शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

गर्भाधान संस्कार कशाला म्हणतात, त्याचे लाभ काय आणि महत्त्व काय? सविस्तर जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 19:10 IST

संतती जन्माला घालताना अर्थात गर्भाधान संस्कार करताना पुढील गोष्टी लक्षात घेतल्या तर सुसंस्कृत पिढी जन्माला येऊ शकेल.

>> आदित्य राजन जोशी

गर्भाधान संस्कार म्हणजे काय तर स्त्री-पुरुषाचा विवाह अत्यंत महत्त्वाचा मानून, संभोगाच्या कृतीतून स्त्रीच्या गर्भधारणेच्या प्रक्रियेला गर्भाधान असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये स्त्रीचे रज आणि पुरुषाचे वीर्य यांच्या मिलनातून स्त्रीच्या गर्भाशयात एक नवीन जीव बनतो, जो ती नऊ महिने तिच्या गर्भाशयात धारण करते. या प्रक्रियेला गर्भाधान संस्कार म्हणतात.

रजोदर्शनापासुन १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होउ शकतो.या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासुन पहील्या चार रात्री वर्ज्य कराव्या.अशुभ दिवस,ग्रहणदिवस,कुयोग त्या दिवशी असु नये. राजोदर्शनापासून पहिल्या चार, अकरावी आणि तेरावी रात्र सोडून शेष दहा रात्री या संस्कारास योग्य समजाव्या. कित्येकदा ‘चौथा दिवसही घ्यावा’, असे म्हणतात. गर्भाधानसंस्कारास चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, अमावास्या आणि पौर्णिमा या तिथी वर्ज्य कराव्यात. उर्वरित कोणत्याही तिथीस आणि सोमवार, गुरुवार, शुक्रवार या वारी, श्रवण, रोहिणी, हस्त, अनुराधा, स्वाती, रेवती,  उत्तरा, शततारका या नक्षत्री उत्तम चंद्रबळ पाहून गर्भाधानविधी करावा.

 गर्भाधान विधी खालीलप्रमाणे 

प्रथम संकल्प, गणपती पूजन , पुण्याहवाचन , मातृका पूजन, नांदीश्राद्ध , प्रधानाज्य होम, अग्नी सूर्य यांचे स्थवन करून अश्वगंधा अथवा दुर्वा यांचा रस स्त्रीच्या उजव्या नाकपुडीत पिळला जातो. या नंतर स्त्रीची ओटी भरतात. अश्या प्रकारे गर्भाधान संस्कार पूर्ण होतो. आपल्या कुलपुरोहित किंवा  वेद शास्त्र संपन्न गुरुजींकडून या विधी विषयी बाकीची माहिती घ्यावी.

विकासाची प्रक्रिया गर्भधारणेच्या क्षणापासून सुरू होते. एक भ्रूण कोशिका जी बीजांड आणि शुक्राणूंच्या मिलनाने तयार होते, ज्यामध्ये सर्व अनुवांशिक माहिती कोड केली जाते, ज्यामुळे काही काळानंतर संपूर्ण मानव (जीव) तयार होतो. शुभ मुहूर्तावर गर्भाधान संस्कार केल्याने सुंदर, निरोगी, तल्लख, गुणवान, हुशार, प्रतिभावान आणि दीर्घायुष्य लाभलेले बालक जन्माला येते. म्हणूनच या पहिल्या संस्काराला खूप महत्त्व आहे.

सुप्रजा सिद्धांताप्रमाणे योग्य गर्भधारणेच्या दृष्टीने गर्भधारणेच्या अगोदर पिंडशुद्धी होणे आवश्यक असते कारण चांगल्या बीजशक्तीमुळेच चांगली संतती निर्माण होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, 

शुद्ध बीजापोटी ! फळे रसाळ गोमटी !!मुखी अमृताची वाणी ! देह देवाचे कारणी !!सर्वांग निर्मळ ! चित्त जैसे गंगाजळ !!

लहानपणापासुन या अभंगातील पहील्या ओळी प्रत्येकानेच ऐकल्या असतील.संत तुकारामांचे अभंग म्हनजे उत्तम अशी उपदेशात्मक सुभाषिते होत.जी बालपणापासुनच आपल्या कानावर पडतात.सदरील अभंगातुन तुकारामांनी बिजाचे आणि संस्काराचे महत्व सांगीतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात की बीज( बियाणे )जर शुद्ध असेल,कसदार,संस्कारी असेल तर त्या झाडाला फळेही गोमटी म्हनजे चांगलीच येणार.आणि ती फळे रसाळ आणि गोडच असणार.जर बीज किडके असेल कमकुवत असेल तर त्या बिजापासुन बनलेले झाड आणि त्याला येणारी फळे ही सुद्धा कमकुवतच निपजतात.या बिजाप्रमाणेच जर माणुस संस्कारी असेल.निर्व्यसनी,पुण्यवान,शिलवान, चारित्र्यवान शुद्ध असेल तर त्याच्या पोटी जन्मणारी संततीही गोमटी आणि शिलवान,चारिञ्यवान,संस्कारी निपजेल.त्यामुळे माणसाच्या मुखात नेहमी अमृताची वाणी असावी.माणसाने नेहमी गोड बोलावे.हे शरीर ईश्वर भक्तीत लिन असावे माणसाचे मन आणि शरीर गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ आणि शुद्ध असले पाहीजे.

गर्भाधानाचा अर्थ पुढच्या भागात जाणून घेऊ...!

(क्रमश: )