शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

नियोजित वर-वधू साखरपुड्याची अंगठी अनामिकेतच का घालतात? वाचा 'हे' कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 14:10 IST

अकारण केलेल्या गोष्टी लोप पावतात तर तर्कशुद्ध असलेल्या गोष्टी काळानुकाळ निभावल्या जातात, अनामिकेत अंगठी घालण्यामागेही आहे कारण!

आपण ज्या रीतीभाती पाळतो त्याला कधी शास्त्राधार असतो तर कधी तर्कशुद्ध कारण! कोणतीही गोष्ट अकारण केली जात नाही आणि जी केली जाते ती दीर्घकाळ टिकत नाही. हिंदू धर्मातील प्रथा परंपरांनाही शास्त्राधार आहे. म्हणूनच वर्षानुवर्षे त्याचे पालन होत आहे. मात्र काही जण ते कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, अभ्यास करत नाहीत आणि प्रथा परंपरांना थोतांड संबोधून मोकळे होतात. कारण अभ्यास करण्याच्या तुलनेत नावं ठेवणं केव्हाही सोपं. मात्र ज्याला खरंच जिज्ञासा असते, अशी व्यक्ती प्रत्येक गोष्टीमागील कारण शोधते आणि मग ती आचरणात आणते. 

वाङ्निश्चय अर्थात साखरपुडा करताना नियोजित वर वधू एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात. अंगठीसाठी हेच बोट का? असे म्हणतात की अनामिकेतून जाणारी रक्तवाहिनी थेट हृदयाकडे जाते. ही केवळ भारतीय समजूत नाही तर इजिप्तमध्ये ही समजूत ६००० वर्षे जुनी आहे. 

याव्यतिरिक्त आणखी एक प्रयोगात असे सांगितले जाते, दोन्ही हाताची बोटे परस्पर जोडली असता, मधले बोट दुमडले आणि एक एक बोट विलग केले तर लक्षात येते की अंगठ्यापासून बाजूचे आणि करंगळीपर्यंतचे बोट विलग होते पण मधले बोट दुमडले असताना अनामिका विलग होत नाही. यावरून असे म्हटले जाते की आयुष्यात आलेली सगळी नाती काही ना काही कारणाने विलग होतात मात्र नवरा बायको हे नाते आयुष्याच्या अखेर पर्यंत टिकून राहते. म्हणून अनामिका हे नवरा बायकोच्या जोडीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच अनामिकेत अंगठी घातली जाते.