शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

देवपूजा करताना शास्त्राने दिलेले नियम आवर्जून पाळा; देवपूजेचा आनंद द्विगुणित होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:10 IST

देवपूजा हा देवाशी एकप्रकारे संवाद असतो, तो कसा असायला हवा.. वाचा!

आपण दररोज एक उपचार म्हणून करत असलेली देवपूजा, ही भगवंतासाठी नसून आपल्यासाठी असते, हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. पूजा हे 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' राहण्याचे निमित्त असते. जीव आणि शिवाचा संवाद असतो. पूजा करताना मन एकाग्र होणे अभिप्रेत असते. त्यामुळे मनापासून वाहिलेले एक बिल्वपत्र किंवा फुल भगवंतापर्यंत पोहोचावे, आपण अर्पण केलेला नैवेद्य त्याने ग्रहण करावा, अशी त्यामागील मुख्य भावना असायला हवी.

मात्र प्रत्यक्षात घडते काही वेगळेच! पूजा कोण करणार यावरून नवरा बायकोत वाद होतात. कारण तेवढ्यापुरताही त्यांच्याजवळ वेळ नसतो. धुसफुसत दोघांपैकी एक जण पूजा 'उरकून' घेतो. पूर्वी हे काम घरातले ज्येष्ठ आत्मीयतेने आणि तल्लीनतेने करत असत आणि नातवंड त्यांच्याबरोबर बसून पूजा विधी शिकून घेत असत. परंतु आता तसे होत नाही. ज्या आत्मारामाशी आपला दिवसभरातुन क्षणभरही संवाद घडत नाही, त्याने आपल्या संकटात धावून यावे अशी अवाजवी अपेक्षा मात्र बाळगली जाते आणि त्याने हाक ऐकली नाही की त्यालाच दोषी ठरवले जाते. या चुका टाळण्यासाठी शास्त्राने काही उपाय सुचवले आहेत...

>>देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये. 

>>पूजा झाल्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तींनाही आवर्जून नमस्कार करावा. 

>>जप करताना एका जागी आसन घालून त्यावर शांत बसून करावा. जप माळ धरलेल्या हातावर गॊमुखी धरावी. म्हणजे जप किती बाकी आहे, याकडे वारंवार लक्ष जात नाही. मेरुमणी येईपर्यंत जप पूर्ण होतो. 

>>जप झाल्यावर देवाला मनापासून नमस्कार करावा आणि ज्या जागेवर बसतो, तिथेही भूमिस्पर्श करून नमस्कार करावा. 

>>देवपूजेत तुळशीचे स्थान महत्त्वाचे असले, तरीही द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या आणि रविवार या दिवशी तुळशीची पाने खुडू नयेत. 

>>तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा लावू नये. तो स्वतंत्रपणे प्रज्वलित करावा. 

>>शनिवारी पिंपळाच्या झाडाला कलशभर पाणी घालून प्रदक्षिणा माराव्यात. तसे करणे शुभ मानले जाते. 

>>देव पूजेत, यज्ञविधीत पांढरे तीळ नाही, तर काळ्या तिळांचा वापर करावा. 

>>कोणत्याही धार्मिक प्रसंगी दान दक्षिणा उजव्या हाताने द्यावी. 

>>शंकराला बेल, गणपतीला दुर्वा, विष्णूला तुळस, लक्ष्मीला कमळ असे ज्या देवतेला जे पुष्प प्रिय आहे ते अर्पण करावे. 

>>महाशिवरात्रीचा दिवस वगळता अन्य कोणत्याही दिवशी महादेवाला कुंकू वाहू नये. 

>>देवाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्य झाल्यावर ते घाणीत किंवा गढूळ पाण्यात टाकून न देता बागेतील रोपांना खत म्हणून घालावे आणि पुर्नवापरात आणावे. 

>>पूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला असावे. आपल्या हाताच्या डाव्या बाजूला धूप दीप उदबत्ती ठेवावे आणि उजव्या बाजूला आरतीचे तबक ठेवावे. 

>>देवपूजेत तासनतास घालवणे शास्त्रालाही अभिप्रेत नाही, परंतु जेवढे क्षण आपण देवाच्या सान्निध्यात घालवतो, तेवढे क्षण आपल्याला जगाचा विसर पडावा, हा पूजेचा मुख्य हेतू असतो.