शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

बाप्पाचे वाहन उंदीरच का? त्या रूपकामागे असलेली कथा आणि अर्थ समजून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 12:05 IST

उंदीर ही एक विनाशक, विघातक वृत्ती आहे. तसेच उंदीर हे आपल्या चंचल तसेच काळ्या विकृत मनाचे प्रतीक आहे. त्यावर अंकुश धारण केलेला बाप्पाच विजय मिळवू शकतो.

ज्याला सर्व ठिकाणी पूजेचा पहिला मान असतो, असा बाप्पा वाहन म्हणून एवढ्याशा उंदराची निवड करतो, यात विरोधाभास जाणवतो,नाही का? परंतु, त्या रूपकामागे दडलेला अर्थ समजून घेतला, तर बाप्पाच्या दूरदृष्टीचे आपल्याला निश्चितच कौतुक वाटेल. तत्पूर्वी याबाबत सांगितली जाणारी पौराणिक कथा जाणून घेऊया. 

एक दिवस इंद्राच्या दरबारात काही औचित्य असल्यामुळे नृत्य गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचा सूत्रधार अर्थात प्रमुख कलाकार होता क्रौंच नावाचा एक गंधर्व! देवलोकातील त्या खास सभेची आणि सभासदांची उठबस करताना त्याचा पाय चुकून एका ऋषींना लागला आणि त्यांना यातना असह्य झाल्याने त्यांनी रागाच्या भरात त्याला शाप दिला, की सभेमध्ये उंदरासारखी लुडबूड करणाऱ्या गंधर्वा, तू पृथ्वीवर उंदीर होऊन फिरशील. 

क्रौंच गयावया करू लागला. क्षमा मागू लागला. परंतु त्याला ती शिक्षा भोगावी लागली. गंधर्व योनीतून थेट तो उंदीर योनीत प्रवेश करता झाला आणि नेमका तो एका ऋषींच्या आश्रमात पोहोचला. उंदरांच्या मूळ वृत्तीप्रमाणे तो अन्नधान्याची नासधूस करू लागला. सर्वांनी त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्या आश्रमात बाप्पाचे आगमन झाले असता, ऋषींनी ही समस्या बाप्पाच्या कानावर घातली. बाप्पाने अवघ्या काही क्षणात सापळा रचून उंदराला पकडले. 

उंदराने हात जोडले. सर्वांची माफी मागितली. आपण शापित गंधर्व असल्याची ओळख पटवून दिली. तेव्हा बाप्पाने त्याला अभय दिले आणि वर माग म्हटले. त्यावर तो गंधर्व म्हणाला, `पुन्हा गंधर्व होऊन गायन नृत्य करण्यात मला रस नाही, त्यापेक्षा साक्षात तुझ्या पायाशी येण्याची संधी मिळाली आहे, तर तू मला तुझा दास करून घे. अगदी वाहन होऊन येण्याचीही माझी तयारी आहे.' यावर बाप्पा म्हणाले, `अरे पण तुझा माझा भार पेलवेल तरी का? तू दबून जाशील!'

गंधर्व म्हणाला, `हरकत नाही देवा, जेवढा काळ शक्य तेवढी तुमची सेवा हातून घडल्याचे समाधान तरी मिळेल!'त्याचे हे बोलणे ऐकून बाप्पाने त्याला तथास्तू म्हटले आणि त्या दिवसापासून क्रौंच हा शापित गंधर्व बाप्पाचे वाहन बनला.

ज्याप्रमाणे ही पौराणिक कथा समर्पक वाटते, त्याचप्रमाणे उंदराचा वाहन म्हणून केलेला वापर हा रुपक कथेचा एक भाग आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. उंदीर ही एक विनाशक, विघातक वृत्ती आहे. तसेच उंदीर हे आपल्या चंचल तसेच काळ्या विकृत मनाचे प्रतीक आहे. त्यावर अंकुश धारण केलेला बाप्पाच विजय मिळवू शकतो. म्हणून वाईटाकडे वेगाने धावणारे मन, अज्ञान, अंधश्रद्धेने पोखरले जाणारे मन नियंत्रणात राहावे, यासाठी आपण बाप्पाची प्रार्थना करतो आणि त्याला विनवणी करतो...

मोरया मोरया मी बाळ तान्हे,तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी।

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी