शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

संतांची लक्षणे कोणती व ते कोणत्या कुळात जन्म घेतात, सांगताहेत तुकोबा महाराज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 17:27 IST

भक्तिमंदिराचा कळस म्हणून ओळखले जाणारे संत तुकाराम महाराज संतांची लक्षणे सांगत आहेत.

संतवृत्ती शिकवावी लागत नाही, तर ती उपजतच असावी लागते. मग हे संत कोठे जन्म घेतात, त्यांच्या जन्माची पार्श्वभूमी काय असते? कोणत्या परिस्थितीत त्यांची जडण घडण होते? ते समाजाला वळण कसे लावतात? या सर्व प्रश्नांचा उहापोह संत तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगात केला आहे. 

शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी,मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी,सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ,तुका म्हणे जाती, ताप दर्शने विश्रांती।

संत तुकारामांचा हा अभंग फार प्रसिद्ध आहे व पहिले चरण तर मराठी भाषेतील सिद्धान्तरूप सुभाषित ठरले आहे. अनुहरण शास्त्राप्रमाणे ज्या कुळात उत्तमोत्तम पुरुष किंवा सद्गुणी स्त्रिया पूर्वापार जन्मत आल्या आहेत, त्या कुळात थोर अवतारी व्यक्ती जन्माला येतात हे सत्य आहे. कारण जे शरीर, भावना, मनोमय कोष अवतारी कार्याला आवश्यक असतात त्यांची उपलब्धता त्या कुळात जास्त असते. 

तुकारामांच्या कुळातील पूर्वजही अनेक पिढ्या विठ्ठलभक्त होते. संत ज्ञानेश्वरांच्या कुळातही अनेक पिढ्या भक्तीमार्गातील उपासक झाले होते व नंतर त्या कुळात ज्ञानेश्वर व इतर तीन भावंडे जन्माला आली. असे संत कसे असतात? त्यांचे बोलणे मधुर असते, हितकारक असते, अमृतासारखे कल्याणप्रद असते व देवकार्यासाठी त्यांचा देह कारणी लागतो, कारण संसारातील छोट्या गोष्टीत त्यांना रस नसतो. ते शुचित्वसंपन्न असतात. शरीराने ओंगळपणाने राहत नाहीत. त्यांचे चित्तही गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ असते. पावन असते. अर्थात त्यांच्या चित्ताला विकार शिवत नाहीत.त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या भोवतीच्या वातावरणाने, त्यांची कृपादृष्टी झाल्याने लोकांच्या मनातील चिंताही दूर होते आणि मनस्ताप निवतो. त्यानेच लोकांना खूप शांती मिळते. 

तुकाराम महाराजांनी केलेले हे वर्णन प्रत्ययकारी आहे. खरोखर अशा सुस्वभावी, पर कारुणिक संतांचा सहवास अमृतमयच असतो. मात्र असे संत उत्तम कुळातच सामान्यपणे जन्माला येतात विंâवा ज्या कुळात जन्माला येतात, त्या कुळाचा उद्धार करतात.