शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

जिथे आनंद असतो तिथे प्रेम असते आणि जिथे प्रेम असते तिथे परमात्मा असतो - ओशो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 15:58 IST

तुमच्या मनात या जगाबद्दल प्रेम भरून ओसंडावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही नाचाल तर त्याला बघू शकाल. नृत्यात तो अत्यंत जवळ असतो. तुम्ही गुणगुत गा, म्हणजे तो सुद्धा तुमच्यासोबत गुणगुणेल. 

कमळ आणि चिखल यांच्यात काही संबंध दिसत नाही. पण संबंध आहे. चिखल माती ही जन्मदात्री आहे. ते गर्भाशय आहे. त्यात कमळाचा गर्भ धरतो. आणि मग जन्म होतो. ही पृथ्वी भलेही मृण्मय असेल, पण विसरू नका, यातून कमळ उमलण्याची शक्यता आहे. अनेक लोक चिखल म्हणत या पृथ्वीची निंदा करतात आणि ते निंदा करण्यात एवढे मग्न होतात, की त्यांना याच निंदेतून आशा अपेक्षांचे कमळ उमलताना दिसतच नाही. 

मी तुम्हाला कमळाची आठवण करून देत आहे. चिखलाची निंदा करण्याच्या भानगडीत न पडता कमळांचा शोध घ्या. ज्या दिवशी तुम्हाला चिखलात कमळ आढळतील त्या दिवशी या चिखल मातीचे आभार मानायला विसराल का? त्या दिवशी परमात्मा वसत असलेल्या या देहाला धन्यवाद देणार नाही का? त्या दिवशी या पार्थिव जगाबद्दल तुमचं हृदय अनुग्रहाने भरून जाणार नाही का? या पार्थिव जगात परमात्म्याचा अनुभव येतो त्या पार्थिव जगाची निंदा करू शकाल का?

तुमच्या मनात या जगाबद्दल प्रेम भरून ओसंडावं अशी माझी इच्छा आहे. या प्रपंचाचा निषेध करणाऱ्या जुन्यापुराण्या धारणांचे संस्कार समूळ उपटून टाकावेत असे मला वाटते. त्यांना पार पुसून टाका. परमात्म्याला बघण्यापासून, जाणण्यापासून ते तुम्हाला अडवत आहेत. दूर ठेवत आहेत. तुम्ही नाचाल तर त्याला बघू शकाल. नृत्यात तो अत्यंत जवळ असतो. तुम्ही गुणगुत गा, म्हणजे तो सुद्धा तुमच्यासोबत गुणगुणेल. 

मी गीत शिकवतो. संगीत शिकवतो. माझा हेतू एकच आहे. आनंद, उत्सव, महोत्सव! उत्सव महोत्सवाचे सिद्धांत बनवता येत नाहीत. ही केवल जीवनचर्या होऊ शकते. तुमचं जीवनच ते सांगू शकेल. केवळ ओठांनी बोलाल तर ते पोकळ होईल. खोटं वाटेल. आतून प्राणातून बोला. श्वासानी सांगा. आनंद उत्सव महोत्सव रोमारोमात भरू द्या.

जिथे आनंद असतो तिथे प्रेम असते. आणि जिथे प्रेम असते तिथे परमात्मा असतो. मी प्रेमाचे मंदिर बनवतो आहे. तुम्ही सुदैवी आहात की त्या मंदिराच्या उभारणीसाठी तुमचेही हात सहाय्यभूत होत आहेत. तुम्ही त्या मंदिरासाठी विटा निवडता आहात. तुम्ही या मंदिराची द्वारे बनवत आहात.

या पृथ्वीवरील आनंदाच्या मंदिराने फार पूर्वी इथला निरोप घेतला आहे. कधी कृष्णाने बासरी वाजवली तेव्हा ते अस्तित्त्वात असेल. मग कुणास ठाऊक कोणत्या तरी दुर्दैवी घडीला, कुणास ठाऊक कोणत्या निराशेच्या भरात, कोणत्या तरी नपुंसक लोकांच्या हाती आम्ही आपले जीवन सोपावले. पोकळ पंडितांच्या हाती आमचे जीवन घडले. त्यांनी आमचा गळा दोरीच्या फासात आवळला. मोठाली शास्त्रं गळ्यात अडकवली. चालणे मुश्किल झाले. नाचणे दूर राहिले. मोठाले सिद्धांत त्यांनी आमच्या गळी उतरवले. त्यामुळे गळा अवरुद्ध झाला. अशा स्थितीत गीत कसे गाणार?

शास्त्र, सिद्धांत, संप्रदाय मी तुमच्याकडून हिसकावून दूर भिरकावणार आहे. तुमची ओझी मला उतरवून ठेवायची आहेत. तुम्हाला मुक्त करायचे आहे. इतके हलके करायच आहे की तुम्ही पंख पसरून मनमोकळेपणी आकाशात उडू शकाल. मुक्तीचा आनंद लुटू शकला. हे आकाश तुमचे आहे. स्वच्छंद झेप घ्या आणि त्यात मनसोक्त विहार करा.