शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बायकांच्या पोटात काहीच राहणार नाही, हा शाप कधी आणि कोणाला मिळाला? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 15:28 IST

गोपनीयता ठेवता न येणं हा बायकांचा स्वभाव नाही तर त्यांना मिळालेला शाप आहे, पण कोणामुळे आणि कोणी दिला? जाणून घेण्यासाठी वाचा ही कथा!

एखादी गोष्ट कोणी सांगू नको म्हटल्यावर कधी एकदा ती दुसऱ्याला जाऊन सांगते, असं बायकांच्या बाबतीत नेहमी घडतं! गोपनीयता ठेवणं हे त्यांच्या स्वभावातच नाही, की त्यांना मिळालेल्या शापामुळे तसे करणे शक्य होत नाही? जाणून घेऊ त्यामागची महाभारतातील कथा!

कुरुक्षेत्रावर युद्ध संपलं. पांडवांचा विजय झाला. मात्र युद्धात मृत्यमुखी पडलेल्या आप्तेष्टांचा अर्थात नातेवाईकांचा अंत्यसंस्कार करण्याची युधिष्ठिरावर वेळ आली. युधिष्ठिराने तर्पण करायला सुरुवात केली तेव्हा न राहवून माता कुंती म्हणाली, युधिष्ठिरा, कर्णाचेही तर्पण कर...

युधिष्ठिर काही बोलणार तोच माता कुंती म्हणाली, 'कर्ण तुझा मोठा भाऊ होता...हे गुपित मी आजवर कोणालाच बोलले नाही, कारण...' 

असे म्हणत माता कुंतीने विवाहापूर्वी सूर्यदेवाच्या आशीर्वादाने मिळालेल्या मंत्राच्या उच्चारणामुळे झालेल्या पुत्राची कथा सांगितली. समाज त्याचा स्वीकार कारणार नाही म्हणून मी गंगा नदीत त्याला सोडून दिले हेही सांगितले. 

यावर युधिष्ठिर रागावून म्हणाला, 'कर्ण आमचा मोठा भाऊ होता हे आधीच कळलं असतं तर आम्ही सन्मानाने त्याला नमस्कार केला असता आणि तेव्हाच युद्ध थांबलं असतं किंवा झालं नसतं. मात्र एवढं मोठं गुपित तू पोटात ठेवलंस... त्यामुळे माझा शाप आहे... की यापुढे कोणतीही स्त्री कोणतेही गुपित फार काळ पोटात ठेवू शकणार नाही. ती कधी ना कधी कोणाला ना कोणाला ते सांगून मोकळी होईल, पण लपवू शकणार नाही.' 

या कथेमुळेच की काय बायकांना मनातलं सगळं कुणाला ना कुणाला जाऊन सांगण्याची उर्मी थांबवता येत नाही. 

टॅग्स :MahabharatमहाभारतWomenमहिला