शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

मोत्याची अंगठी वापरताय? मग तुम्हीदेखील निश्चितच अनुभवले असतील 'हे' फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 14:28 IST

मोती या रत्नात आपली इच्छापूर्ती करण्याची क्षमता असते, म्हणून मोत्याच्या अंगठीला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

प्रत्येकाला सोने-चांदी-हिऱ्याचेच दागिने भुरळ घालतात असे नाही. तर काही जणांना राजेशाही थाट दर्शवणारे मोत्याचे दागिने जास्त प्रिय असतात. त्यातही मोत्याच्या अंगठीला तर सर्वात जास्त मान असतो. कारण, आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्याचे सामर्थ्य मोत्याच्या अंगठीत असते. मोती असे एक रत्न आहे, जे चिंतामणी प्रमाणे कार्य करते. अर्थात आयष्यातील चिंता दूर करते. संकटाच्या अनेक प्रसंगांना शांतपणे सामोरे जाण्यासाठी मोत्याची अंगठी वापरा असा ज्योतिषाकडून सल्ला दिला जातो. मोत्याची शीतलता आपल्या स्वभावात उतरावी, ही त्यामागील भावना असते. शिवाय या रत्नात आपली इच्छापूर्ती करण्याची क्षमता असते, म्हणून मोत्याच्या अंगठीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या अंगठीच्या वापरामुळे कोणकोणते लाभ होतात, जाणून घेऊया. 

जर कौटुंबिक कलह तुमच्या आयुष्यात पाठलाग सोडत नसेल आणि पती-पत्नीमध्ये मतभेद असतील तर ही समस्या दूर करण्यासाठी पती- पत्नी यांच्यापैकी एकाने मोत्याची अंगठी वापरावी. त्याचा नक्की लाभ होईल आणि घरात शांती व समृद्धी राहील.

आपल्या मुलांचे आरोग्य ठीक नसल्यास, मुलांचे चित्त स्थिर नसल्यास मोती हे रत्न मानसिक आरोग्यावर रामबाण उपाय ठरते. परंतु मुलांकडून अंगठी गहाळ होण्याची भीती असल्याने त्यांना गळ्यातल्या दोऱ्यात मोती घालून द्यावा. 

योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्याने आयुष्यात अनेक चुका घडतात. परंतु तुम्हाला जर निर्णय क्षमतेत अभाव आहे असे वाटत असेल, तर गणपती बाप्पाला मोत्याची कंठी घालावी आणि दररोज मंगळवारी गणपती स्तोत्राचे पठण करावे. त्याचा खूप फायदा होईल आणि संभ्रमाची परिस्थिती संपेल.

आयुष्यात रोजगार असूनही, पैशाची कमतरता असते आणि त्यामुळे व्यक्ती नेहमीच त्रस्त असते, अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने देवघरात कोणत्याही धान्याची रास मांडून त्यावर पिवळ्या कापडात २ मणी बांधून ठेवावे. लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय सुचवला जातो आणि अनेकांना त्याचा लाभदेखील होतो. 

अनेक जण स्वभावाने चांगले पण शीघ्रकोपी असतात. आपल्या रागामुळे ते स्वतःचेच नुकसान करून घेतात. अशा लोकांसाठी मोत्याची अंगठी खूप फायदेशीर ठरते. शिवाय त्यांनी आपल्या देवघरात धान्याची राशी मांडून पांढऱ्या कापडात शुभ्र मणी गुंडाळून ठेवावा. त्या उपायाने मन शांत होईल व रागावर नियंत्रण मिळवता येईल. 

जेव्हा अथक प्रयत्नांनंतरही एखादी व्यक्ती व्यावसायिक कारकीर्दीत प्रगती करू शकत नाही, अशा व्यक्तीने मोत्याची चांदीचे कोंदण असलेली अंगठी घालावी. त्यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि प्रगतीची दारे खुली होतील. 

काही घरांमध्ये सतत आजारपण असते. विशेषतः जेव्हा त्या घरातल्या स्त्रिया, वृद्ध किंवा मुले आजारी पडतात तेव्हा ही समस्या आणखीनच वाढत जाते. अशा स्थितीत पौर्णिमेच्या दिवशी तांदळाच्या राशीवर मोती ठेवून तो पूजा झाल्यावर दान करावा. त्यामुळे घरातून आजार दूर होतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते.