शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
6
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
7
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
8
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
9
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
10
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
11
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
12
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
13
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
14
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
15
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
16
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
17
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
18
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
19
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
20
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
Daily Top 2Weekly Top 5

भगवंताच्या नामाची तुलना गोंदवलेकर महाराजांना पेढ्याशी का करावीशी वाटली? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 12:14 IST

पेढा खाता खाता घ्या अध्यात्माची अनुभूती; कशी ते सांगताहेत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज!

१८ डिसेंबर रोजी गोंदवलेकर महाराजांची तारखेने १०९ वी पुण्यतिथी आहे. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र आपल्याला देणारे आणि स्वतः त्याच नामात तल्लीन असणारे महाराज नामाची गोडी आपल्यालाही लागावी म्हणून पेढ्याची उपमा देतात... 

देव आमच्या हाकेला कधीच धावून येत नाही. देव आमचे कधीच ऐकत नाही. देवाला आमची काळजीच नाही. अशा कितीतरी गोष्टींनी आपण देवाला बोल लावत असतो. परंतु, ज्यांच्या मदतीला देव धावून गेला, त्यांनी देवाला जशी आर्त साद घातली होती, तशी आपण आर्त हाक मारतो का? तर नाही. देवाचा आपल्याला आठव होतो, आपण आर्त हाकही मारतो, पण कधी? तर आपल्या संकटकाळी. ही स्वार्थी वृत्ती झाली. संत सांगतात, गरज पडल्यावर कोणीही गयावया करेल, परंतु गरज नसतानाही जो आर्त साद घालतो, त्याला खरे प्रेम म्हणावे आणि ते प्रेम जडण्याचे माध्यम आहे, हरीनाम!

ते कसे घ्यावे, असाही आपल्याला प्रश्न पडतो. याबाबत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, 'नाम कसे घेऊ हे विचारणे, म्हणजे पेढा कसा खाऊ असे विचारण्यासारखे आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो. तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते. पेढा ज्याने खाल्ला आहे, तो पेढा कसा काऊ म्हणून जसे विचारत नाही, तसे नाम घेणारा माणूस नाम कसे घ्यावे हे विचारत नाही. बी शेतात पडते तेव्हा तिचे तोंड वरच्या बाजूला आहे की खाली, हे पाहत नाही. तो आपले काम करत राहतो. अंकुर आपला मार्ग स्वत: काढतो आणि आपली दिशा आपण ठरवतो.'

जितक्या सहजतेने आपण श्वसन करतो, तितक्या सहजतेने नाम घेतले पाहिजे. दमा झालेली व्यक्ती श्वास घेण्यासाठी कोणती दिशा योग्य हे विचारत नाही, तर आपल्यासाठी श्वसनाचा अनुकूल मार्ग शोधते. नाम घेणारी व्यक्तीदेखील श्वासागणिक नामाशी जोडली जाते आणि जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा नाम घेत राहते. 

नामस्मरण करण्यासाठी ठराविक मुद्रा हवीच असेही नाही. गोंदवलेकर महाराज सांगतात, 'समजा, तुम्ही पद्मासन घालून नामस्मरणाला बसलात आणि काही वेळाने पाठीला रग लागली, तर नामाकडे कमी आणि देहाला होणाऱ्या यातनांकडे तुमचे लक्ष जाईल. नाम असे घ्यावे, जिथे देहाचा विसर पडेल.'

नाम कधी घ्यावे, कधी नाही, याबाबत बंधने आहेत का? तर नाही. कोणत्याही परिस्थितीत जितक्या सुलभतेने श्वसन सुरू असते, तितक्याच सुलभतेने नाम घेत राहावे. विटाळ देहाला असतो, मनाला नाही. सोहेर-सुतक देहाला असते, मनाला नाही. रोग-आजार देहाला असतात, मनाला नाही आणि नाम हे मनाने घ्यायचे आहे, देहाने नाही. मन हे आत्म्याशी जोडलेले असते, बुद्धी नाही. म्हणून आत्म्याचा आणि परमात्म्याचा संबंध जोडायचा असेल, तर नामरूपी पेढा खाताना विचार करू नका, त्याची गोडी चाखत राहा.