शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

आपणच काय, तर संतदेखील करत असत देवाशी भांडण!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: December 9, 2020 07:20 IST

विठ्ठलमय झालेले तुकाराम महाराज सांगतात, भगवंताशी इतके समरस व्हा, की अन्य दुय्यम गोष्टींना आयुष्यात थाराच उरणार नाही. सखा, सोबती भगवंत झाला, की प्रत्येक संवाद त्याच्याशीच होईल. मग ते लाडिक भांडण का असेना...!

ज्योत्स्ना गाडगीळ 

देवाने सगळे काही देऊनही आपण त्याने काय नाही दिले हे शोधून त्याच्याशी भांडत असतो, त्याला बोल लावत असतो, दोष देत असतो. आपल्यासारखाच संतांचाही देवाशी वाद होत असे. मात्र, आपली भांडणे व्यावहारिक पातळीची, तर संतांची भांडणे अध्यात्मिक पातळीवरची असत. असाच एक भांडणाचा प्रसंग तुकोबारायांनी आपल्या अभंगातून सविस्तर मांडला आहे. भांडणारे कारण, आरोप, माफी, सारे काही त्या अभंगात एकवटून आले आहे. 

हेही वाचा : संत ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाआधी घेतले होते योगसाधनेचे धडे!

तुझे म्हणविता काय नाश झाला, ऐके बा विठ्ठला किर्ती तुझी।परी तुज नाही आमुचे उपकार, नामरूपा थार केलियाचे।समूळी संसार केला देशधडी, सौडली आवडी ममतेची।लोभ दंभ काम क्रोध अहंकार, यांसी नाही थार ऐसे केले।मृत्तिका पाषाण तैसे केले धन, आपले ते कोण पर नेणो।तुका म्हणे झालो देहासी उदार, आणीक विचार काय तेथे।

तुकाराम महाराज देवाजवळ ज्या सलगीने बोलता, भांडतात, लडिवाळपणाही करतात, त्याची बरोबरी क्वचितच दुसरा कोणी भक्त करत असेल. त्यांच्या संवादातून आपल्यासारख्या वाचकांना भक्तिभावनेचे एक मनोहर दर्शन घडते. ते म्हणतात, देवा, आम्ही भक्त स्वत:ला `देवाचे' म्हणवतो. त्यामुळे आमचे केवढे नुकसान झाले आहे, याची तुला थोडी माहिती देतो. विठ्ठला, तुझी कीर्तीच अशी आहे, की जो तुझ्या नादाला लागतो, `त्याचा संसार पार देशोधडीला लागतो. त्याच्या मनातील आप्तजनांबद्दलची ममता पार नाहीशी होते. 

त्याचे एरव्ही सतत साथ देणारे विकाररूपी मित्र, हो, विकारांचे लिसित म्हणजे प्रपंच! तेही निरश्रित होतात. लोभ नाही, दंभ नाही, काम नाही, क्रोध नाही, अहंकार नाही, सगळे सोडून जातात. कारण ज्या चित्तात कृष्ण विठ्ठलाने जागा व्यापली, तेथे या लोकांना राहायला थारा कुठला? धनाचा मान संसारात केवढा असतो? पण विठ्ठल विठ्ठल अशी धुन लागली की सोन्याची किंमत माती, दगडाइतकीच! आणि व्यवहारात जिथे आपला कोण, परका कोण याचे तारतम्य पाळावे लागते व धूर्तपणे आपला फायदा करून घेतला जातो, तीही सोय भक्ताला नाहीशी होते. त्याला आप-पर भाव उरत नाही. 

तुकाराम महाराज इथे छद्मी स्तुतीच त्या विठ्ठलाची करत आहेत. पुढे म्हणतात, प्रपंचात सगळे सांभाळायचे असते, तर आम्ही मात्र स्वत:चा देह सुद्धा उदारपणे  देवाच्या स्वाधीन केला आहे. आता आणखी हे विठ्ठला तुला काय सांगू?

विठ्ठलमय झालेले तुकाराम महाराज सांगतात, भगवंताशी इतके समरस व्हा, की अन्य दुय्यम गोष्टींना आयुष्यात थाराच उरणार नाही. सखा, सोबती भगवंत झाला, की प्रत्येक संवाद त्याच्याशीच होईल. मग ते लाडिक भांडण का असेना...!

हेही वाचा : कृष्णालाही भुरळ पाडणारी, मीराबाईंच्या भजनाची अवीट गोडी!