शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

जेव्हा मदतीचे सगळे दोर तुटतात, तेव्हाच लढण्याची जिद्द बळावते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 13:57 IST

भावनिक प्रसंगी कमकुवत न होता, काहीही न झाल्यासारखे उठा आणि सज्ज व्हा.

लहान मुलांची एक गंमत माहितीये का? ते जेव्हा पडतात, तेव्हा ते सभोवताली बघतात, कोणी त्यांना पडताना पाहिले, तर रडारड करतात नाहीतर आपण आपले उठून खेळायला लागतात. मोठ्या माणसांच्या बाबतीतही तेच घडते. दुःख सहन करण्याची क्षमता प्रत्येकात असते, पण कोणी सांत्वन करू लागले की आपण जास्तच रडू लागतो. म्हणून भावनिक प्रसंगी कमकुवत न होता, काहीही न झाल्यासारखे उठा आणि सज्ज व्हा. अगदी या कथेतल्या राजासारखे!

दोन देशांमध्ये युद्ध छेडले गेले होते. चहू बाजूंनी आक्रमण होत होते. प्रजेला नुकसान नको, म्हणून अपयशी होत चाललेला राजा आपल्या सैन्याला घेऊन शत्रूवर हल्ला करण्यासाठी त्याच्या सीमाभागात जाण्याची तयारी करू लागला. शत्रू बेसावध असताना राजा आणि सैन्याने एका भल्या मोठ्या जहाजातुन समुद्र मार्गे शत्रू देशात प्रवेश केला. शत्रूच्या सैन्याच्या तुलनेत राजाकडचे सैन्य कमी होते. सगळे जण शत्रूच्या सीमाभागात सुखरुप आल्यावर राजाने ते जहाज जाळून टाकायला सांगितले. सैनिकांना प्रश्न पडला. उद्या पूर्ण पराभव झाला, तर तो परतीचा एकमेव मार्ग होता. परंतु राजाची आज्ञा होती. 

जहाज जाळून टाकण्यात आले. भल्या पहाटेची वेळ होती. शत्रू झोपेत होता. त्यावेळेस राजाने आपल्या सैन्याला गोळा केले व सांगितले, शत्रूच्या तुलनेत आपली सैन्यसंख्या कमी आहे, परंतु आपले सैन्य त्यांच्या सैन्याच्या तुलनेत कणभर सरस आहे. आता आपले परतीचे मार्ग संपलेले आहेत, नव्हे मी ते मुद्दाम संपवले आहेत. आता 'जिंकू किंवा मरू' एवढाच आपल्यासमोर पर्याय आहे. तुम्ही लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी माझ्यासोबत आहात?'

सर्व सैन्याचे बाहू स्फुरण पावले आणि सर्वांनी एका ताकदीने, एका सुराने हो म्हटले आणि घनघोर युद्ध झाले. जिवाच्या आकांताने लढणाऱ्या सैनिकांनी शत्रूचा धुव्वा उडवला आणि विजयश्री मिळवली. नवीन देशावर आपला ध्वज फडकावून सगळे सन्मानाने मायदेशी परतले. 

तात्पर्य हेच, की कधी कधी आपल्यालाही आशेचे, परावलंबित्त्वाचे दोर तोडावे लागतात. स्वावलंबी होऊन दिलेला लढा जिंकण्याची जिद्द निर्माण करतो. हे युद्ध आपण रोजच लढतो. फक्त त्यात अभाव असतो स्वावलंबित्वाचा आणि जिद्दीचा!