शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

आपणच काय, तर संतदेखील करत असत देवाशी भांडण!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: December 9, 2020 07:20 IST

विठ्ठलमय झालेले तुकाराम महाराज सांगतात, भगवंताशी इतके समरस व्हा, की अन्य दुय्यम गोष्टींना आयुष्यात थाराच उरणार नाही. सखा, सोबती भगवंत झाला, की प्रत्येक संवाद त्याच्याशीच होईल. मग ते लाडिक भांडण का असेना...!

ज्योत्स्ना गाडगीळ 

देवाने सगळे काही देऊनही आपण त्याने काय नाही दिले हे शोधून त्याच्याशी भांडत असतो, त्याला बोल लावत असतो, दोष देत असतो. आपल्यासारखाच संतांचाही देवाशी वाद होत असे. मात्र, आपली भांडणे व्यावहारिक पातळीची, तर संतांची भांडणे अध्यात्मिक पातळीवरची असत. असाच एक भांडणाचा प्रसंग तुकोबारायांनी आपल्या अभंगातून सविस्तर मांडला आहे. भांडणारे कारण, आरोप, माफी, सारे काही त्या अभंगात एकवटून आले आहे. 

हेही वाचा : संत ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाआधी घेतले होते योगसाधनेचे धडे!

तुझे म्हणविता काय नाश झाला, ऐके बा विठ्ठला किर्ती तुझी।परी तुज नाही आमुचे उपकार, नामरूपा थार केलियाचे।समूळी संसार केला देशधडी, सौडली आवडी ममतेची।लोभ दंभ काम क्रोध अहंकार, यांसी नाही थार ऐसे केले।मृत्तिका पाषाण तैसे केले धन, आपले ते कोण पर नेणो।तुका म्हणे झालो देहासी उदार, आणीक विचार काय तेथे।

तुकाराम महाराज देवाजवळ ज्या सलगीने बोलता, भांडतात, लडिवाळपणाही करतात, त्याची बरोबरी क्वचितच दुसरा कोणी भक्त करत असेल. त्यांच्या संवादातून आपल्यासारख्या वाचकांना भक्तिभावनेचे एक मनोहर दर्शन घडते. ते म्हणतात, देवा, आम्ही भक्त स्वत:ला `देवाचे' म्हणवतो. त्यामुळे आमचे केवढे नुकसान झाले आहे, याची तुला थोडी माहिती देतो. विठ्ठला, तुझी कीर्तीच अशी आहे, की जो तुझ्या नादाला लागतो, `त्याचा संसार पार देशोधडीला लागतो. त्याच्या मनातील आप्तजनांबद्दलची ममता पार नाहीशी होते. 

त्याचे एरव्ही सतत साथ देणारे विकाररूपी मित्र, हो, विकारांचे लिसित म्हणजे प्रपंच! तेही निरश्रित होतात. लोभ नाही, दंभ नाही, काम नाही, क्रोध नाही, अहंकार नाही, सगळे सोडून जातात. कारण ज्या चित्तात कृष्ण विठ्ठलाने जागा व्यापली, तेथे या लोकांना राहायला थारा कुठला? धनाचा मान संसारात केवढा असतो? पण विठ्ठल विठ्ठल अशी धुन लागली की सोन्याची किंमत माती, दगडाइतकीच! आणि व्यवहारात जिथे आपला कोण, परका कोण याचे तारतम्य पाळावे लागते व धूर्तपणे आपला फायदा करून घेतला जातो, तीही सोय भक्ताला नाहीशी होते. त्याला आप-पर भाव उरत नाही. 

तुकाराम महाराज इथे छद्मी स्तुतीच त्या विठ्ठलाची करत आहेत. पुढे म्हणतात, प्रपंचात सगळे सांभाळायचे असते, तर आम्ही मात्र स्वत:चा देह सुद्धा उदारपणे  देवाच्या स्वाधीन केला आहे. आता आणखी हे विठ्ठला तुला काय सांगू?

विठ्ठलमय झालेले तुकाराम महाराज सांगतात, भगवंताशी इतके समरस व्हा, की अन्य दुय्यम गोष्टींना आयुष्यात थाराच उरणार नाही. सखा, सोबती भगवंत झाला, की प्रत्येक संवाद त्याच्याशीच होईल. मग ते लाडिक भांडण का असेना...!

हेही वाचा : कृष्णालाही भुरळ पाडणारी, मीराबाईंच्या भजनाची अवीट गोडी!