शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

कामातले अडथळे दूर व्हावेत यासाठी घराबाहेर पडताना 'हे' उपाय नक्की करा; काम होणारच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 15:56 IST

परंपरेने हे उपाय आपल्या घरात होत होते, श्रद्धेने आपणही करू आणि कामं मार्गी लावू!

महत्त्वाच्या कामाला निघताना मनात शेकडो शंका कुशंका येतात. काम होईल का? संबंधित व्यक्ती भेटेल का? कामाला गती मिळेल का? कामात अडथळे येतील का? असे नानाविध प्रश्न उपस्थित राहिले, की मनात शंकेची पाल चुकचुकते. नुसत्या विचाराने आपण गर्भगळीत होतो आणि भीतीने कामाची चालढकल करत आजचे काम उद्यावर रेटतो. परंतु, वेळेला अतिशय महत्त्व असते. निघून गेलेली वेळ आणि हातातून निसटलेली संधी परत येत नसते. म्हणून आत्मविश्वासाने कामाची सुरुवात करा आणि सोबतच पुढील उपाय करा. कामात अडचणी येणार नाहीत.

>>कामात अडथळे येण्यामागे अनेकदा कारणीभूत असते, ती म्हणजे ग्रहदशा. काम अधिकच महत्त्वाचे असेल, तर घराबाहेर निघण्याआधी पंचांगात किंवा दिनदर्शिकेत राहू काळ तपासून घ्यावा. राहू काळात कामासाठी बाहेर पडू नये. राहू काळ सुरू होण्याआधी किंवा झाल्यानंतर कामाची सुरुवात करावी. सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत राहू काळ असतो आणि तो साधारण दीड तासांचा असतो. 

>>ज्या दिशेने प्रवास करणार आहात, ती दिशा प्रवासासाठी योग्य आहे की नाही, हे देखील दैनिक पंचांगात दिलेले असते. त्याला दिशाशूल म्हणतात. त्यावर उपायही दिलेले असतात. म्हणून पंचांग पाहण्याचा रोज सराव ठेवला पाहिजे आणि पंचांग कसे पाहावे हे शिकून घेतले पाहिजे. 

>>एखाद्या कामाचा निकाल, खरेदी, बोलणी असे काही प्रसंग असतील, तर घराबाहेर निघताना एक चमचा दही साखर खाऊन निघा.

>>कामाला गती मिळावी, म्हणून घरातून निघताना पोळीचे तुकडे कावळ्याला किंवा कुत्र्याला खाऊ घालावे. 

>>बाप्पाच्या नावाने सर्व प्रकारची कार्यसिद्धी होते. म्हणून बाप्पा मोरया म्हणून बाहेर पडावे. तसेच दाराबाहेर पडल्यावर ज्या बाजूला जायचे आहे त्याच्या विरुद्ध दिशेने चार पावले मागे उलट चालावे.मग पुढे जावे.

>>पूर्वी घरी आलेल्या माणसाला गुळ पाणी देण्याची प्रथा होती. तसेच कामाला जाताना गुळ पाणी घेऊन निघावे.

>>महत्त्वाच्या कामालाच नाही, तर एरव्हीसुद्धा तुळशीचे पान खाऊन बाहेर पडणे शुभ मानले जाते. 

>>आपल्या इष्ट देवतेची पूजा करून बाहेर पडावे.    

>>तसेच स्वमुख पाहणेदेखील शुभ मानले जाते. स्वत:ला आरशात पाहून आपला आत्मविश्वास दुणावतो आणि कार्यपूर्तीचे बळ मिळते.

>>कामासाठी बाहेर पडल्यावर मागे फिरून पाहू नये. पुढेच मार्गक्रमणा करावी.