शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

स्वामींची एवढी सेवा, नामस्मरण करुन मनोकामना पूर्ण का होत नाहीत? नेमकी चूक कुठे होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 15:07 IST

Shree Swami Samarth Maharaj: स्वामी सेवा करूनही मनासारखे का होत नाही? आपले नेमके कुठे आणि काय चुकते? यावर उपाय काय? जाणून घ्या...

Shree Swami Samarth Maharaj: अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी अनेकांची श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भाविकांचे दैवत आहेत. दररोज न चुकता स्वामींचे पूजन, भजन, नामस्मरण, उपासना केली जाते. अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथांची पारायणे केली जातात. नित्येनेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्यासह देश-विदेशात स्वामींचे मठ, मंदिरे आहेत. या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो. 

समस्या, अडचण, संकट असले तर स्वामींना मनापासून हाक मारावी, स्वामी लगेच भक्तांच्या हाकेला धावून येतात. संकटमुक्त करतात, अडचण दूर करतात, असे अनेकांचे अनुभव आहेत. स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात. भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव देतात, असे अनेक जण आवर्जून सांगत असतात.

असे का होते? यावर उपाय काय?

नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करतो, सेवा करतो. मठात न चुकता जातो. गुरुवारी विशेष पूजन, नामस्मरण करतो. जे जे शक्य होईल, ते ते करतो, असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण करत नाहीत, जी अपेक्षा आहे, त्याची पूर्ती होत नाही, असे अनेकांना वाटत असते. आपण कुठे कमी पडतो का, असे विचारही मनात येत असतात. मनात भीती वाटते, घाबरायला होते. असे का होते? यावर उपाय काय? याबाबत काही मान्यता असल्याचे म्हटले जाते. 

स्वामींवर श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा

अनेकदा आपण आपल्या इच्छा, मनोकामना, नवस, संकल्प हे आप्तांना, जवळच्या व्यक्तींना, अगदी खास लोकांना, मित्रांना सांगत असतो. त्यातून सकारात्मकता मिळावी, हा उद्देश असतो किंवा तशी मनातून अपेक्षा असते. यासोबतच आपण स्वामींचेही शक्य तेवढे करत असतो. आपापल्या परिने यथाशक्ती सेवा, नामस्मरण करतो. मनातील अमूक या इच्छेसाठी आपण स्वामींची अमूक अमूक एवढी सेवा करत आहे, असेही सांगतो. इथेच चूक होते, असे सांगितले जाते. परंतु, मनातील संकल्प, इच्छा, विशेष मनोकामना कुणालाही सांगू नयेत, असे सांगितले जाते. त्याची वाच्छता करू नये. तसेच आम्ही स्वामींचे अमूक करतो, तमूक करतो, स्वामींची एवढी सेवा करतो, तेवढी सेवा करतो, असे तर अजिबातच सांगू नये. आपली इच्छा गुप्त ठेवावी. अगदीच बोलावेसे वाटले, तर मनातल्या मनात स्वामींना सांगावे. स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा. स्वामी नक्कीच शुभ करतील, असे सांगितले जाते.

||श्री स्वामी समर्थ|| 

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिकchaturmasचातुर्मास