शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

बायकांच्या पोटात काहीच राहणार नाही, हा शाप कधी आणि कोणाला मिळाला? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 15:28 IST

गोपनीयता ठेवता न येणं हा बायकांचा स्वभाव नाही तर त्यांना मिळालेला शाप आहे, पण कोणामुळे आणि कोणी दिला? जाणून घेण्यासाठी वाचा ही कथा!

एखादी गोष्ट कोणी सांगू नको म्हटल्यावर कधी एकदा ती दुसऱ्याला जाऊन सांगते, असं बायकांच्या बाबतीत नेहमी घडतं! गोपनीयता ठेवणं हे त्यांच्या स्वभावातच नाही, की त्यांना मिळालेल्या शापामुळे तसे करणे शक्य होत नाही? जाणून घेऊ त्यामागची महाभारतातील कथा!

कुरुक्षेत्रावर युद्ध संपलं. पांडवांचा विजय झाला. मात्र युद्धात मृत्यमुखी पडलेल्या आप्तेष्टांचा अर्थात नातेवाईकांचा अंत्यसंस्कार करण्याची युधिष्ठिरावर वेळ आली. युधिष्ठिराने तर्पण करायला सुरुवात केली तेव्हा न राहवून माता कुंती म्हणाली, युधिष्ठिरा, कर्णाचेही तर्पण कर...

युधिष्ठिर काही बोलणार तोच माता कुंती म्हणाली, 'कर्ण तुझा मोठा भाऊ होता...हे गुपित मी आजवर कोणालाच बोलले नाही, कारण...' 

असे म्हणत माता कुंतीने विवाहापूर्वी सूर्यदेवाच्या आशीर्वादाने मिळालेल्या मंत्राच्या उच्चारणामुळे झालेल्या पुत्राची कथा सांगितली. समाज त्याचा स्वीकार कारणार नाही म्हणून मी गंगा नदीत त्याला सोडून दिले हेही सांगितले. 

यावर युधिष्ठिर रागावून म्हणाला, 'कर्ण आमचा मोठा भाऊ होता हे आधीच कळलं असतं तर आम्ही सन्मानाने त्याला नमस्कार केला असता आणि तेव्हाच युद्ध थांबलं असतं किंवा झालं नसतं. मात्र एवढं मोठं गुपित तू पोटात ठेवलंस... त्यामुळे माझा शाप आहे... की यापुढे कोणतीही स्त्री कोणतेही गुपित फार काळ पोटात ठेवू शकणार नाही. ती कधी ना कधी कोणाला ना कोणाला ते सांगून मोकळी होईल, पण लपवू शकणार नाही.' 

या कथेमुळेच की काय बायकांना मनातलं सगळं कुणाला ना कुणाला जाऊन सांगण्याची उर्मी थांबवता येत नाही. 

टॅग्स :MahabharatमहाभारतWomenमहिला