शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

आनंदाचे डोही, आनंद तरंग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 02:55 IST

संध्याकाळी गाई घरा येताना त्यांच्या गळ्यांत त्या घंटांच्या मंजुळ नाद किती समाधान देतो; असे हे आनंदाचे सौंदर्याचे लहान-लहान थेंब आपण गोळा केले तर आनंदाचा महासागर निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

- स्नेहलता देशमुखआनंद कुणाला नको असतो; पण तो मिळविण्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. माणसाला आपल्या डोळ्यांत येणाऱ्या अश्रूंचे दु:ख वाटत नाही; पण ते अश्रू पुसायला कुणी येत नाही याचे त्याला दु:ख होते. जीवनाच्या या प्रचंड धडपडीत क्षणभर थांबून भोवतालच्या नितळ आकाशाकडे आपण वेळ काढून पाहतो का? असा एखादा सौंदर्याचा कण पाहिला, तर केवढी मनाला उभारी येते. काळे ढग आले तरी त्या भोवतीची सोनेरी किनार आपण आठवतो का? ती आठवली तरी आपले मन शांत होईल; पण आपण आनंद शोधतो तो शरीराला ज्यातून सुख मिळते खाणं-पिणं, चित्रपट पाहणे, संगीत ऐकणे, भरजरी वस्त्र घेणे, अलंकार घेणे या कशातच आपल्या बंदिवान आत्म्याला मुक्त करण्याची ताकद नाही; पण चिमणीची चिवचिव, कोकिळ पक्षाची कुहूकुहू गुंजाकाची ताकद विलक्षण आहे. फुलपाखराचं या वेलीवरून त्या वेलीवर फिरणं किती मोहक असते. संध्याकाळी गाई घरा येताना त्यांच्या गळ्यांत त्या घंटांच्या मंजुळ नाद किती समाधान देतो; असे हे आनंदाचे सौंदर्याचे लहान-लहान थेंब आपण गोळा केले तर आनंदाचा महासागर निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. मिडास राजाच्या हव्यासापोटी त्याला मुलीला गमावावे लागले. कारण सोने अधिकाधिक मिळावे असे त्याला वाटले म्हणून त्याने वर मागितला. ज्या वस्तूला त्याचा स्पर्श होईल त्यांचे सोने होईल. त्याच्या अलिशान पलंगाला त्याचा स्पर्श झाला तो सोन्याचा झाला. त्यांची अत्यंत लाडकी कन्या खेळून महालात आली आणि तिने राजाला मिठी मारली ती सोन्याची पुतळी झाली. राजाला अतिव दु:ख झाले. त्याने पुन: प्रार्थना केली, मला सोने नको माझी सोन्यासारखी लेक मला हवी आहे. यातून असे दिसते की माणुसकी, प्रेम हे जास्त महत्त्वाचे आहे. प्रेमाने आनंद मिळतो. म्हणून म्हटले आहे ‘खरा तो प्रेमाचा न घरी लोभ मनी’ खरं प्रेम त्याग बुद्धीत असले ज्या प्रेमात कल्याणबुद्धी असते, तेच प्रेम खरे शुद्ध प्रेम असते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक