शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात गेल्यावर आधी घंटानाद करून मगच देवाला नमस्कार का करतात? वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 09:31 IST

मंदिरातल्या सकारात्मक लहरींचा मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि नवीन ऊर्जा प्राप्त होऊन सकारात्मक विचारांनी दैनंदिन कामाची आनंदात सुरुवात होते.

रोज सकाळी स्नान करून मंदिरात देवदर्शनाला जावे, असा आपल्या हिंदू संस्कृतीचा संस्कार आहे. रोज सकाळी मंदिरात जाणे शुभकारक असते. ही वेळ शांततेची असते. सभोवतालचे वातावरण प्रसन्न असते. पवित्र असते. अशा मंगलसमयी मंगलदर्शनाने दिवसाची सुरुवात केली असता दिवस छान जातो. म्हणून रोज सकाळी मंदिरात जाण्याचा शिरस्ता ठेवावा.

मंदिरात जाताना चपला बाहेर काढून, पाय धुवून मगच मंदिरात प्रवेश करावा. मंदिराच्या पायरीला नमस्कार करून मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम घंटानाद करावा. हा घंटानाद कशासाठी व कोणासाठी? घंटानाद देवाला प्रिय आहे. तो कानावर पडला असता देवाला जाग येऊन दर्शनार्थ आलेल्या भक्ताकडे त्याची दृष्टी जाते. या दृष्टीच्या तेजामुळे दृष्ट प्रवृत्ती नष्ट होते. आगमनार्थं तु देवानां गमनाथरं तु राक्षसाम् ।कुर्वे घण्टारवं ततर देवताहृान लक्षणम् ।।

अनग्राहक देवांच्या आनगमासाठी व प्रतिबंधक राक्षसांच्या निर्गमनासाठी घंटानाद करावा. हे देवतांच्या आवाहनाचे उपलक्षण आहे. घंटानाद एकदाच करावा. कर्णकर्कश घंटानाद करून मंदिरातील शांततेचा भंग करू नये. घंटानाद करून देवाची पूजा केली असता भक्ताच्या रक्षणाची जबाबदारी भगवंत घेतो अशी भक्तांची श्रद्धा असते.

घंटानाद झाल्यावर देवाला दोन्ही हात जोडून मस्तक नत करून म्हणजेच झुकवुन नमस्कार करावा. नमस्कार तीन प्रकारे केला जातो. कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे जेव्हा आपण देवासमोर साष्टांग नमस्कार घालतो, तेव्हा आपल्या देहाचे आठ अवयव जमीनिला लागतात, त्याला अष्टांग नमस्कार म्हणतात. तसा नमस्कार किंवा गुडघ्यावर बसून माथा देवाच्या चरणांवर अथवा देवासमोर नतमस्तक करणे हा कायिक नमस्कार झाला. वाचेने देवाचे नामस्मरण करणे, जप जाप्य करणे, मंत्र म्हणणे, स्तोत्र म्हणणे याला वाचिक नमस्कार म्हणतात. मंदिराबाहेरून जाताना किंवा मनातल्या मनात देवाला स्मरून कार्यारंभ करताना जो नमस्कार केला जातो त्याला मानसिक नमस्कार म्हणतात. परंतु मंदिरात गेल्यावर शक्यतो कायिक नमस्कार करावा. 

जो देव आपल्या आवडीचा असतो, त्याची प्रार्थना करावी. आपल्या आवडत्या दैवताचा श्लोक म्हणावा, मंत्र म्हणावा, जपाची माळ ओढावी. देवाचे दर्शन घेऊन, प्रदक्षिणा घालून काही क्षण मंदिराच्या सभागृहात शांतचित्ताने बसावे. मंदिरातल्या सकारात्मक लहरींचा मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि नवीन ऊर्जा प्राप्त होऊन सकारात्मक विचारांनी दैनंदिन कामाची आनंदात सुरुवात होते. देवदर्शन हे देवासाठी नसून आपल्यासाठी लाभदायक असते, हा विचार कायम ध्यानात ठेवावा.