शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

देवपूजा करताना शास्त्राने दिलेले नियम आवर्जून पाळा; देवपूजेचा आनंद द्विगुणित होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:10 IST

देवपूजा हा देवाशी एकप्रकारे संवाद असतो, तो कसा असायला हवा.. वाचा!

आपण दररोज एक उपचार म्हणून करत असलेली देवपूजा, ही भगवंतासाठी नसून आपल्यासाठी असते, हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. पूजा हे 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' राहण्याचे निमित्त असते. जीव आणि शिवाचा संवाद असतो. पूजा करताना मन एकाग्र होणे अभिप्रेत असते. त्यामुळे मनापासून वाहिलेले एक बिल्वपत्र किंवा फुल भगवंतापर्यंत पोहोचावे, आपण अर्पण केलेला नैवेद्य त्याने ग्रहण करावा, अशी त्यामागील मुख्य भावना असायला हवी.

मात्र प्रत्यक्षात घडते काही वेगळेच! पूजा कोण करणार यावरून नवरा बायकोत वाद होतात. कारण तेवढ्यापुरताही त्यांच्याजवळ वेळ नसतो. धुसफुसत दोघांपैकी एक जण पूजा 'उरकून' घेतो. पूर्वी हे काम घरातले ज्येष्ठ आत्मीयतेने आणि तल्लीनतेने करत असत आणि नातवंड त्यांच्याबरोबर बसून पूजा विधी शिकून घेत असत. परंतु आता तसे होत नाही. ज्या आत्मारामाशी आपला दिवसभरातुन क्षणभरही संवाद घडत नाही, त्याने आपल्या संकटात धावून यावे अशी अवाजवी अपेक्षा मात्र बाळगली जाते आणि त्याने हाक ऐकली नाही की त्यालाच दोषी ठरवले जाते. या चुका टाळण्यासाठी शास्त्राने काही उपाय सुचवले आहेत...

>>देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये. 

>>पूजा झाल्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तींनाही आवर्जून नमस्कार करावा. 

>>जप करताना एका जागी आसन घालून त्यावर शांत बसून करावा. जप माळ धरलेल्या हातावर गॊमुखी धरावी. म्हणजे जप किती बाकी आहे, याकडे वारंवार लक्ष जात नाही. मेरुमणी येईपर्यंत जप पूर्ण होतो. 

>>जप झाल्यावर देवाला मनापासून नमस्कार करावा आणि ज्या जागेवर बसतो, तिथेही भूमिस्पर्श करून नमस्कार करावा. 

>>देवपूजेत तुळशीचे स्थान महत्त्वाचे असले, तरीही द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या आणि रविवार या दिवशी तुळशीची पाने खुडू नयेत. 

>>तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावू नये. तो स्वतंत्रपणे प्रज्वलित करावा. 

>>शनिवारी पिंपळाच्या झाडाला कलशभर पाणी घालून प्रदक्षिणा माराव्यात. तसे करणे शुभ मानले जाते. 

>>देव पूजेत, यज्ञविधीत पांढरे तीळ नाही, तर काळ्या तिळांचा वापर करावा. 

>>कोणत्याही धार्मिक प्रसंगी दान दक्षिणा उजव्या हाताने द्यावी. 

>>शंकराला बेल, गणपतीला दुर्वा, विष्णूला तुळस, लक्ष्मीला कमळ असे ज्या देवतेला जे पुष्प प्रिय आहे ते अर्पण करावे. 

>>महाशिवरात्रीचा दिवस वगळता अन्य कोणत्याही दिवशी महादेवाला कुंकू वाहू नये. 

>>देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य झाल्यावर ते घाणीत किंवा गढूळ पाण्यात टाकून न देता बागेतील रोपांना खत म्हणून घालावे आणि पुर्नवापरात आणावे. 

>>पूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला असावे. आपल्या हाताच्या डाव्या बाजूला धूप दीप उदबत्ती ठेवावे आणि उजव्या बाजूला आरतीचे तबक ठेवावे. 

>>देवपूजेत तासनतास घालवणे शास्त्रालाही अभिप्रेत नाही, परंतु जेवढे क्षण आपण देवाच्या सान्निध्यात घालवतो, तेवढे क्षण आपल्याला जगाचा विसर पडावा, हा पूजेचा मुख्य हेतू असतो.