शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

शिवशंभूचे आई वडील कोण? पार्वतीचे कसे झाले कन्यादान? सद्गुरुंनी केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:27 IST

जगाचे पालक म्हणून आपण ब्रह्मा, विष्णू, महेश यांना ओळखतो, पण त्यांचे पालक कोण असतील या प्रश्नांचे उत्तर जाणून घ्या. 

शिवशंभूंचे आई वडील कोण? हा प्रश्न सर्वात आधी उपस्थित झाला तो त्यांच्या लग्नाच्या वेळी! त्यावेळी पालक म्हणून कोण पुढे आले याबद्दल सद्गुरुंनी केलेला खुलासा बघा. 

शिवशंभू यांना पशुपती असेही म्हणतात. कारण या विश्वातील प्रत्येक जीवाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि ती जबाबदारी ते अथकपणे पार पाडत आहेत. त्यांच्या विवाह सोहळ्याला सूर, असुर, दानव, मानव, भूत, पिशाच्च, पशु, पक्षी सगळे वरातीत सामील झाले. कारण ते देवांचेही देव होते आणि असुरांचेही देव होते. पटकन संतुष्ट होणारे आशुतोष अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळे जो भक्ती भावाने त्यांना आपलेसे करतो, त्यांना ते जवळ करतात. 

त्यामुळे शिवशंभूंच्या विवाहात सगळेच जण सामील झाले होते. हिमालय कन्या पार्वती विवाहासाठी कटिबद्ध झाली. हिमालयाच्या इच्छेविरुद्ध हे लग्न होत असल्याने त्याचा मनापासून पाठिंबा नव्हता, परंतु पार्वतीच्या इच्छेसाठी त्यांनी लग्नाला होकार दिला. मात्र जेव्हा कन्यादानाची वेळ आली, तेव्हा कोणाच्या भरवशावर पार्वती शिवशंभूला द्यायची हा प्रश्न हिमालयाने उपस्थित केला. 

तेव्हा शिवशंभू ध्यानस्थ झाले. त्यांचे पालक कोण याबद्दल आजवर कोणी विचारणा केली नव्हती. आता कोण पुढे येणार? शिवशम्भूचे पालक कसे असणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता वाटू लागली. त्या शांततेत नारदमुनी आपली वीणेची तार छेडत होते. तो आवाज त्या शांततेचा भंग करत होता. सगळ्यांचे ध्यान शिवशंभूच्या उत्तराकडे लागलेले असताना नारदांनी वीणा रसभंग करत होती. तरीही त्यांनी आपले वादन थांबवले नाही. शेवटी हिमालयाने न राहवून नारदांना विचारले, 'इथे सगळेच जण महादेवाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असताना तुम्ही वीणेचा झंकार का करत आहात? काही काळ थांबवत का नाही? 

त्यावर देवर्षी नारद म्हणाले, 'हे वीणावादन नाही तर हिमालया, हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. हिमालयाने प्रश्नार्थक चेहरा केला आणि खुलासा करा असे विनवले. त्यावर देवर्षी म्हणाले, 'महादेव हे स्वयंभू आहेत. त्यांची उत्पत्ती ही नादातून झाली आहे. सर्व प्रकारच्या नाद,सुरांवर त्यांचेच स्वामित्त्व आहे. त्यामुळे त्यांना पालक नाहीत तर तेच विश्वाचे पालक आहेत. हे सांगण्यासाठी मी वीणेचा झंकार करत होतो. 

महादेवाच्या अर्थात शिवशंभूच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे, ते स्वयंभू आहेत. त्याप्रमणे  आपणही स्वयंभू व्हावे. आत्मनिर्भर व्हावे. स्वतःला घडवावे. नवनवीन आव्हान स्वीकारून, कडू घोटांचं हलहल प्राशन करायला शिकावे. यासर्वांसाठी आत्मचिंतन करावे. शिवशंभू हे पहिले हटयोगी म्हटले जातात. त्यांचा आदर्श ठेवून आपणही चिंतन केले पाहिजे. आपल्या भावना आपल्याला नियंत्रित ठेवता आल्या पाहिजेत, आपले आरोग्य, आपले भविष्य आपल्याला घडवता आले पाहिजे. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या आणि आयुष्याला सुंदर आकार देऊन स्वतः स्वतःचे पालकत्व स्वीकारा, असे सद्गुरू या कथेचा सारांश सांगतात.