शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

आनंदाचे डोही, आनंद तरंग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 02:55 IST

संध्याकाळी गाई घरा येताना त्यांच्या गळ्यांत त्या घंटांच्या मंजुळ नाद किती समाधान देतो; असे हे आनंदाचे सौंदर्याचे लहान-लहान थेंब आपण गोळा केले तर आनंदाचा महासागर निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

- स्नेहलता देशमुखआनंद कुणाला नको असतो; पण तो मिळविण्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. माणसाला आपल्या डोळ्यांत येणाऱ्या अश्रूंचे दु:ख वाटत नाही; पण ते अश्रू पुसायला कुणी येत नाही याचे त्याला दु:ख होते. जीवनाच्या या प्रचंड धडपडीत क्षणभर थांबून भोवतालच्या नितळ आकाशाकडे आपण वेळ काढून पाहतो का? असा एखादा सौंदर्याचा कण पाहिला, तर केवढी मनाला उभारी येते. काळे ढग आले तरी त्या भोवतीची सोनेरी किनार आपण आठवतो का? ती आठवली तरी आपले मन शांत होईल; पण आपण आनंद शोधतो तो शरीराला ज्यातून सुख मिळते खाणं-पिणं, चित्रपट पाहणे, संगीत ऐकणे, भरजरी वस्त्र घेणे, अलंकार घेणे या कशातच आपल्या बंदिवान आत्म्याला मुक्त करण्याची ताकद नाही; पण चिमणीची चिवचिव, कोकिळ पक्षाची कुहूकुहू गुंजाकाची ताकद विलक्षण आहे. फुलपाखराचं या वेलीवरून त्या वेलीवर फिरणं किती मोहक असते. संध्याकाळी गाई घरा येताना त्यांच्या गळ्यांत त्या घंटांच्या मंजुळ नाद किती समाधान देतो; असे हे आनंदाचे सौंदर्याचे लहान-लहान थेंब आपण गोळा केले तर आनंदाचा महासागर निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. मिडास राजाच्या हव्यासापोटी त्याला मुलीला गमावावे लागले. कारण सोने अधिकाधिक मिळावे असे त्याला वाटले म्हणून त्याने वर मागितला. ज्या वस्तूला त्याचा स्पर्श होईल त्यांचे सोने होईल. त्याच्या अलिशान पलंगाला त्याचा स्पर्श झाला तो सोन्याचा झाला. त्यांची अत्यंत लाडकी कन्या खेळून महालात आली आणि तिने राजाला मिठी मारली ती सोन्याची पुतळी झाली. राजाला अतिव दु:ख झाले. त्याने पुन: प्रार्थना केली, मला सोने नको माझी सोन्यासारखी लेक मला हवी आहे. यातून असे दिसते की माणुसकी, प्रेम हे जास्त महत्त्वाचे आहे. प्रेमाने आनंद मिळतो. म्हणून म्हटले आहे ‘खरा तो प्रेमाचा न घरी लोभ मनी’ खरं प्रेम त्याग बुद्धीत असले ज्या प्रेमात कल्याणबुद्धी असते, तेच प्रेम खरे शुद्ध प्रेम असते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक