शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

शिवशंभूचे आई वडील कोण? पार्वतीचे कसे झाले कन्यादान? सद्गुरुंनी केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:27 IST

जगाचे पालक म्हणून आपण ब्रह्मा, विष्णू, महेश यांना ओळखतो, पण त्यांचे पालक कोण असतील या प्रश्नांचे उत्तर जाणून घ्या. 

शिवशंभूंचे आई वडील कोण? हा प्रश्न सर्वात आधी उपस्थित झाला तो त्यांच्या लग्नाच्या वेळी! त्यावेळी पालक म्हणून कोण पुढे आले याबद्दल सद्गुरुंनी केलेला खुलासा बघा. 

शिवशंभू यांना पशुपती असेही म्हणतात. कारण या विश्वातील प्रत्येक जीवाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि ती जबाबदारी ते अथकपणे पार पाडत आहेत. त्यांच्या विवाह सोहळ्याला सूर, असुर, दानव, मानव, भूत, पिशाच्च, पशु, पक्षी सगळे वरातीत सामील झाले. कारण ते देवांचेही देव होते आणि असुरांचेही देव होते. पटकन संतुष्ट होणारे आशुतोष अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळे जो भक्ती भावाने त्यांना आपलेसे करतो, त्यांना ते जवळ करतात. 

त्यामुळे शिवशंभूंच्या विवाहात सगळेच जण सामील झाले होते. हिमालय कन्या पार्वती विवाहासाठी कटिबद्ध झाली. हिमालयाच्या इच्छेविरुद्ध हे लग्न होत असल्याने त्याचा मनापासून पाठिंबा नव्हता, परंतु पार्वतीच्या इच्छेसाठी त्यांनी लग्नाला होकार दिला. मात्र जेव्हा कन्यादानाची वेळ आली, तेव्हा कोणाच्या भरवशावर पार्वती शिवशंभूला द्यायची हा प्रश्न हिमालयाने उपस्थित केला. 

तेव्हा शिवशंभू ध्यानस्थ झाले. त्यांचे पालक कोण याबद्दल आजवर कोणी विचारणा केली नव्हती. आता कोण पुढे येणार? शिवशम्भूचे पालक कसे असणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता वाटू लागली. त्या शांततेत नारदमुनी आपली वीणेची तार छेडत होते. तो आवाज त्या शांततेचा भंग करत होता. सगळ्यांचे ध्यान शिवशंभूच्या उत्तराकडे लागलेले असताना नारदांनी वीणा रसभंग करत होती. तरीही त्यांनी आपले वादन थांबवले नाही. शेवटी हिमालयाने न राहवून नारदांना विचारले, 'इथे सगळेच जण महादेवाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असताना तुम्ही वीणेचा झंकार का करत आहात? काही काळ थांबवत का नाही? 

त्यावर देवर्षी नारद म्हणाले, 'हे वीणावादन नाही तर हिमालया, हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे. हिमालयाने प्रश्नार्थक चेहरा केला आणि खुलासा करा असे विनवले. त्यावर देवर्षी म्हणाले, 'महादेव हे स्वयंभू आहेत. त्यांची उत्पत्ती ही नादातून झाली आहे. सर्व प्रकारच्या नाद,सुरांवर त्यांचेच स्वामित्त्व आहे. त्यामुळे त्यांना पालक नाहीत तर तेच विश्वाचे पालक आहेत. हे सांगण्यासाठी मी वीणेचा झंकार करत होतो. 

महादेवाच्या अर्थात शिवशंभूच्या व्यक्तिमत्त्वातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे, ते स्वयंभू आहेत. त्याप्रमणे  आपणही स्वयंभू व्हावे. आत्मनिर्भर व्हावे. स्वतःला घडवावे. नवनवीन आव्हान स्वीकारून, कडू घोटांचं हलहल प्राशन करायला शिकावे. यासर्वांसाठी आत्मचिंतन करावे. शिवशंभू हे पहिले हटयोगी म्हटले जातात. त्यांचा आदर्श ठेवून आपणही चिंतन केले पाहिजे. आपल्या भावना आपल्याला नियंत्रित ठेवता आल्या पाहिजेत, आपले आरोग्य, आपले भविष्य आपल्याला घडवता आले पाहिजे. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या आणि आयुष्याला सुंदर आकार देऊन स्वतः स्वतःचे पालकत्व स्वीकारा, असे सद्गुरू या कथेचा सारांश सांगतात.