शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आपणच काय, तर संतदेखील करत असत देवाशी भांडण!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: December 9, 2020 07:20 IST

विठ्ठलमय झालेले तुकाराम महाराज सांगतात, भगवंताशी इतके समरस व्हा, की अन्य दुय्यम गोष्टींना आयुष्यात थाराच उरणार नाही. सखा, सोबती भगवंत झाला, की प्रत्येक संवाद त्याच्याशीच होईल. मग ते लाडिक भांडण का असेना...!

ज्योत्स्ना गाडगीळ 

देवाने सगळे काही देऊनही आपण त्याने काय नाही दिले हे शोधून त्याच्याशी भांडत असतो, त्याला बोल लावत असतो, दोष देत असतो. आपल्यासारखाच संतांचाही देवाशी वाद होत असे. मात्र, आपली भांडणे व्यावहारिक पातळीची, तर संतांची भांडणे अध्यात्मिक पातळीवरची असत. असाच एक भांडणाचा प्रसंग तुकोबारायांनी आपल्या अभंगातून सविस्तर मांडला आहे. भांडणारे कारण, आरोप, माफी, सारे काही त्या अभंगात एकवटून आले आहे. 

हेही वाचा : संत ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाआधी घेतले होते योगसाधनेचे धडे!

तुझे म्हणविता काय नाश झाला, ऐके बा विठ्ठला किर्ती तुझी।परी तुज नाही आमुचे उपकार, नामरूपा थार केलियाचे।समूळी संसार केला देशधडी, सौडली आवडी ममतेची।लोभ दंभ काम क्रोध अहंकार, यांसी नाही थार ऐसे केले।मृत्तिका पाषाण तैसे केले धन, आपले ते कोण पर नेणो।तुका म्हणे झालो देहासी उदार, आणीक विचार काय तेथे।

तुकाराम महाराज देवाजवळ ज्या सलगीने बोलता, भांडतात, लडिवाळपणाही करतात, त्याची बरोबरी क्वचितच दुसरा कोणी भक्त करत असेल. त्यांच्या संवादातून आपल्यासारख्या वाचकांना भक्तिभावनेचे एक मनोहर दर्शन घडते. ते म्हणतात, देवा, आम्ही भक्त स्वत:ला `देवाचे' म्हणवतो. त्यामुळे आमचे केवढे नुकसान झाले आहे, याची तुला थोडी माहिती देतो. विठ्ठला, तुझी कीर्तीच अशी आहे, की जो तुझ्या नादाला लागतो, `त्याचा संसार पार देशोधडीला लागतो. त्याच्या मनातील आप्तजनांबद्दलची ममता पार नाहीशी होते. 

त्याचे एरव्ही सतत साथ देणारे विकाररूपी मित्र, हो, विकारांचे लिसित म्हणजे प्रपंच! तेही निरश्रित होतात. लोभ नाही, दंभ नाही, काम नाही, क्रोध नाही, अहंकार नाही, सगळे सोडून जातात. कारण ज्या चित्तात कृष्ण विठ्ठलाने जागा व्यापली, तेथे या लोकांना राहायला थारा कुठला? धनाचा मान संसारात केवढा असतो? पण विठ्ठल विठ्ठल अशी धुन लागली की सोन्याची किंमत माती, दगडाइतकीच! आणि व्यवहारात जिथे आपला कोण, परका कोण याचे तारतम्य पाळावे लागते व धूर्तपणे आपला फायदा करून घेतला जातो, तीही सोय भक्ताला नाहीशी होते. त्याला आप-पर भाव उरत नाही. 

तुकाराम महाराज इथे छद्मी स्तुतीच त्या विठ्ठलाची करत आहेत. पुढे म्हणतात, प्रपंचात सगळे सांभाळायचे असते, तर आम्ही मात्र स्वत:चा देह सुद्धा उदारपणे  देवाच्या स्वाधीन केला आहे. आता आणखी हे विठ्ठला तुला काय सांगू?

विठ्ठलमय झालेले तुकाराम महाराज सांगतात, भगवंताशी इतके समरस व्हा, की अन्य दुय्यम गोष्टींना आयुष्यात थाराच उरणार नाही. सखा, सोबती भगवंत झाला, की प्रत्येक संवाद त्याच्याशीच होईल. मग ते लाडिक भांडण का असेना...!

हेही वाचा : कृष्णालाही भुरळ पाडणारी, मीराबाईंच्या भजनाची अवीट गोडी!