शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जो नियम मोडतो, त्याला यम गाठतो; यम-नियमांचे महत्त्व जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 09:15 IST

ज्याप्रमाणे सामाजिक नियम पाळणे महत्त्वाचे आहेत, त्याप्रमाणे वैयक्तिक आयुष्याबाबतही काही नियम पाळणे गरजेचे आहे.

'नियम हे मोडण्यासाठीच असतात' असे काही जण अभिमानाने सांगतात. परंतु तसे नसते, किंबहुना तसे नसायला हवे. नियम अर्थात सामाजिक चौकट, जी सर्वांच्या हिताचा विचार करून आखली जाते. ती चौकट मोडण्यात कोणाचे हित आहे? सिग्नल लागल्यावर गाडी थांबवावी हा साधा नियम आहे, पण तो उल्लंघून गेल्यामुळे अपघात होतात. 

आपल्या देशात नियम मोडणारी मंडळी परदेशात शिक्षेच्या भीतीने नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. अगदी रात्री-बेरात्रीसुद्धा सिग्नल लागल्यावर, रस्त्यावर कोणी असो वा नसो, त्यांना गाडी थांबवावीच लागते. अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना संगणकीय यंत्रणेने दंड आकारला जातो. म्हणून तिथे कोणीही थुंकणे, कचरा टाकणे, वाटेल त्या दिशेने, वाटेल तेवढ्या वेगाने गाडी नेणे, पार्विंâग करणे इ. गैरप्रकार करत नाहीत. 

याउलट आपल्या देशात पदोपदी नियमांना केराची टोपली दाखवली जाते. या सवयींमुळे आपण स्वत:चे आणि समाजाचे नुकसान करत आहोत, ही बाब आपल्याला लक्षात येत नाही. आपण जसे वगतो, त्याचे अनुकरण पुढची पिढी करत असते. 'फेरारी की सवारी' चित्रपटात वडील आपल्या मुलाबाबतीत म्हणतात, 'जो देखेगा वही सिखेगा!' त्यामुळे मुले बिघडतात म्हणण्यापेक्षा त्यांच्या गैरवर्तनाला आपण तर जबाबदार नाही ना, याची पालकांनी अवश्य खात्री करून घ्यावी. 

ज्याप्रमाणे सामाजिक नियम पाळणे महत्त्वाचे आहेत, त्याप्रमाणे वैयक्तिक आयुष्याबाबतही काही नियम पाळणे गरजेचे आहे. सामाजिक नियम आपल्याला माहित आहेच, वैयक्तिक उन्नतीसाठी कोणते नियम महत्त्वाचे आहेत, ते जाणून घेऊ...

सत्य - सत्याचरण करणे.अहिंसा - काया, वाचा, मनाने कोणालाही न दुखवणे.अस्तेय - कोणालाही न फसवणे.ब्रह्मचर्य - विषयांचे परिमित सेवन करत त्यातून ईश्वरसेवा साधणे.अपरिग्रह - अनावश्यक साठा न करणे. अनावश्यक चिंतन न करणे.शौच - काया, वाचा, मनाने शुद्धतेचे आचरण करणे.संतोष - प्रारब्धानुसार प्राप्त होणाऱ्या भोगांमध्ये समाधान मानणे.तप - जीवनभर दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी, उद्धारासाठी झटणे. स्वाध्याय - शुद्ध ज्ञान, भक्ती जागवणारे ग्रंथ वाचणे, त्यानुसार आचरण करणे.ईश्वरप्रणिधान - परमेश्वराच्या इच्छेने सर्व चालू आहे याची जाणिव ठेवणे आणि परमेश्वराच्या चिंतनातच राहणे.

या गोष्टींचे आचरण केले असता, नियमांचे उल्लंघन होत नाही आणि यम जवळ येत नाही.