शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गर्भाधान संस्कार कशाला म्हणतात, त्याचे लाभ काय आणि महत्त्व काय? सविस्तर जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 19:10 IST

संतती जन्माला घालताना अर्थात गर्भाधान संस्कार करताना पुढील गोष्टी लक्षात घेतल्या तर सुसंस्कृत पिढी जन्माला येऊ शकेल.

>> आदित्य राजन जोशी

गर्भाधान संस्कार म्हणजे काय तर स्त्री-पुरुषाचा विवाह अत्यंत महत्त्वाचा मानून, संभोगाच्या कृतीतून स्त्रीच्या गर्भधारणेच्या प्रक्रियेला गर्भाधान असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये स्त्रीचे रज आणि पुरुषाचे वीर्य यांच्या मिलनातून स्त्रीच्या गर्भाशयात एक नवीन जीव बनतो, जो ती नऊ महिने तिच्या गर्भाशयात धारण करते. या प्रक्रियेला गर्भाधान संस्कार म्हणतात.

रजोदर्शनापासुन १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होउ शकतो.या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासुन पहील्या चार रात्री वर्ज्य कराव्या.अशुभ दिवस,ग्रहणदिवस,कुयोग त्या दिवशी असु नये. राजोदर्शनापासून पहिल्या चार, अकरावी आणि तेरावी रात्र सोडून शेष दहा रात्री या संस्कारास योग्य समजाव्या. कित्येकदा ‘चौथा दिवसही घ्यावा’, असे म्हणतात. गर्भाधानसंस्कारास चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, अमावास्या आणि पौर्णिमा या तिथी वर्ज्य कराव्यात. उर्वरित कोणत्याही तिथीस आणि सोमवार, गुरुवार, शुक्रवार या वारी, श्रवण, रोहिणी, हस्त, अनुराधा, स्वाती, रेवती,  उत्तरा, शततारका या नक्षत्री उत्तम चंद्रबळ पाहून गर्भाधानविधी करावा.

 गर्भाधान विधी खालीलप्रमाणे 

प्रथम संकल्प, गणपती पूजन , पुण्याहवाचन , मातृका पूजन, नांदीश्राद्ध , प्रधानाज्य होम, अग्नी सूर्य यांचे स्थवन करून अश्वगंधा अथवा दुर्वा यांचा रस स्त्रीच्या उजव्या नाकपुडीत पिळला जातो. या नंतर स्त्रीची ओटी भरतात. अश्या प्रकारे गर्भाधान संस्कार पूर्ण होतो. आपल्या कुलपुरोहित किंवा  वेद शास्त्र संपन्न गुरुजींकडून या विधी विषयी बाकीची माहिती घ्यावी.

विकासाची प्रक्रिया गर्भधारणेच्या क्षणापासून सुरू होते. एक भ्रूण कोशिका जी बीजांड आणि शुक्राणूंच्या मिलनाने तयार होते, ज्यामध्ये सर्व अनुवांशिक माहिती कोड केली जाते, ज्यामुळे काही काळानंतर संपूर्ण मानव (जीव) तयार होतो. शुभ मुहूर्तावर गर्भाधान संस्कार केल्याने सुंदर, निरोगी, तल्लख, गुणवान, हुशार, प्रतिभावान आणि दीर्घायुष्य लाभलेले बालक जन्माला येते. म्हणूनच या पहिल्या संस्काराला खूप महत्त्व आहे.

सुप्रजा सिद्धांताप्रमाणे योग्य गर्भधारणेच्या दृष्टीने गर्भधारणेच्या अगोदर पिंडशुद्धी होणे आवश्यक असते कारण चांगल्या बीजशक्तीमुळेच चांगली संतती निर्माण होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, 

शुद्ध बीजापोटी ! फळे रसाळ गोमटी !!मुखी अमृताची वाणी ! देह देवाचे कारणी !!सर्वांग निर्मळ ! चित्त जैसे गंगाजळ !!

लहानपणापासुन या अभंगातील पहील्या ओळी प्रत्येकानेच ऐकल्या असतील.संत तुकारामांचे अभंग म्हनजे उत्तम अशी उपदेशात्मक सुभाषिते होत.जी बालपणापासुनच आपल्या कानावर पडतात.सदरील अभंगातुन तुकारामांनी बिजाचे आणि संस्काराचे महत्व सांगीतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात की बीज( बियाणे )जर शुद्ध असेल,कसदार,संस्कारी असेल तर त्या झाडाला फळेही गोमटी म्हनजे चांगलीच येणार.आणि ती फळे रसाळ आणि गोडच असणार.जर बीज किडके असेल कमकुवत असेल तर त्या बिजापासुन बनलेले झाड आणि त्याला येणारी फळे ही सुद्धा कमकुवतच निपजतात.या बिजाप्रमाणेच जर माणुस संस्कारी असेल.निर्व्यसनी,पुण्यवान,शिलवान, चारित्र्यवान शुद्ध असेल तर त्याच्या पोटी जन्मणारी संततीही गोमटी आणि शिलवान,चारिञ्यवान,संस्कारी निपजेल.त्यामुळे माणसाच्या मुखात नेहमी अमृताची वाणी असावी.माणसाने नेहमी गोड बोलावे.हे शरीर ईश्वर भक्तीत लिन असावे माणसाचे मन आणि शरीर गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ आणि शुद्ध असले पाहीजे.

गर्भाधानाचा अर्थ पुढच्या भागात जाणून घेऊ...!

(क्रमश: )