शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाला कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये? धर्मशास्त्र काय सांगते वाचा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 12:21 IST

अलीकडे वाढदिवसाला जे बीभत्स रूप आले आहे. ते पाहता धर्मशास्त्राने घालून दिलेले नियम आणि त्यामागची कारणीमिमांसा यांची आठवण करून देणे अपरिहार्य ठरत आहे. 

अलीकडे सगळ्याच बाबतीत पाश्चात्यांचे अनुकरण करण्याची आपल्याला सवय लागली आहे. वाढदिवसासारखा आनंदाचा दिवस, तोही पार्टी करत आपण बाहेर घालवतो. पूर्वी घरगुती स्वरूपात आप्त नातलगांबरोबर वाढदिवस साजरा केला जाई. आई, आजी, ताई औक्षण करत असे. त्यांच्याकडून मिळालेले पाच पन्नास रुपये, वडिलांनी दिलेले नवे कपडे, सायकल, खेळणी, पुस्तक हे मोठ्या गिफ्ट पेक्षा बहुमूल्य वाटत असे. सकाळी देव दर्शन, संध्याकाळी गोड धोड जेवणाचा बेत, शाळेत शिक्षकांच्या आणि वर्ग मित्रांच्या शुभेच्छा यामुळे वाढदिवस आनंदात साजरा होत असे. मात्र अलीकडे वाढदिवसाला जे बीभत्स रूप आले आहे. ते पाहता धर्मशास्त्राने घालून दिलेले नियम आणि त्यामागची कारणीमिमांसा यांची आठवण करून देणे अपरिहार्य ठरत आहे. 

धर्मशास्त्र सांगते :

वाढदिवस हा केवळ गोड धोड खाण्याचा दिवस नाही, तर आयुष्यात एक एक टप्पा पुढे सर करत असताना वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. बालपणी जबाबदाऱ्यांचे भान नसते, परंतु कळत्या वयापासून आपल्याला वाढदिवसाच्या दिवशी सिंहावलोकन करून आयुष्याची बेरीज वजाबाकी करणे गरजेचे आहे. यासाठीच बालपणी संस्कार महत्त्वाचे आहेत. ते संस्कार पुढील प्रमाणे- 

>>वाढदिवस रात्री साजरा करण्याऐवजी नेहमी सूर्योदयात साजरा करावा. सूर्य नारायण उगवल्यावर सर्व प्रथम लवकर उठून स्नान वगैरे करून सूर्यदेवाला नमस्कार करावा.

>>वाढदिवस तारखेनुसार नाही तर तिथीनुसार साजरा केला पाहिजे. त्या तिथीला वाहणारी ऊर्जा आपल्या शरीरात असलेल्या लहरींशी अगदी जवळून जुळते. म्हणून तिथीला वाढदिवस साजरा करावा. घरातल्या मोठ्यांचे तसेच गुरुजनांचे आशीर्वाद घ्यावेत, देवदर्शन घ्यावे. 

>>घरातल्या माता भगिनींनी औक्षण करून दिर्घआयुष्याचा आशीर्वाद द्यावा. आपली संस्कृती दिवा लावायला शिकवते, विझवायला नाही. कारण आपण अग्नी पूजा करतो आणि अग्नी प्रज्वलीत करणे शुभ मानतो. 

>>वाढदिवसाच्या दिवशी यथाशक्ती दानधर्म करावा. धार्मिक तसेच समाज कार्याला आर्थिक हातभार लावावा. अन्नदान करावे. 

>>नवे कपडे ही केवळ हौस नाही तर त्यामुळे पुढच्या आयुष्याकडे नव्याने बघण्याची ऊर्जा मिळावी असा त्यामागचा संकेत आहे. 

>>वाढदिवसाच्या दिवशी सात्विक भोजन करावे आणि उत्तर आयुष्यातही शाकाहार तसेच सात्विक आहाराचा आग्रह धरावा. त्यामुळे आपले विचार सात्विक बनतात. 

वाढदिवसाला काय करू नये? 

>>वाढदिवसाला रात्री बारा वाजता केक कापण्याची फॅशन झाली आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री १२ वाजता तारीख बदलत असली तरी हिंदू पंचांगानुसार सूर्योदयानंतर नवा दिवस सुरु होतो. म्हणून आपण आपल्याच संस्कृतीचा आग्रह धरला पाहिजे. कारण कोणतेही शुभ कार्य उजेडात करावे, अंधारात नाही, असे त्यामागचे तत्त्वज्ञान आहे. 

>>केक ऐवजी दुसरे एखादे पक्वान्न करावे आणि केक कापणार असल्यास मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा करू नये. 

>>दिव्याच्या अखंड ज्योतीप्रमाणे आपले आयुष्य उजळून निघावे असे वाटत असेल तर दिवा विझवू नये उलट ज्येष्ठ भगिनींकडून औक्षण करून घ्यावे. 

>>एक खास गोष्ट लक्षात ठेवा की वाढदिवसाच्या दिवशी केस कापू नयेत. केस कापणे हा स्वच्छतेचा एक भाग असला तरी हा दिवस त्या कामासाठी निवडू नये.