शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
2
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
3
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
6
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
7
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
8
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
9
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
10
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
11
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
12
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
13
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
14
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
15
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
16
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
17
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
18
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
19
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
20
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
Daily Top 2Weekly Top 5

बहुतांश व्रत वैकल्ये स्त्रियांनाच का सांगितली आहेत? जाणून घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 15:55 IST

व्रतस्थपणा हा स्त्रियांच्या ठिकाणी जात्याच असतो. प्रतिकुलतेतही त्या तग धरू शकतात. कारण त्यांचा मनोनिग्रह पुरुषांपेक्षा जास्त असतो. याच बळावर त्या पुरुषांपेक्षा अधिक लवकर देवाशी संधान साधू शकतात.

व्रत वैकल्ये ही बऱ्याचदा मनात विशिष्ट मनोकामना धरून केली जातात. विशेषत: स्त्रियांमध्ये व्रतवैकल्ये करण्याची उभारी अधिक असते. बहुतांश व्रतवैकल्ये ही स्त्रियांसाठीच योजलेली आहेत. अर्थात स्त्री पुरूषांनी आचारावी अशीही अनेक व्रते धर्मशास्त्रात सांगितली आहेत.

मुळात व्रतवैकल्ये म्हणजे अतिशय व्यक्तिगत स्वरूपाचे धर्माचरण आहे. दैनंदिन जीवनातील जगरहाटीला कंटाळळेल्या मनाला उभारी आणून ते मन पुन्हा जगरहाटीत गुंतवण्यास अनुकूल करणे हा मुख्य हेतू या व्रतवैकल्यामागे असावा असे वाटते. दैनंदिन जीवनात पुरुष हा अनेक व्यवहारात व्यस्त राहत असल्याने त्याच्या जीवनाला नाही म्हटले तरी जगरहाटीची गती असते. पण पूर्वी स्त्रियांचं दैनंदिन जीवन हे नेहमी उंबरठ्याच्या आतच चूल व मूल यांना बांधिल राहत असल्याने त्यांना अनेक मर्यादा पडत होत्या. या बंदिस्तपणातील एकसूरी आयुष्याला अधूनमधून गतिमान करण्याच्या दृष्टीने व्रतवैकल्यांचा पसारा मांडला गेला असावा. 

स्त्री ही कितीही सुबुद्ध असली तरी तिचं जगणं स्वत:पेक्षा प्रपंचासाठीच अधिक असते. आपला प्रपंच सुखी असावा, ही तिची पहिली आस असते. त्यामुळे आपले सौभाग्य, आपली मुलं बाळं आणि कुटुंबातील सदस्य सुखी असावे, ही तिची एकमेव इच्छा असते. त्यामुळेच अनेकदा पुरुषांना पुरुषार्थाने जे जमत नाही ते स्त्रिया श्रद्धेने घडवून आणतात. स्त्रियांची मानसिकता पूर्वसूरींनी ओळखली असावी. 

व्रतस्थपणा हा स्त्रियांच्या ठिकाणी जात्याच असतो. प्रतिकुलतेतही त्या तग धरू शकतात. कारण त्यांचा मनोनिग्रह पुरुषांपेक्षा जास्त असतो. याच बळावर त्या पुरुषांपेक्षा अधिक लवकर देवाशी संधान साधू शकतात. व्रतवैकल्यांमुळे स्त्रियांच्या ठायी असलेल्या सूप्त गुणांचा निश्चितपणे विकास होऊ शकतो.

व्रतवैकल्यांमुळे प्रपंचातील नित्यनैमित्तिकांपासून स्त्रियांना काही काळ मोकळीक मिळू शकते. त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कुटुंबात आणि समाजात एक प्रकारची प्रतिष्ठा लाभू शकते. विशेष म्हणजे व्रतवैकल्याच्या निमित्ताने घराबाहेरील जगाशी तिचा संपर्क येतो. या संपर्कामुळे मन उल्हसित होते. व्रतवैकल्यांच्या उपासामुळे आरोग्यही चांगले राहते. तिच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा मुलाबाळांवरही चांगला परिणाम होतो.

पुरुषांच्या बाबतीतही व्रतवैकल्यांमुळे आत्मविश्वास वाढतो. देवावरील श्रद्धा दृढ होते. देह आणि मनाचे आरोग्य चांगले राहते. मुळात या सर्व गोष्टींमुळे जगण्याचा आनंद दुणावतो. नैराश्याचा झाकोळ दूर होतो आणि आयुष्य सत्कारणी लावण्याचा ध्यास जडतो. या आणि अशा लाभांचा विचार करता व्रतवैकल्ये ही अधूनमधून मानवी जीवनाला चेतना देणारी ऊर्जा आहे, असे म्हणायला हरकत नाही. 

परंतु आता स्त्री नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडू लागली आहे. मग तिला या व्रतवैकल्यांची गरज काय, असा प्रश्न तुमच्या मनात उद्भवू शकेल. परंतु, कितीही नाही म्हटले तरी संसार, नोकरी, व्यवसाय यातूनही चार निवांत क्षण आजही तिला हवेच असतात. हे क्षण या सण-उत्सवाच्या निमित्ताने मिळतात आणि व्रत वैकल्याच्या माध्यमातून साजरे होतात. त्यामुळे कालानुरूप त्यात आवश्यक बदल करून व्रतांचे सातत्य अबाधित ठेवण्यात काहीच गैर नाही.