परत मिळवण्यासाठी श्रीरामांनी सहकार्य करायचे तर श्रीरामांची पत्नी रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी सुग्रीवाने श्रीरामांना मदत करायची. 

ठरल्यानुसार सुग्रीवाने वालीला युद्धासाठी आव्हान केले. श्रीरामांनी छुपा पाठिंबा दर्शवून वालीचा वध करायचा असे ठरले. युद्धाचा दिवस निश्चित झाला. वाली आणि सुग्रीवाचे तुंबळ युद्ध सुरू झाले. मात्र ते दोघे भाऊ एवढे सारखे दिसत होते की त्यांच्यातला वाली कोण आणि सुग्रीव कोण हे ओळखताना श्रीरामांचा गोंधळ होत होता. त्यांची ही दुविधा पाहून हनुमानाने पटकन तुळशीची माळ गुंफली आणि सुग्रीवाच्या गळ्यात टाकून आला. परत येऊन श्रीरामांना म्हणाला, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ तो तुमचा! याचाच अर्थ जो श्रीरामांचा नाही त्याला कोणी वाली नाही! 

अशा रीतीने जो भगवंताच्या कृपेस पात्र नाही ती एकाकी पडलेली व्यक्ती वालीसारखी कमनशिबी मानली जाते आणि अशा व्यक्तीला कोणी वाली नाही असे संबोधले जाते!

टॅग्स :ramayanरामायण