शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

गर्भाधान संस्कार कशाला म्हणतात, त्याचे लाभ काय आणि महत्त्व काय? सविस्तर जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 19:10 IST

संतती जन्माला घालताना अर्थात गर्भाधान संस्कार करताना पुढील गोष्टी लक्षात घेतल्या तर सुसंस्कृत पिढी जन्माला येऊ शकेल.

>> आदित्य राजन जोशी

गर्भाधान संस्कार म्हणजे काय तर स्त्री-पुरुषाचा विवाह अत्यंत महत्त्वाचा मानून, संभोगाच्या कृतीतून स्त्रीच्या गर्भधारणेच्या प्रक्रियेला गर्भाधान असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये स्त्रीचे रज आणि पुरुषाचे वीर्य यांच्या मिलनातून स्त्रीच्या गर्भाशयात एक नवीन जीव बनतो, जो ती नऊ महिने तिच्या गर्भाशयात धारण करते. या प्रक्रियेला गर्भाधान संस्कार म्हणतात.

रजोदर्शनापासुन १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होउ शकतो.या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासुन पहील्या चार रात्री वर्ज्य कराव्या.अशुभ दिवस,ग्रहणदिवस,कुयोग त्या दिवशी असु नये. राजोदर्शनापासून पहिल्या चार, अकरावी आणि तेरावी रात्र सोडून शेष दहा रात्री या संस्कारास योग्य समजाव्या. कित्येकदा ‘चौथा दिवसही घ्यावा’, असे म्हणतात. गर्भाधानसंस्कारास चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, अमावास्या आणि पौर्णिमा या तिथी वर्ज्य कराव्यात. उर्वरित कोणत्याही तिथीस आणि सोमवार, गुरुवार, शुक्रवार या वारी, श्रवण, रोहिणी, हस्त, अनुराधा, स्वाती, रेवती,  उत्तरा, शततारका या नक्षत्री उत्तम चंद्रबळ पाहून गर्भाधानविधी करावा.

 गर्भाधान विधी खालीलप्रमाणे 

प्रथम संकल्प, गणपती पूजन , पुण्याहवाचन , मातृका पूजन, नांदीश्राद्ध , प्रधानाज्य होम, अग्नी सूर्य यांचे स्थवन करून अश्वगंधा अथवा दुर्वा यांचा रस स्त्रीच्या उजव्या नाकपुडीत पिळला जातो. या नंतर स्त्रीची ओटी भरतात. अश्या प्रकारे गर्भाधान संस्कार पूर्ण होतो. आपल्या कुलपुरोहित किंवा  वेद शास्त्र संपन्न गुरुजींकडून या विधी विषयी बाकीची माहिती घ्यावी.

विकासाची प्रक्रिया गर्भधारणेच्या क्षणापासून सुरू होते. एक भ्रूण कोशिका जी बीजांड आणि शुक्राणूंच्या मिलनाने तयार होते, ज्यामध्ये सर्व अनुवांशिक माहिती कोड केली जाते, ज्यामुळे काही काळानंतर संपूर्ण मानव (जीव) तयार होतो. शुभ मुहूर्तावर गर्भाधान संस्कार केल्याने सुंदर, निरोगी, तल्लख, गुणवान, हुशार, प्रतिभावान आणि दीर्घायुष्य लाभलेले बालक जन्माला येते. म्हणूनच या पहिल्या संस्काराला खूप महत्त्व आहे.

सुप्रजा सिद्धांताप्रमाणे योग्य गर्भधारणेच्या दृष्टीने गर्भधारणेच्या अगोदर पिंडशुद्धी होणे आवश्यक असते कारण चांगल्या बीजशक्तीमुळेच चांगली संतती निर्माण होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, 

शुद्ध बीजापोटी ! फळे रसाळ गोमटी !!मुखी अमृताची वाणी ! देह देवाचे कारणी !!सर्वांग निर्मळ ! चित्त जैसे गंगाजळ !!

लहानपणापासुन या अभंगातील पहील्या ओळी प्रत्येकानेच ऐकल्या असतील.संत तुकारामांचे अभंग म्हनजे उत्तम अशी उपदेशात्मक सुभाषिते होत.जी बालपणापासुनच आपल्या कानावर पडतात.सदरील अभंगातुन तुकारामांनी बिजाचे आणि संस्काराचे महत्व सांगीतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात की बीज( बियाणे )जर शुद्ध असेल,कसदार,संस्कारी असेल तर त्या झाडाला फळेही गोमटी म्हनजे चांगलीच येणार.आणि ती फळे रसाळ आणि गोडच असणार.जर बीज किडके असेल कमकुवत असेल तर त्या बिजापासुन बनलेले झाड आणि त्याला येणारी फळे ही सुद्धा कमकुवतच निपजतात.या बिजाप्रमाणेच जर माणुस संस्कारी असेल.निर्व्यसनी,पुण्यवान,शिलवान, चारित्र्यवान शुद्ध असेल तर त्याच्या पोटी जन्मणारी संततीही गोमटी आणि शिलवान,चारिञ्यवान,संस्कारी निपजेल.त्यामुळे माणसाच्या मुखात नेहमी अमृताची वाणी असावी.माणसाने नेहमी गोड बोलावे.हे शरीर ईश्वर भक्तीत लिन असावे माणसाचे मन आणि शरीर गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ आणि शुद्ध असले पाहीजे.

गर्भाधानाचा अर्थ पुढच्या भागात जाणून घेऊ...!

(क्रमश: )