शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जो नियम मोडतो, त्याला यम गाठतो; यम-नियमांचे महत्त्व जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 09:15 IST

ज्याप्रमाणे सामाजिक नियम पाळणे महत्त्वाचे आहेत, त्याप्रमाणे वैयक्तिक आयुष्याबाबतही काही नियम पाळणे गरजेचे आहे.

'नियम हे मोडण्यासाठीच असतात' असे काही जण अभिमानाने सांगतात. परंतु तसे नसते, किंबहुना तसे नसायला हवे. नियम अर्थात सामाजिक चौकट, जी सर्वांच्या हिताचा विचार करून आखली जाते. ती चौकट मोडण्यात कोणाचे हित आहे? सिग्नल लागल्यावर गाडी थांबवावी हा साधा नियम आहे, पण तो उल्लंघून गेल्यामुळे अपघात होतात. 

आपल्या देशात नियम मोडणारी मंडळी परदेशात शिक्षेच्या भीतीने नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. अगदी रात्री-बेरात्रीसुद्धा सिग्नल लागल्यावर, रस्त्यावर कोणी असो वा नसो, त्यांना गाडी थांबवावीच लागते. अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना संगणकीय यंत्रणेने दंड आकारला जातो. म्हणून तिथे कोणीही थुंकणे, कचरा टाकणे, वाटेल त्या दिशेने, वाटेल तेवढ्या वेगाने गाडी नेणे, पार्विंâग करणे इ. गैरप्रकार करत नाहीत. 

याउलट आपल्या देशात पदोपदी नियमांना केराची टोपली दाखवली जाते. या सवयींमुळे आपण स्वत:चे आणि समाजाचे नुकसान करत आहोत, ही बाब आपल्याला लक्षात येत नाही. आपण जसे वगतो, त्याचे अनुकरण पुढची पिढी करत असते. 'फेरारी की सवारी' चित्रपटात वडील आपल्या मुलाबाबतीत म्हणतात, 'जो देखेगा वही सिखेगा!' त्यामुळे मुले बिघडतात म्हणण्यापेक्षा त्यांच्या गैरवर्तनाला आपण तर जबाबदार नाही ना, याची पालकांनी अवश्य खात्री करून घ्यावी. 

ज्याप्रमाणे सामाजिक नियम पाळणे महत्त्वाचे आहेत, त्याप्रमाणे वैयक्तिक आयुष्याबाबतही काही नियम पाळणे गरजेचे आहे. सामाजिक नियम आपल्याला माहित आहेच, वैयक्तिक उन्नतीसाठी कोणते नियम महत्त्वाचे आहेत, ते जाणून घेऊ...

सत्य - सत्याचरण करणे.अहिंसा - काया, वाचा, मनाने कोणालाही न दुखवणे.अस्तेय - कोणालाही न फसवणे.ब्रह्मचर्य - विषयांचे परिमित सेवन करत त्यातून ईश्वरसेवा साधणे.अपरिग्रह - अनावश्यक साठा न करणे. अनावश्यक चिंतन न करणे.शौच - काया, वाचा, मनाने शुद्धतेचे आचरण करणे.संतोष - प्रारब्धानुसार प्राप्त होणाऱ्या भोगांमध्ये समाधान मानणे.तप - जीवनभर दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी, उद्धारासाठी झटणे. स्वाध्याय - शुद्ध ज्ञान, भक्ती जागवणारे ग्रंथ वाचणे, त्यानुसार आचरण करणे.ईश्वरप्रणिधान - परमेश्वराच्या इच्छेने सर्व चालू आहे याची जाणिव ठेवणे आणि परमेश्वराच्या चिंतनातच राहणे.

या गोष्टींचे आचरण केले असता, नियमांचे उल्लंघन होत नाही आणि यम जवळ येत नाही.