शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

रामलला प्राणप्रतिष्ठा; ‘यम नियम’ म्हणजे काय? PM मोदींनी सुरू केले ११ दिवसांचे विशेष व्रत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 09:35 IST

Ayodhya Ram Mandir: रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवसांच्या विशेष व्रताचरणाला प्रारंभ केला आहे.

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासाठी तयारी सुरू केली असून, ११ दिवसांचे विशेष व्रताचरण सुरू केले आहे. याबाबत स्वतः पंतप्रधान मोदी यांनी माहिती दिली होती. यामध्ये यम नियमांचे पालन केले जाणार आहे. 

आध्यात्मिक प्रवासातील काही तपस्वी आणि महापुरुषांकडून मला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार तसेच त्यांनी सुचविलेल्या यम-नियमांनुसार ११ दिवसांचा विशेष विधी सुरू करत आहे. या पवित्र प्रसंगी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. ऋषी, मुनी आणि तपस्वी यांच्या सद्गुणांचे स्मरण करतो. आणि भगवंताचे रूप असलेल्या लोकांकडे प्रार्थना करतो की, मला आशीर्वाद द्यावेत. जेणेकरून मनापासून वचनबद्ध झाल्याने माझ्या कर्माचरणात कोणतीही कमतरता राहू नये, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. यात सांगितलेला यम नियम म्हणजे नेमके काय?

‘यम नियम’ म्हणजे काय?

धार्मिक ग्रंथ आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणारे तज्ज्ञ पंडित राजकुमार मिश्रा यांच्या मते, केवळ प्राणप्रतिष्ठेपुरते नाही तर कोणत्याही यज्ञ किंवा सोहळ्यास जाण्यापूर्वी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या केंद्रित राहण्यासाठी यम नियमाचे पालन करण्याचे विधान आहे. शास्त्रामध्ये अष्टांग योगाच्या ८ अंगांपैकी प्रथम यम आणि नंतर नियम यांचे स्पष्टीकरण दिले आहे. यमाचे पाच प्रकार आहेत - अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. म्हणजेच मन, शब्द आणि कृतीने अहिंसा आणि सत्याचे पालन करा, अस्तेय म्हणजेच चोरीचा त्याग करून ब्रह्मचर्य पाळा. आता पाच नियम असे आहेत की, सर्व प्रथम शुचिता असणे आवश्यक आहे. म्हणजे स्वच्छता, समाधानाची भावना, तपस्या आणि जप म्हणजेच प्रणव मंत्राचा जप-जाप, धार्मिक शास्त्रांचा स्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधान म्हणजेच पूर्ण श्रद्धा. आत्मसंयमाचे हे टप्पे पार केल्यानंतर, एखादी व्यक्ती शास्त्रोक्तपणे दीक्षा घेण्यास किंवा यजमान बनून यज्ञ किंवा विधी करण्यास पात्र बनते, असे शास्त्र सांगते.

दरम्यान, नाशिक धाम-पंचवटी येथून माझ्या ११ दिवसांच्या व्रताची सुरुवात करत आहे, हे माझे भाग्य आहे. पंचवटी ही पवित्र भूमी आहे जिथे भगवान श्रीराम बराच काळ वास्तव्यास होते. आणि माझ्यासाठी योगायोग आहे की, स्वामी विवेकानंदांची जयंती आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३