शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पिशवीत झाकून जपमाळ ओढण्यामागे शास्त्रं काही असतं का? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 13:20 IST

उपासनेचा एक भाग म्हणून काही भाविक जपमाळ पिशवीत झाकून नामजप करतात. धर्मशास्त्राच्या दृष्टीने ते बंधनकारक आहे की ऐच्छिक? चला जाणून घेऊ. 

उपासना करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते.  काही जण मोठमोठ्याने स्तोत्र म्हणतात, काही जण मनातल्या मनात म्हणतात. काही जणांना तास दोन तास पूजा केल्याशिवाय समाधान मिळत नाही तर काही जण देखल्या देवा दंडवत करून मोकळे होतात. व्यक्ती तितक्या प्रकृती! अशात काही नवशिक्यांचा गोंधळ होतो, की उपासनेची नेमकी पद्धत कोणती?

याबाबतीत अनेक संतांनी, आध्यात्त्म मार्गातील अधिकारी पुरुषांनी मार्गदर्शन केलेले आहे. व्याख्याता धनश्री लेले 'सांगे कबीर' या व्याख्यानातून संत कबीरांचे या संदर्भात असलेले विचार मांडतात- साधना गुप्त असावी असे म्हणतात. अर्थात त्याचे प्रदर्शन नको!त्यादृष्टीने अनेक भाविक जपमाळ पिशवीत ठेवून जप करतात. जेणेकरून तो इतरांना कळू नये. वास्तविक पाहता पिशवीतील माळ दिसत नसली तरी जपमाळ ओढणे सुरू असल्याची क्रिया बाहेर प्रत्येकाला कळते. यावरून ती क्रिया गुप्त आहे असे समजावे का? तर संत कबीर म्हणतात, की माळ नुसती घालून उपयोग नाही, ती फिरलीही पाहिजे. फिरणाऱ्या मण्यांबरोबर देवाचं नावंही घेतले गेले पाहिजे. नाव नुसते घेऊन उपयोग नाही तर 'मनका मणका फेर' अर्थात प्रत्येक मण्याबरोबर मनही नाम:स्मरणात गुंतले गेले पाहिजे. 

माला फिरे करमाही, जीभ फिरे मुखमाही मनवा तो चहू दिसी फिरे, ये तो सुमीरन नाही।

म्हणजे हाताने जपमाळ ओढणे सुरु आहे, मुखाने नाव घेणेही सुरू आहे पण मन स्थिर नसेल आणि विषयात गुंतले असेल तर अशा नाम घेण्याचा काहीच उपयोग नाही. कबीरांना अपेक्षित असलेला जप कोणता, तर ' ना जीभ फिरे ना मन डोले' म्हणजेच वरवर नाव न घेता ते इतके मनापासून घेतले गेले पाहिजे की जीभ स्थिर असेल, मन स्थिर असेल तरी नामःस्मरण सुरू असेल. त्यासाठी अनुसंधान हवे. तेही कसे त्याचेही उदाहरण कबीर देतात -

सुमीरन की सुदी यो करे, जो घागर पनिहार, हाले डोले सुरतीमे, कहे कबीर विचार।

ज्याप्रमाणे एखादी स्त्री, डोक्यावर तीन चार घागरींचा भार वाहून नेत रस्त्याने चालत जाते तेव्हा वाटेत तिला अनेक जण भेटतात. त्यांच्याशी ती बोलते. गप्पा मारते. हसते. पण हे सगळं करताना पाण्याचा एक थेंबसुद्धा घागरीतून डचमळू देत नाही. याला म्हणतात अनुसंधान! 

आपल्याला नित्य कर्म करत राहायचे आहे. पण त्याबरोबर सातत्याने भगवंताचे नाव घेत राहायचे आहे. त्यासाठी हातात जपमाळ असो वा नसो, एवढी स्थितप्रज्ञता मिळवायला हवी की जीभ आणि मन स्थिर ठेवूनही नामःस्मरण सुरू राहील! ती स्थिती गाठेपर्यंत नामःस्मरण सातत्याने करत राहणे हाच उपाय आहे. त्यासाठी सुरुवातीला हातात जपमाळ लागेल आणि नंतर मनाची एकतारी सुद्धा पुरेशी ठरेल!