शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पिशवीत झाकून जपमाळ ओढण्यामागे शास्त्रं काही असतं का? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 13:20 IST

उपासनेचा एक भाग म्हणून काही भाविक जपमाळ पिशवीत झाकून नामजप करतात. धर्मशास्त्राच्या दृष्टीने ते बंधनकारक आहे की ऐच्छिक? चला जाणून घेऊ. 

उपासना करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते.  काही जण मोठमोठ्याने स्तोत्र म्हणतात, काही जण मनातल्या मनात म्हणतात. काही जणांना तास दोन तास पूजा केल्याशिवाय समाधान मिळत नाही तर काही जण देखल्या देवा दंडवत करून मोकळे होतात. व्यक्ती तितक्या प्रकृती! अशात काही नवशिक्यांचा गोंधळ होतो, की उपासनेची नेमकी पद्धत कोणती?

याबाबतीत अनेक संतांनी, आध्यात्त्म मार्गातील अधिकारी पुरुषांनी मार्गदर्शन केलेले आहे. व्याख्याता धनश्री लेले 'सांगे कबीर' या व्याख्यानातून संत कबीरांचे या संदर्भात असलेले विचार मांडतात- साधना गुप्त असावी असे म्हणतात. अर्थात त्याचे प्रदर्शन नको!त्यादृष्टीने अनेक भाविक जपमाळ पिशवीत ठेवून जप करतात. जेणेकरून तो इतरांना कळू नये. वास्तविक पाहता पिशवीतील माळ दिसत नसली तरी जपमाळ ओढणे सुरू असल्याची क्रिया बाहेर प्रत्येकाला कळते. यावरून ती क्रिया गुप्त आहे असे समजावे का? तर संत कबीर म्हणतात, की माळ नुसती घालून उपयोग नाही, ती फिरलीही पाहिजे. फिरणाऱ्या मण्यांबरोबर देवाचं नावंही घेतले गेले पाहिजे. नाव नुसते घेऊन उपयोग नाही तर 'मनका मणका फेर' अर्थात प्रत्येक मण्याबरोबर मनही नाम:स्मरणात गुंतले गेले पाहिजे. 

माला फिरे करमाही, जीभ फिरे मुखमाही मनवा तो चहू दिसी फिरे, ये तो सुमीरन नाही।

म्हणजे हाताने जपमाळ ओढणे सुरु आहे, मुखाने नाव घेणेही सुरू आहे पण मन स्थिर नसेल आणि विषयात गुंतले असेल तर अशा नाम घेण्याचा काहीच उपयोग नाही. कबीरांना अपेक्षित असलेला जप कोणता, तर ' ना जीभ फिरे ना मन डोले' म्हणजेच वरवर नाव न घेता ते इतके मनापासून घेतले गेले पाहिजे की जीभ स्थिर असेल, मन स्थिर असेल तरी नामःस्मरण सुरू असेल. त्यासाठी अनुसंधान हवे. तेही कसे त्याचेही उदाहरण कबीर देतात -

सुमीरन की सुदी यो करे, जो घागर पनिहार, हाले डोले सुरतीमे, कहे कबीर विचार।

ज्याप्रमाणे एखादी स्त्री, डोक्यावर तीन चार घागरींचा भार वाहून नेत रस्त्याने चालत जाते तेव्हा वाटेत तिला अनेक जण भेटतात. त्यांच्याशी ती बोलते. गप्पा मारते. हसते. पण हे सगळं करताना पाण्याचा एक थेंबसुद्धा घागरीतून डचमळू देत नाही. याला म्हणतात अनुसंधान! 

आपल्याला नित्य कर्म करत राहायचे आहे. पण त्याबरोबर सातत्याने भगवंताचे नाव घेत राहायचे आहे. त्यासाठी हातात जपमाळ असो वा नसो, एवढी स्थितप्रज्ञता मिळवायला हवी की जीभ आणि मन स्थिर ठेवूनही नामःस्मरण सुरू राहील! ती स्थिती गाठेपर्यंत नामःस्मरण सातत्याने करत राहणे हाच उपाय आहे. त्यासाठी सुरुवातीला हातात जपमाळ लागेल आणि नंतर मनाची एकतारी सुद्धा पुरेशी ठरेल!