शहरं
Join us  
Trending Stories
1
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
2
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
3
जर असं घडलं तर विराट कोहली पुन्हा कसोटी खेळण्यास तयार होईल! या दिग्गजानं केला मोठा दावा
4
विकासाचे वारे! नक्षलवादी भागात गुरुकुल सुरू, जवानांनी घेतली १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी
5
२१ व्यांदा डिविडेंड देणार Tata ची 'ही' कंपनी; एका शेअरवर ७५ रुपयांचा फायदा, रेकॉर्ड डेट कधी?
6
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती
7
Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी
8
"उद्या काय होईल माहित नाही...", लग्नात पती रॉकीबद्दल बोलताना हिना खान भावुक
9
पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...
10
लक्ष्मी भद्र पंचमहापुरुष राजयोग: प्रदोष दिनी २ ग्रहांचे शुभ गोचर, ८ राशींना धनलाभ; उत्तम काळ
11
Mumbai Local: मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघा अन् मगच बाहेर पडा; ‘पश्चिम रेल्वे’वर रात्रकालीन ब्लॉक
12
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
13
PNB नं होम आणि ऑटो लोनच्या EMI वर केली मोठी घोषणा, RBI च्या निर्णयाचा परिणाम
14
चर्चगेट स्थानक आगीची चौकशी सुरू; एका केक शॉपला लागलेली आग, सर्व दुकाने तपासणार!
15
बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएसची पुन्हा सीईटी; निम्म्याच जागांसाठी प्रवेश अर्ज
16
ऑगस्ट क्रांती मैदानावरील नमाजावर लगेच निर्णय घ्या; सामाजिक न्याय विभाग, पालिकेला कोर्टाचे निर्देश
17
PPF की SIP.. १५ वर्षांत कुठे तयार होईल किती फंड? वार्षिक ₹१,५०,००० गुंतवणूकीवर किती मिळेल रिटर्न
18
कुठे प्रमोशन, कुठे डिमोशन! मनसेची निवडणूक तयारी सुरू; 'शिवतीर्थ'वर झाली महत्त्वाची बैठक
19
लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा
20
"तिच्या लिव्हरचा भाग कापून टाकावा लागला", १४ तास सुरू होती दीपिकाची सर्जरी, शोएबने दिले हेल्थ अपडेट

अष्टसात्त्विक भाव कशाला म्हणतात? ते कसे जागृत होतात व त्यामुळे काय बदल घडतात? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 07:05 IST

अध्यात्म मार्गावर चालणारी व्यक्ति ईश्वराशी रममाण होते त्यावेळी हे भाव जागृत होतात असे म्हटले जाते, पण ते कसे ओळखावे हे जाणून घ्या.

अध्यात्म मार्गावर चालणार्‍या व्यक्तीचे भाव सात्विक होत जातात. व्यक्ति अंतर्बाह्य बदलते. तिचे आध्यात्मिक तेज दिसू लागते, जाणवू लागते. अशा परमार्थिक मार्गावर पुढे जात असताना एक क्षण असा येतो जेव्हा भक्त भगवंत एकरूप होतात. त्यावेळेस भक्ताचे अष्टसात्त्विक भाव जागृत असे म्हणतात. पण ते ओळखायचे कसे, याबाबतीत सोशल माध्यमावर व्हायरल झालेला हा महितीपूर्ण लेख. 

साधारणपणे मुमुक्षु साधनेत किंवा भक्ती करताना त्याच्या अंगावर अष्टसात्विक भाव प्रगट होत असतात. काय असतात ते भाव? भक्त किती वर्ष भक्तिमार्गामध्ये किंवा साधनेत आहे, हे त्याच्या ज्येष्ठतेवरून त्याची भक्तिमार्गातील-प्रगती मोजमाप होत नसून तो कुठल्या स्थितीत आहे यावरून त्याच्यी आध्यात्मिक प्रगती ओळखली जाते.....

प्रथम भाव -  स्वेद 

मंत्र, स्तोत्र, जप करताना, ग्रंथ पठण करताना शरीराला घाम येतो हा प्रथम भाव. असा अनुभव येत असेल तर त्याचा अर्थ त्याची सेवा पूर्वजन्मातील प्रारब्द शुद्ध करण्यात खर्च होते.

दुसरा भाव - कंप 

या भावात पोहोचल्यावर भक्ताच्या शरीराला कंप सुटतो. शरीरात कंप जाणवते.

तिसरा भाव -  रोमांच 

स्वामींचा अगर इतर देवांचा जप करताना पोथी वाचताना अनुभव सांगताना शहारे आले तर सेवेचा तिसरा भाव समजावा.

चतुर्थ भाव -  अश्रू 

सदगुरुंच्या किंवा इष्टदेवतेच्या आठवणीने हृदय भरून आले तर आनंदाश्रू येतात. हा भाव सेवेक-याच्या हृदयाची शुद्धी करतो. अशा सेवेकर्‍यांकडून सदगुरुविषयक किंवा देवतेची स्तुतिपर काव्यनिर्मिती होते. 

खरे म्हणजे या भावात गेल्यावर सेवाकाल वाढवायला हवा. निदान एकाच आसनावर बसून एका तासावर जप करायला हवा. अशी दीड वर्षे साधना केली तर भक्त पंचम भावात प्रवेश करतो.

पंचम भाव – सत्त्वापत्ती 

या भावात प्रवेश केल्यावर अनुसंधान जास्त वेळ टिकते. अंतर्गत ईश्वरीय संकेत मिळतात. सदगुरुमय होऊन जातो. पण सर्वसामान्य माणसे चवथ्या भावापर्यंत या जन्मात पोहोचतात व पुढच्या जन्मात पुढचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो.

षष्टभाव - समाप्ती 

या भावात प्रवेश झाल्यावर हळूहळू सुख-दु:ख मान-अपमान, निंदा-स्तुती सर्वसमान वाटू लागतात. अभिमान, अहंकार नष्ट व्हायला सुरुवात होते. सत्गुण वाढू लागतात.

सप्तम भाव -  असंसक्ती 

सातव्या भावात प्रवेश केल्यास देवतांचे दर्शन-साक्षात्कार-संभाषण होतात. षट्चक्रे जागरूक होतात-इतरांचे भूत-भविष्य समजते, बोललेले शब्द सत्य होतात. या भावात गुरू दुर्लक्ष करतात. साधकाला स्वबळावर आपली प्रगती करावी लागते व जन कल्याणाचे कार्य करावे.

अष्टमभाव - प्रलय 

या भावात साधक ईश्वराशी एकरूप होतो. सिद्ध अवस्था प्राप्त होते. पुढील जन्मात पण ते सर्व विभागात काम करून जनकल्याणाचे कार्य करतात .🙏🙏