शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

नियोजित वर-वधू साखरपुड्याची अंगठी अनामिकेतच का घालतात? वाचा 'हे' कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 14:10 IST

अकारण केलेल्या गोष्टी लोप पावतात तर तर्कशुद्ध असलेल्या गोष्टी काळानुकाळ निभावल्या जातात, अनामिकेत अंगठी घालण्यामागेही आहे कारण!

आपण ज्या रीतीभाती पाळतो त्याला कधी शास्त्राधार असतो तर कधी तर्कशुद्ध कारण! कोणतीही गोष्ट अकारण केली जात नाही आणि जी केली जाते ती दीर्घकाळ टिकत नाही. हिंदू धर्मातील प्रथा परंपरांनाही शास्त्राधार आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे त्याचे पालन होत आहे. मात्र काही जण ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, अभ्यास करत नाहीत आणि प्रथा परंपरांना थोतांड संबोधून मोकळे होतात. कारण अभ्यास करण्याच्या तुलनेत नावं ठेवणं केव्हाही सोपं. मात्र ज्याला खरंच जिज्ञासा असते, अशी व्यक्ती प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधते आणि मग ती आचरणात आणते. 

वाङ्निश्चय अर्थात साखरपुडा करताना नियोजित वर वधू एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात. अंगठीसाठी हेच बोट का? असे म्हणतात की अनामिकेतून जाणारी रक्तवाहिनी थेट हृदयाकडे जाते. ही केवळ भारतीय समजूत नाही तर इजिप्तमध्ये ही समजूत ६००० वर्षे जुनी आहे. 

याव्यतिरिक्त आणखी एक प्रयोगात असे सांगितले जाते, दोन्ही हाताची बोटे परस्पर जोडली असता, मधले बोट दुमडले आणि एक एक बोट विलग केले तर लक्षात येते की अंगठ्यापासून बाजूचे आणि करंगळीपर्यंतचे बोट विलग होते पण मधले बोट दुमडले असताना अनामिका विलग होत नाही. यावरून असे म्हटले जाते की आयुष्यात आलेली सगळी नाती काही ना काही कारणाने विलग होतात मात्र नवरा बायको हे नाते आयुष्याच्या अखेर पर्यंत टिकून राहते. म्हणून अनामिका हे नवरा बायकोच्या जोडीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच अनामिकेत अंगठी घातली जाते.