शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आपणच काय, तर संतदेखील करत असत देवाशी भांडण!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: December 9, 2020 07:20 IST

विठ्ठलमय झालेले तुकाराम महाराज सांगतात, भगवंताशी इतके समरस व्हा, की अन्य दुय्यम गोष्टींना आयुष्यात थाराच उरणार नाही. सखा, सोबती भगवंत झाला, की प्रत्येक संवाद त्याच्याशीच होईल. मग ते लाडिक भांडण का असेना...!

ज्योत्स्ना गाडगीळ 

देवाने सगळे काही देऊनही आपण त्याने काय नाही दिले हे शोधून त्याच्याशी भांडत असतो, त्याला बोल लावत असतो, दोष देत असतो. आपल्यासारखाच संतांचाही देवाशी वाद होत असे. मात्र, आपली भांडणे व्यावहारिक पातळीची, तर संतांची भांडणे अध्यात्मिक पातळीवरची असत. असाच एक भांडणाचा प्रसंग तुकोबारायांनी आपल्या अभंगातून सविस्तर मांडला आहे. भांडणारे कारण, आरोप, माफी, सारे काही त्या अभंगात एकवटून आले आहे. 

हेही वाचा : संत ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाआधी घेतले होते योगसाधनेचे धडे!

तुझे म्हणविता काय नाश झाला, ऐके बा विठ्ठला किर्ती तुझी।परी तुज नाही आमुचे उपकार, नामरूपा थार केलियाचे।समूळी संसार केला देशधडी, सौडली आवडी ममतेची।लोभ दंभ काम क्रोध अहंकार, यांसी नाही थार ऐसे केले।मृत्तिका पाषाण तैसे केले धन, आपले ते कोण पर नेणो।तुका म्हणे झालो देहासी उदार, आणीक विचार काय तेथे।

तुकाराम महाराज देवाजवळ ज्या सलगीने बोलता, भांडतात, लडिवाळपणाही करतात, त्याची बरोबरी क्वचितच दुसरा कोणी भक्त करत असेल. त्यांच्या संवादातून आपल्यासारख्या वाचकांना भक्तिभावनेचे एक मनोहर दर्शन घडते. ते म्हणतात, देवा, आम्ही भक्त स्वत:ला `देवाचे' म्हणवतो. त्यामुळे आमचे केवढे नुकसान झाले आहे, याची तुला थोडी माहिती देतो. विठ्ठला, तुझी कीर्तीच अशी आहे, की जो तुझ्या नादाला लागतो, `त्याचा संसार पार देशोधडीला लागतो. त्याच्या मनातील आप्तजनांबद्दलची ममता पार नाहीशी होते. 

त्याचे एरव्ही सतत साथ देणारे विकाररूपी मित्र, हो, विकारांचे लिसित म्हणजे प्रपंच! तेही निरश्रित होतात. लोभ नाही, दंभ नाही, काम नाही, क्रोध नाही, अहंकार नाही, सगळे सोडून जातात. कारण ज्या चित्तात कृष्ण विठ्ठलाने जागा व्यापली, तेथे या लोकांना राहायला थारा कुठला? धनाचा मान संसारात केवढा असतो? पण विठ्ठल विठ्ठल अशी धुन लागली की सोन्याची किंमत माती, दगडाइतकीच! आणि व्यवहारात जिथे आपला कोण, परका कोण याचे तारतम्य पाळावे लागते व धूर्तपणे आपला फायदा करून घेतला जातो, तीही सोय भक्ताला नाहीशी होते. त्याला आप-पर भाव उरत नाही. 

तुकाराम महाराज इथे छद्मी स्तुतीच त्या विठ्ठलाची करत आहेत. पुढे म्हणतात, प्रपंचात सगळे सांभाळायचे असते, तर आम्ही मात्र स्वत:चा देह सुद्धा उदारपणे  देवाच्या स्वाधीन केला आहे. आता आणखी हे विठ्ठला तुला काय सांगू?

विठ्ठलमय झालेले तुकाराम महाराज सांगतात, भगवंताशी इतके समरस व्हा, की अन्य दुय्यम गोष्टींना आयुष्यात थाराच उरणार नाही. सखा, सोबती भगवंत झाला, की प्रत्येक संवाद त्याच्याशीच होईल. मग ते लाडिक भांडण का असेना...!

हेही वाचा : कृष्णालाही भुरळ पाडणारी, मीराबाईंच्या भजनाची अवीट गोडी!