शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नियोजित वर-वधू साखरपुड्याची अंगठी अनामिकेतच का घालतात? वाचा 'हे' कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 14:10 IST

अकारण केलेल्या गोष्टी लोप पावतात तर तर्कशुद्ध असलेल्या गोष्टी काळानुकाळ निभावल्या जातात, अनामिकेत अंगठी घालण्यामागेही आहे कारण!

आपण ज्या रीतीभाती पाळतो त्याला कधी शास्त्राधार असतो तर कधी तर्कशुद्ध कारण! कोणतीही गोष्ट अकारण केली जात नाही आणि जी केली जाते ती दीर्घकाळ टिकत नाही. हिंदू धर्मातील प्रथा परंपरांनाही शास्त्राधार आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे त्याचे पालन होत आहे. मात्र काही जण ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, अभ्यास करत नाहीत आणि प्रथा परंपरांना थोतांड संबोधून मोकळे होतात. कारण अभ्यास करण्याच्या तुलनेत नावं ठेवणं केव्हाही सोपं. मात्र ज्याला खरंच जिज्ञासा असते, अशी व्यक्ती प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधते आणि मग ती आचरणात आणते. 

वाङ्निश्चय अर्थात साखरपुडा करताना नियोजित वर वधू एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात. अंगठीसाठी हेच बोट का? असे म्हणतात की अनामिकेतून जाणारी रक्तवाहिनी थेट हृदयाकडे जाते. ही केवळ भारतीय समजूत नाही तर इजिप्तमध्ये ही समजूत ६००० वर्षे जुनी आहे. 

याव्यतिरिक्त आणखी एक प्रयोगात असे सांगितले जाते, दोन्ही हाताची बोटे परस्पर जोडली असता, मधले बोट दुमडले आणि एक एक बोट विलग केले तर लक्षात येते की अंगठ्यापासून बाजूचे आणि करंगळीपर्यंतचे बोट विलग होते पण मधले बोट दुमडले असताना अनामिका विलग होत नाही. यावरून असे म्हटले जाते की आयुष्यात आलेली सगळी नाती काही ना काही कारणाने विलग होतात मात्र नवरा बायको हे नाते आयुष्याच्या अखेर पर्यंत टिकून राहते. म्हणून अनामिका हे नवरा बायकोच्या जोडीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच अनामिकेत अंगठी घातली जाते.