शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 18:20 IST

देव भक्तवत्सल आहे तर संत दीनवत्सल आहेत. देवापेक्षाही संतांची श्रेष्ठता अगाध आहे. त्यांचे औदार्यही श्रेष्ठ आहे..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

संतश्रेष्ठ नामदेव महाराज देव आणि संत यांच्या औदार्याची तुलना करतांना म्हणतात, देवा..! तुझ्यापेक्षाही संत श्रेष्ठ आहेत कारण दान देतांना, कृपा करतांना संतांजवळ आपपर भाव नाही. तू मात्र कसा आहेस..? तर -

घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार ।

अरे.! देवा तू सुदाम्याला सुवर्णनगरी दिली हे खरे पण; पहिल्यांदा तू त्याच्या जवळचे पोहे घेतलेस हे ही तितकेच खरे..! संतश्रेष्ठ नामदेव महाराज तर रोखठोक देवाला विचारतात -

उदाराचा राणा म्हणविसी आपण ।सांग त्वा कवणा काय दिले ॥

अरे..! तूं कुणाला काय दिलेस ती यादी तर मला सांग..? तुझ्यापेक्षा संतांकडे बघ. दधिची ऋषींनी स्वतः आत्मसमर्पण करुन स्वतःची हाडे इंद्राला वज्र तयार करण्यासाठी दिली. बरं जाऊ दे.. देण्याघेण्याचा व्यवहार आपण बाजूला ठेवू. तू स्वतःला देव म्हणवतोस ना.. मग तुझ्याजवळ समत्वदृष्टी तरी कोठे आहे..? तुझ्याजवळ आपपर भाव आहे.

भक्ता राखे पायापाशी । दुर्जनांसी संहारी ॥

तू प्रतिपाळ करतोस तो फक्त भक्तांचा.. दुर्जनांचा मात्र तू नाशच केल्याच्या कथा पुराणांत वर्णन केल्या आहेत. हा सज्जन, हा दुर्जन हा भेदभाव संतांजवळ कुठे आहे..? ते तर दुर्जनांचाही उद्धारच करतात. नारदांना ठार मारावयास निघालेल्या वाल्या कोळ्याचा नारदांनी उद्धारच केला ना..? तो वाल्याचा वाल्मिकी झाला तोच मुळी नारदांसारख्या संतांच्या कृपेमुळे..! उलट पापी, दुराचारी, खल माणसाबद्दल तर संतांच्या मनांत अधिक जिव्हाळा, प्रेम असते. ते देवाजवळ प्रार्थना करतात -

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।

तुकाराम महाराज देखील हाच दाखला देतात -

पुनीत केले विष्णुदासी । संगे आपुलिया दोषी ॥

बरं देवा..! एखादा भक्त तुझी उत्कट भक्ती करुं लागला तर त्याला तूं प्रसन्न होऊन वरदान देतोस.. वरदान देतांना त्यात भक्ताचे कल्याण आहे की अकल्याण आहे याचा कुठलाही विचार तुझ्याजवळ नसावा का रे..?

हिरण्यकश्यपूने वर मागितला, 'मला मृत्यू नको..!' तूं त्याला 'तथास्तू' म्हटलेस.. अरे.! निसर्ग नियमाच्या विरुद्ध असणारा असा हा वर तूं देतोसचं कसा..? संत मात्र असे नाहीत बरं..! ते सच्च्या भक्ताचे कल्याणच करतात. त्याला जन्म मरणाच्या भवचक्रातून तर मुक्त करतातच परंतु 'मी ब्रह्म आहे' या अनुभवस्थितीला नेतात. संतसम्राट ज्ञानदेव महाराज म्हणतात -

कृपाकटाक्षे न्याहाळिले । आपुल्या पदी बसविले ।बाप रखुमा देविवरु विठ्ठले । भक्ता दिधले वरदान ॥

तात्पर्य काय..? तर, देव भक्तवत्सल आहे तर संत दीनवत्सल आहेत. देवापेक्षाही संतांची श्रेष्ठता अगाध आहे. त्यांचे औदार्यही श्रेष्ठ आहे..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक