शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मंदिरात जाण्याआधी मंदिराच्या पायरीला नमस्कार का करतात? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 15:03 IST

मंदिराच्या पायरीकडून गाभाऱ्याच्या मूर्तीकडे नेणारा प्रवास निर्गुणाकडून सगुणाकडे आणि परत सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा आहे. 

आपण मंदिरात जातो. चपला बाहेर काढतो. पाय धुतो आणि स्वच्छ देहाने आणि स्वच्छ मनाने मंदिरात पाऊल ठेवतो. तसे करताना आपला हात आपोआप मंदिराच्या पायरीला स्पर्श करतो. त्यामागे कारण काय असू शकेल याचा कधी विचार केला आहे का? नाही केला, तर आज त्यावर थोडेसे चिंतन करू.

मंदिरात जाताना मंदिराची पायरी ही देवाकडे नेणारा दुवा असते. ती ओलांडून गेल्याशिवाय गाभाऱ्यातली देवमूर्ती आपल्याला दिसणार नाही. तिथेच कोणी रोखून धरले, तर देवदर्शन घडणार कसे? म्हणून त्या पायरीचे महत्त्व अधिक आहे. परंतु गंमत अशी, की ज्या पायरीला नमस्कार करून आपण मंदिरात जातो, त्या पायरीचा आपल्याला मंदिरातून निघताना विसर पडतो. देवाचे दर्शन झाले की त्या पायरीला ओलांडून पायात चपला अडकवून आपण परत जायला निघतो. म्हणजेच काम झाले की आपण तिला विसरतो आणि तसे घडणे स्वाभाविक आहे. नव्हे तर तो मनुष्यस्वभाव आहे. तसे होऊनही पायरी राग व्यक्त करत नाही तर आपण भक्त आणि भगवंताला जोडणारा दुवा बनू शकलो, याबद्दल समाधान मानते. 

संत सांगतात, आपला देह हादेखील मंदिराचे प्रतिक आहे. देह हे देखील देवाकडे नेणारे द्वार आहे. आचार्य अत्रे तर लिहितात, `देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर!' म्हणजेच जशी मंदिराची पायरी ओलांडून गेल्याशिवाय गाभाऱ्यातला देव दिसत नाही, तशी देहाची पायरी ओलांडल्याशिवाय हृदयस्थ परमेश्वर दिसत नाही. एकदा का त्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि अंतर्यामी सूर गवसला, की परत देहाच्या दिशेने उलट प्रवास होणार नाही. 

ज्याप्रमाणे देवदर्शन झाल्यावर पायरीला नमस्कार करण्याचे भान उरत नाही, तसे देहाचा सदुपयोग करून आत्मारामाची भेट घेतली, की देहासक्ती राहत नाही. यासाठीच देहाला मंदिराच्या पायरीइतके महत्त्व द्या. मंदिरात जाताना जसे आपण पायरीशी रेंगाळत नाही, तर नमस्कार करून आत जातो, तसे देहात न रमता आत्मरामाकडे वाटचाल करा. स्वत:ची स्वत:शी ओळख करून घ्या. अंतरीचा आवाज ऐका. देहाला मंदिरासारखे पवित्र, कपटरहित स्वच्छ, निर्मळ ठेवा. म्हणजे गाभाऱ्यातला देव दिसल्यावाचून राहणार नाही.  

मंदिराच्या पायरीकडून गाभाऱ्याच्या मूर्तीकडे नेणारा प्रवास निर्गुणाकडून सगुणाकडे आणि परत सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा आहे.