शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू धर्मामध्ये हजारो तीर्थस्थळे असूनही चार धाम यात्रेला एवढे महत्त्व का आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 09:40 IST

आपल्या संस्कृतीचा पाया चार आधारस्तंभांवर अवलंबून आहे. म्हणून चार दिशांना व्यापणाऱ्या तीर्थक्षेत्रांना विशेष महत्त्व दिले गेले आहे.

तीर्थक्षेत्र कोणाला म्हणावे? तर असे स्थान, जिथे गेल्यावर मन:शांती मिळते, पुण्यसंचय होतो. अशी पुण्यभूमी जिथे संत सज्जन, भगवंतानी वास्तव्य केले होते, असे ठिकाण! तिथे गेल्यावर तिथल्या सकारात्मक ऊर्जेने मनातील सर्व विकारांचा, पापांचा नाश होतो, असे स्थान म्हणजे तीर्थक्षेत्र! तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रापंचिक सुखाचा विसर पडावा आणि केवळ मोक्षप्राप्ती हे जीवनाचे ध्येय व्हावे, असा उद्देश असतो. 

पूर्वीच्या काळी निवृत्तीनंतर किंवा उतारवयात तीर्थस्थळी जाण्याचा हेतू हाच होता, की संसारातून मुक्त होऊन उर्वरित जीवन ईश सेवेत कामी यावे. म्हणून लोक चारधाम यात्रा करत असत. 

परंतु प्रश्न असा उपस्थित होतो, की भारतासारख्या भारित भूमीत अगणित तीर्थक्षेत्रे असताना केवळ चार धामांना महत्त्व का? कारण हिंदू धर्मात वेद चार आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. हे वेद हिंदू संस्कृतीचे आधार आहेत. भारतीय समाज जीवनात वर्ण व्यवस्थेत समाजाची विभागणी चार वर्गात होत असे. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र. चार वर्णाचे चार जीवनचर्येत विभाजन केले आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास! पुरुषार्थदेखील चार आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. दिशा चार. पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण! 

आपल्या संस्कृतीचा पाया चार आधारस्तंभांवर अवलंबून आहे. म्हणून चार दिशांना व्यापणाऱ्या तीर्थक्षेत्रांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. पुर्वेला जगन्नाथ पुरी, पश्चिमेला द्वारका, उत्तरेला बद्रीनाथ आणि दक्षिणेला रामेश्वरम! हे चार धाम चार वेदांचे प्रतीक आहेत. बद्रीनाथ यजुर्वेदाचे, रामेश्वरम ऋग्वेदाचे, द्वारका सामवेदाचे आणि जगन्नाथ पुरी अथर्व वेदाचे! म्हणून चार धाम महत्त्वाचे मानले जातात. 

तसेच दार दिशांना वसलेली चार धामे एकदा तरी आपण पहावीत आणि आपल्या मातृभूमीच्या चार भुजा पहाव्यात, तिच्या कुशीत वसलेले आपले बांधव पहावेत, तेथील स्थिती पहावी, निसर्ग सौंदर्य पहावे आणि या विशाल निसर्ग शक्ती समोर नतमस्तक व्हावे, हाच या चार धाम यात्रेचा हेतू! मृत्यूपूर्वी ही अनुभूती प्रत्येकाने अवश्य घ्यावी.