शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

अष्टसात्त्विक भाव कशाला म्हणतात? ते कसे जागृत होतात व त्यामुळे काय बदल घडतात? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 07:05 IST

अध्यात्म मार्गावर चालणारी व्यक्ति ईश्वराशी रममाण होते त्यावेळी हे भाव जागृत होतात असे म्हटले जाते, पण ते कसे ओळखावे हे जाणून घ्या.

अध्यात्म मार्गावर चालणार्‍या व्यक्तीचे भाव सात्विक होत जातात. व्यक्ति अंतर्बाह्य बदलते. तिचे आध्यात्मिक तेज दिसू लागते, जाणवू लागते. अशा परमार्थिक मार्गावर पुढे जात असताना एक क्षण असा येतो जेव्हा भक्त भगवंत एकरूप होतात. त्यावेळेस भक्ताचे अष्टसात्त्विक भाव जागृत असे म्हणतात. पण ते ओळखायचे कसे, याबाबतीत सोशल माध्यमावर व्हायरल झालेला हा महितीपूर्ण लेख. 

साधारणपणे मुमुक्षु साधनेत किंवा भक्ती करताना त्याच्या अंगावर अष्टसात्विक भाव प्रगट होत असतात. काय असतात ते भाव? भक्त किती वर्ष भक्तिमार्गामध्ये किंवा साधनेत आहे, हे त्याच्या ज्येष्ठतेवरून त्याची भक्तिमार्गातील-प्रगती मोजमाप होत नसून तो कुठल्या स्थितीत आहे यावरून त्याच्यी आध्यात्मिक प्रगती ओळखली जाते.....

प्रथम भाव -  स्वेद 

मंत्र, स्तोत्र, जप करताना, ग्रंथ पठण करताना शरीराला घाम येतो हा प्रथम भाव. असा अनुभव येत असेल तर त्याचा अर्थ त्याची सेवा पूर्वजन्मातील प्रारब्द शुद्ध करण्यात खर्च होते.

दुसरा भाव - कंप 

या भावात पोहोचल्यावर भक्ताच्या शरीराला कंप सुटतो. शरीरात कंप जाणवते.

तिसरा भाव -  रोमांच 

स्वामींचा अगर इतर देवांचा जप करताना पोथी वाचताना अनुभव सांगताना शहारे आले तर सेवेचा तिसरा भाव समजावा.

चतुर्थ भाव -  अश्रू 

सदगुरुंच्या किंवा इष्टदेवतेच्या आठवणीने हृदय भरून आले तर आनंदाश्रू येतात. हा भाव सेवेक-याच्या हृदयाची शुद्धी करतो. अशा सेवेकर्‍यांकडून सदगुरुविषयक किंवा देवतेची स्तुतिपर काव्यनिर्मिती होते. 

खरे म्हणजे या भावात गेल्यावर सेवाकाल वाढवायला हवा. निदान एकाच आसनावर बसून एका तासावर जप करायला हवा. अशी दीड वर्षे साधना केली तर भक्त पंचम भावात प्रवेश करतो.

पंचम भाव – सत्त्वापत्ती 

या भावात प्रवेश केल्यावर अनुसंधान जास्त वेळ टिकते. अंतर्गत ईश्वरीय संकेत मिळतात. सदगुरुमय होऊन जातो. पण सर्वसामान्य माणसे चवथ्या भावापर्यंत या जन्मात पोहोचतात व पुढच्या जन्मात पुढचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो.

षष्टभाव - समाप्ती 

या भावात प्रवेश झाल्यावर हळूहळू सुख-दु:ख मान-अपमान, निंदा-स्तुती सर्वसमान वाटू लागतात. अभिमान, अहंकार नष्ट व्हायला सुरुवात होते. सत्गुण वाढू लागतात.

सप्तम भाव -  असंसक्ती 

सातव्या भावात प्रवेश केल्यास देवतांचे दर्शन-साक्षात्कार-संभाषण होतात. षट्चक्रे जागरूक होतात-इतरांचे भूत-भविष्य समजते, बोललेले शब्द सत्य होतात. या भावात गुरू दुर्लक्ष करतात. साधकाला स्वबळावर आपली प्रगती करावी लागते व जन कल्याणाचे कार्य करावे.

अष्टमभाव - प्रलय 

या भावात साधक ईश्वराशी एकरूप होतो. सिद्ध अवस्था प्राप्त होते. पुढील जन्मात पण ते सर्व विभागात काम करून जनकल्याणाचे कार्य करतात .🙏🙏