शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

सकाळी उठल्यावर परत परत झोपावेसे वाटते? शिवानी दीदी सांगताहेत उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 13:40 IST

झोपेच्या वेळी झोप येत नाही आणि पूर्ण दिवस जांभई देण्यात जातो; हे तुमच्याही बाबतीत घडत असेल तर दिलेला उपाय करून बघा. 

ब्रह्मकुमारी शिवानी दीदी आपल्या प्रवचनातून नेहमी ब्रह्म मुहूर्तावर उठा असे सांगतात. पण लोकांची स्थिती अशी आहे, की अलार्म बंद करून परत पाच मिनिटं झोपावेसे वाटते. रात्रभर झोपूनही झोप पूर्ण होत नाही. दिवसभर थकवा जाणवतो आणि जांभई येते. जे वेळेवर उठू शकत नाहीत ते ब्रह्म मुहूर्तावर कुठून उठणार? याबाबत शिवानी दिली सांगतात, 

'आपण झोपतो म्हणजे आपले शरीर झोपते. पण मन अविरत जागे असते. त्याला आपण जागे ठेवतो. झोपेपर्यंत हातात मोबाईल असतो. काही ना काही व्हिडीओ पाहिले जातात, फोटो पाहिले जातात, गाणी ऐकली जातात. त्याचा परिणाम मेंदूवर होतो आणि तो तेच विषय मनात अर्थात विचारात घोळवत राहतो. त्यामुळे विचार चक्र सुरु राहते आणि वेळेवर झोप येत नाही. 

'दिवसभर डोक्यात इतके विचार असतात, की पाठ टेकवल्यावर शरीर थांबते पण विचार थांबत नाहीत. त्या विचारांवर विचार सुरू राहतात आणि झोपेचं खोबरं होतं. नावाला रात्रभर झोपतो पण मेंदूची झोप पूर्ण न झाल्याने दिवसभर ग्लानी येत राहते आणि आळस चढतो.'

'योगशास्त्रात झोपेला योगनिद्रा म्हटले आहे. योगनिद्रा ही तना-मनावरचा थकवा घालवते. याउलट आपण पाच-सहा तास झोपूनही आणखी झोप घेण्यासाठी आसुसले असू तर तना-मनाचे चार्जिंग पूर्ण झालेले नाही असे समजावे. टीव्ही, मोबाईल, अन्य गॅझेटच्या अति वापराचा हा दुष्परिणाम आहे. त्यामुळेच दिवसभर कुठेही बसलात तरी पटकन झोप लागते. 

'झोपेकडे ध्यान म्हणून बघायचे असेल तर त्याची पूर्व तयारीदेखील तशीच असायला हवी. सूर्यास्तानंतर आपण ज्याप्रमाणे अन्न आणि पाण्याचे सेवन कमी कमी करत जातो, त्याप्रमाणे गॅझेट बाबतीतही करायला हवे. टीव्ही, मोबाईलचा वापर कमी करून रात्री नऊ नंतर शरीर आणि मनाला वैचारिक खाद्य पुरवू नये. रात्री १० वाजता झोपण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा. झोपण्यापूर्वी काही क्षण शांत बसून प्राणायाम करावे. श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यानमग्न व्हावे आणि झोपी जावे. 

लवकर झोपल्याने जागही लवकर येते आणि अलार्म वाजण्याआधीच झोप पूर्ण होते. ब्रह्म मुहूर्तावर उठून ध्यानधारणा केल्याने करिअर आणि आरोग्याबाबतीत अनेक लाभ होतात. तसेच झोपेची तक्रार दूर होते आणि दिवसभर थकवा न जाणवत ताजेतवाने वाटते.