शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नियोजित वर-वधू साखरपुड्याची अंगठी अनामिकेतच का घालतात? वाचा 'हे' कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 14:10 IST

अकारण केलेल्या गोष्टी लोप पावतात तर तर्कशुद्ध असलेल्या गोष्टी काळानुकाळ निभावल्या जातात, अनामिकेत अंगठी घालण्यामागेही आहे कारण!

आपण ज्या रीतीभाती पाळतो त्याला कधी शास्त्राधार असतो तर कधी तर्कशुद्ध कारण! कोणतीही गोष्ट अकारण केली जात नाही आणि जी केली जाते ती दीर्घकाळ टिकत नाही. हिंदू धर्मातील प्रथा परंपरांनाही शास्त्राधार आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे त्याचे पालन होत आहे. मात्र काही जण ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, अभ्यास करत नाहीत आणि प्रथा परंपरांना थोतांड संबोधून मोकळे होतात. कारण अभ्यास करण्याच्या तुलनेत नावं ठेवणं केव्हाही सोपं. मात्र ज्याला खरंच जिज्ञासा असते, अशी व्यक्ती प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधते आणि मग ती आचरणात आणते. 

वाङ्निश्चय अर्थात साखरपुडा करताना नियोजित वर वधू एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात. अंगठीसाठी हेच बोट का? असे म्हणतात की अनामिकेतून जाणारी रक्तवाहिनी थेट हृदयाकडे जाते. ही केवळ भारतीय समजूत नाही तर इजिप्तमध्ये ही समजूत ६००० वर्षे जुनी आहे. 

याव्यतिरिक्त आणखी एक प्रयोगात असे सांगितले जाते, दोन्ही हाताची बोटे परस्पर जोडली असता, मधले बोट दुमडले आणि एक एक बोट विलग केले तर लक्षात येते की अंगठ्यापासून बाजूचे आणि करंगळीपर्यंतचे बोट विलग होते पण मधले बोट दुमडले असताना अनामिका विलग होत नाही. यावरून असे म्हटले जाते की आयुष्यात आलेली सगळी नाती काही ना काही कारणाने विलग होतात मात्र नवरा बायको हे नाते आयुष्याच्या अखेर पर्यंत टिकून राहते. म्हणून अनामिका हे नवरा बायकोच्या जोडीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच अनामिकेत अंगठी घातली जाते.