शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

हिंदू धर्मामध्ये हजारो तीर्थस्थळे असूनही चार धाम यात्रेला एवढे महत्त्व का आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 09:40 IST

आपल्या संस्कृतीचा पाया चार आधारस्तंभांवर अवलंबून आहे. म्हणून चार दिशांना व्यापणाऱ्या तीर्थक्षेत्रांना विशेष महत्त्व दिले गेले आहे.

तीर्थक्षेत्र कोणाला म्हणावे? तर असे स्थान, जिथे गेल्यावर मन:शांती मिळते, पुण्यसंचय होतो. अशी पुण्यभूमी जिथे संत सज्जन, भगवंतानी वास्तव्य केले होते, असे ठिकाण! तिथे गेल्यावर तिथल्या सकारात्मक ऊर्जेने मनातील सर्व विकारांचा, पापांचा नाश होतो, असे स्थान म्हणजे तीर्थक्षेत्र! तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रापंचिक सुखाचा विसर पडावा आणि केवळ मोक्षप्राप्ती हे जीवनाचे ध्येय व्हावे, असा उद्देश असतो. 

पूर्वीच्या काळी निवृत्तीनंतर किंवा उतारवयात तीर्थस्थळी जाण्याचा हेतू हाच होता, की संसारातून मुक्त होऊन उर्वरित जीवन ईश सेवेत कामी यावे. म्हणून लोक चारधाम यात्रा करत असत. 

परंतु प्रश्न असा उपस्थित होतो, की भारतासारख्या भारित भूमीत अगणित तीर्थक्षेत्रे असताना केवळ चार धामांना महत्त्व का? कारण हिंदू धर्मात वेद चार आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. हे वेद हिंदू संस्कृतीचे आधार आहेत. भारतीय समाज जीवनात वर्ण व्यवस्थेत समाजाची विभागणी चार वर्गात होत असे. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र. चार वर्णाचे चार जीवनचर्येत विभाजन केले आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास! पुरुषार्थदेखील चार आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. दिशा चार. पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण! 

आपल्या संस्कृतीचा पाया चार आधारस्तंभांवर अवलंबून आहे. म्हणून चार दिशांना व्यापणाऱ्या तीर्थक्षेत्रांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. पुर्वेला जगन्नाथ पुरी, पश्चिमेला द्वारका, उत्तरेला बद्रीनाथ आणि दक्षिणेला रामेश्वरम! हे चार धाम चार वेदांचे प्रतीक आहेत. बद्रीनाथ यजुर्वेदाचे, रामेश्वरम ऋग्वेदाचे, द्वारका सामवेदाचे आणि जगन्नाथ पुरी अथर्व वेदाचे! म्हणून चार धाम महत्त्वाचे मानले जातात. 

तसेच दार दिशांना वसलेली चार धामे एकदा तरी आपण पहावीत आणि आपल्या मातृभूमीच्या चार भुजा पहाव्यात, तिच्या कुशीत वसलेले आपले बांधव पहावेत, तेथील स्थिती पहावी, निसर्ग सौंदर्य पहावे आणि या विशाल निसर्ग शक्ती समोर नतमस्तक व्हावे, हाच या चार धाम यात्रेचा हेतू! मृत्यूपूर्वी ही अनुभूती प्रत्येकाने अवश्य घ्यावी.