शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

संतांची लक्षणे कोणती व ते कोणत्या कुळात जन्म घेतात, सांगताहेत तुकोबा महाराज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 17:27 IST

भक्तिमंदिराचा कळस म्हणून ओळखले जाणारे संत तुकाराम महाराज संतांची लक्षणे सांगत आहेत.

संतवृत्ती शिकवावी लागत नाही, तर ती उपजतच असावी लागते. मग हे संत कोठे जन्म घेतात, त्यांच्या जन्माची पार्श्वभूमी काय असते? कोणत्या परिस्थितीत त्यांची जडण घडण होते? ते समाजाला वळण कसे लावतात? या सर्व प्रश्नांचा उहापोह संत तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगात केला आहे. 

शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी,मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी,सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ,तुका म्हणे जाती, ताप दर्शने विश्रांती।

संत तुकारामांचा हा अभंग फार प्रसिद्ध आहे व पहिले चरण तर मराठी भाषेतील सिद्धान्तरूप सुभाषित ठरले आहे. अनुहरण शास्त्राप्रमाणे ज्या कुळात उत्तमोत्तम पुरुष किंवा सद्गुणी स्त्रिया पूर्वापार जन्मत आल्या आहेत, त्या कुळात थोर अवतारी व्यक्ती जन्माला येतात हे सत्य आहे. कारण जे शरीर, भावना, मनोमय कोष अवतारी कार्याला आवश्यक असतात त्यांची उपलब्धता त्या कुळात जास्त असते. 

तुकारामांच्या कुळातील पूर्वजही अनेक पिढ्या विठ्ठलभक्त होते. संत ज्ञानेश्वरांच्या कुळातही अनेक पिढ्या भक्तीमार्गातील उपासक झाले होते व नंतर त्या कुळात ज्ञानेश्वर व इतर तीन भावंडे जन्माला आली. असे संत कसे असतात? त्यांचे बोलणे मधुर असते, हितकारक असते, अमृतासारखे कल्याणप्रद असते व देवकार्यासाठी त्यांचा देह कारणी लागतो, कारण संसारातील छोट्या गोष्टीत त्यांना रस नसतो. ते शुचित्वसंपन्न असतात. शरीराने ओंगळपणाने राहत नाहीत. त्यांचे चित्तही गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ असते. पावन असते. अर्थात त्यांच्या चित्ताला विकार शिवत नाहीत.त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या भोवतीच्या वातावरणाने, त्यांची कृपादृष्टी झाल्याने लोकांच्या मनातील चिंताही दूर होते आणि मनस्ताप निवतो. त्यानेच लोकांना खूप शांती मिळते. 

तुकाराम महाराजांनी केलेले हे वर्णन प्रत्ययकारी आहे. खरोखर अशा सुस्वभावी, पर कारुणिक संतांचा सहवास अमृतमयच असतो. मात्र असे संत उत्तम कुळातच सामान्यपणे जन्माला येतात विंâवा ज्या कुळात जन्माला येतात, त्या कुळाचा उद्धार करतात.