शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 18:20 IST

देव भक्तवत्सल आहे तर संत दीनवत्सल आहेत. देवापेक्षाही संतांची श्रेष्ठता अगाध आहे. त्यांचे औदार्यही श्रेष्ठ आहे..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

संतश्रेष्ठ नामदेव महाराज देव आणि संत यांच्या औदार्याची तुलना करतांना म्हणतात, देवा..! तुझ्यापेक्षाही संत श्रेष्ठ आहेत कारण दान देतांना, कृपा करतांना संतांजवळ आपपर भाव नाही. तू मात्र कसा आहेस..? तर -

घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार ।

अरे.! देवा तू सुदाम्याला सुवर्णनगरी दिली हे खरे पण; पहिल्यांदा तू त्याच्या जवळचे पोहे घेतलेस हे ही तितकेच खरे..! संतश्रेष्ठ नामदेव महाराज तर रोखठोक देवाला विचारतात -

उदाराचा राणा म्हणविसी आपण ।सांग त्वा कवणा काय दिले ॥

अरे..! तूं कुणाला काय दिलेस ती यादी तर मला सांग..? तुझ्यापेक्षा संतांकडे बघ. दधिची ऋषींनी स्वतः आत्मसमर्पण करुन स्वतःची हाडे इंद्राला वज्र तयार करण्यासाठी दिली. बरं जाऊ दे.. देण्याघेण्याचा व्यवहार आपण बाजूला ठेवू. तू स्वतःला देव म्हणवतोस ना.. मग तुझ्याजवळ समत्वदृष्टी तरी कोठे आहे..? तुझ्याजवळ आपपर भाव आहे.

भक्ता राखे पायापाशी । दुर्जनांसी संहारी ॥

तू प्रतिपाळ करतोस तो फक्त भक्तांचा.. दुर्जनांचा मात्र तू नाशच केल्याच्या कथा पुराणांत वर्णन केल्या आहेत. हा सज्जन, हा दुर्जन हा भेदभाव संतांजवळ कुठे आहे..? ते तर दुर्जनांचाही उद्धारच करतात. नारदांना ठार मारावयास निघालेल्या वाल्या कोळ्याचा नारदांनी उद्धारच केला ना..? तो वाल्याचा वाल्मिकी झाला तोच मुळी नारदांसारख्या संतांच्या कृपेमुळे..! उलट पापी, दुराचारी, खल माणसाबद्दल तर संतांच्या मनांत अधिक जिव्हाळा, प्रेम असते. ते देवाजवळ प्रार्थना करतात -

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।

तुकाराम महाराज देखील हाच दाखला देतात -

पुनीत केले विष्णुदासी । संगे आपुलिया दोषी ॥

बरं देवा..! एखादा भक्त तुझी उत्कट भक्ती करुं लागला तर त्याला तूं प्रसन्न होऊन वरदान देतोस.. वरदान देतांना त्यात भक्ताचे कल्याण आहे की अकल्याण आहे याचा कुठलाही विचार तुझ्याजवळ नसावा का रे..?

हिरण्यकश्यपूने वर मागितला, 'मला मृत्यू नको..!' तूं त्याला 'तथास्तू' म्हटलेस.. अरे.! निसर्ग नियमाच्या विरुद्ध असणारा असा हा वर तूं देतोसचं कसा..? संत मात्र असे नाहीत बरं..! ते सच्च्या भक्ताचे कल्याणच करतात. त्याला जन्म मरणाच्या भवचक्रातून तर मुक्त करतातच परंतु 'मी ब्रह्म आहे' या अनुभवस्थितीला नेतात. संतसम्राट ज्ञानदेव महाराज म्हणतात -

कृपाकटाक्षे न्याहाळिले । आपुल्या पदी बसविले ।बाप रखुमा देविवरु विठ्ठले । भक्ता दिधले वरदान ॥

तात्पर्य काय..? तर, देव भक्तवत्सल आहे तर संत दीनवत्सल आहेत. देवापेक्षाही संतांची श्रेष्ठता अगाध आहे. त्यांचे औदार्यही श्रेष्ठ आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक