शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

संतांची लक्षणे कोणती व ते कोणत्या कुळात जन्म घेतात, सांगताहेत तुकोबा महाराज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 17:27 IST

भक्तिमंदिराचा कळस म्हणून ओळखले जाणारे संत तुकाराम महाराज संतांची लक्षणे सांगत आहेत.

संतवृत्ती शिकवावी लागत नाही, तर ती उपजतच असावी लागते. मग हे संत कोठे जन्म घेतात, त्यांच्या जन्माची पार्श्वभूमी काय असते? कोणत्या परिस्थितीत त्यांची जडण घडण होते? ते समाजाला वळण कसे लावतात? या सर्व प्रश्नांचा उहापोह संत तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगात केला आहे. 

शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी,मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी,सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ,तुका म्हणे जाती, ताप दर्शने विश्रांती।

संत तुकारामांचा हा अभंग फार प्रसिद्ध आहे व पहिले चरण तर मराठी भाषेतील सिद्धान्तरूप सुभाषित ठरले आहे. अनुहरण शास्त्राप्रमाणे ज्या कुळात उत्तमोत्तम पुरुष किंवा सद्गुणी स्त्रिया पूर्वापार जन्मत आल्या आहेत, त्या कुळात थोर अवतारी व्यक्ती जन्माला येतात हे सत्य आहे. कारण जे शरीर, भावना, मनोमय कोष अवतारी कार्याला आवश्यक असतात त्यांची उपलब्धता त्या कुळात जास्त असते. 

तुकारामांच्या कुळातील पूर्वजही अनेक पिढ्या विठ्ठलभक्त होते. संत ज्ञानेश्वरांच्या कुळातही अनेक पिढ्या भक्तीमार्गातील उपासक झाले होते व नंतर त्या कुळात ज्ञानेश्वर व इतर तीन भावंडे जन्माला आली. असे संत कसे असतात? त्यांचे बोलणे मधुर असते, हितकारक असते, अमृतासारखे कल्याणप्रद असते व देवकार्यासाठी त्यांचा देह कारणी लागतो, कारण संसारातील छोट्या गोष्टीत त्यांना रस नसतो. ते शुचित्वसंपन्न असतात. शरीराने ओंगळपणाने राहत नाहीत. त्यांचे चित्तही गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ असते. पावन असते. अर्थात त्यांच्या चित्ताला विकार शिवत नाहीत.त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या भोवतीच्या वातावरणाने, त्यांची कृपादृष्टी झाल्याने लोकांच्या मनातील चिंताही दूर होते आणि मनस्ताप निवतो. त्यानेच लोकांना खूप शांती मिळते. 

तुकाराम महाराजांनी केलेले हे वर्णन प्रत्ययकारी आहे. खरोखर अशा सुस्वभावी, पर कारुणिक संतांचा सहवास अमृतमयच असतो. मात्र असे संत उत्तम कुळातच सामान्यपणे जन्माला येतात विंâवा ज्या कुळात जन्माला येतात, त्या कुळाचा उद्धार करतात.