शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

देवापर्यंत पोहोचायचे आहे? तर नाम घेतलेच पाहिजे!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 1, 2021 16:25 IST

भगवंताला सगुण म्हणो की निर्गुण रे, असा संतांना प्रश्न पडला. परंतु, त्या ईश्वर तत्त्वाला नाम देऊन त्याची भक्ताला ओळख पटली. त्याच्या नामोल्लेखाने, उच्चाराने भगवंताप्रती आत्मियता वाटू लागली, तेच हे नाम भक्त आणि भगवंताला जोडणारा दुवा ठरले. म्हणून भगवंत भेटीची तळमळ असेल, तर नित्य नाम घेतलेच पाहिजे.

ज्योत्स्ना गाडगीळ 

शेक्सपिअरने म्हटले होते, नावात काय आहे. परंतु, अध्यात्म सांगते, नावात सगळे काही आहे. मग ते व्यक्तीचे असो, नाहीतर परमेश्वराचे! नावात ओळख आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे, प्रेम आहे. म्हणून तर बाळ जन्माला आल्यावर बाराव्या दिवशी किंवा बारशाच्या दिवशी आपण त्याचे नाव ठेवतो, म्हणजेच त्याला ओळख देतो. पाळीव प्राण्यांचेही लोक नामकरण करतात. रस्त्याने फिरणाऱ्या प्राण्यांना नाव नसते, परंतु कुत्रा, मांजर, गाय हे उपनामदेखील त्यांची ओळखच आहे. थोडक्यात नावाने ओळख प्राप्त होते, म्हणून नाव महत्त्वाचे. लहान मुलाला वड, पिंपळ हा फरक कळला नाही, तरी त्याला हे झाड आहे, हे नक्कीच कळते. म्हणजेच नावाशिवाय अस्तित्वाला ओळख मिळणारच नाही. तीच बाब अध्यात्मामध्ये सांगितली आहे. 

भगवंताला सगुण म्हणो की निर्गुण रे, असा संतांना प्रश्न पडला. परंतु, त्या ईश्वर तत्त्वाला नाम देऊन त्याची भक्ताला ओळख पटली. त्याच्या नामोल्लेखाने, उच्चाराने भगवंताप्रती आत्मियता वाटू लागली, तेच हे नाम भक्त आणि भगवंताला जोडणारा दुवा ठरले. म्हणून भगवंत भेटीची तळमळ असेल, तर नित्य नाम घेतलेच पाहिजे.

हेही वाचा : प्रतिक्रिया टाळा आणि प्रतिसाद द्यायला शिका, आयुष्यात खूप यशस्वी व्हाल! - गौर गोपाल दास

सासरी आलेली मुलगी, आपले नाव बदलले, तरी मूळची ओळख विसरत नाही. कोणी तिला माहेरच्या नावाने हाक मारली, तरी तिला गलबलून येते. नावाइतकाच तिला आपल्या आडनावाबद्दलही प्रेम असते. म्हणून अलीकडे तर ती माहेर आणि सासर अशी दोन्हीकडची आडनावे लावते. दोन्ही कुटुंबाना ती धरून असते आणि दोन्ही घराण्यांचा नावलौकिक वाढवते. 

मुलांनी आपल्या कर्तुत्त्वाने नाव कमावले, तर मागच्या पिढ्यांचाही नामोल्लेख केला जातो. त्यांची परंपरा सांगितली जाते. नावाला विशेषणे चिकटतात. अमक्याचा मुलगा, तमक्याचा नातू ही व्यक्तीवैशिष्ट्येही जोडली जातात. 

कधी कधी आपल्याला लोकांचे चेहरे लक्षात नाहीतर नाव. 'नाव ऐकून आहे, पण प्रत्यक्ष भेटलो नाही' असे आपण म्हणतो. म्हणजेच प्रत्यक्ष भेट झालेली नसेल, तरीही संबंधित व्यक्तीचा लौकिक तिच्या नावावरूनही कळतो किंवा चेहरा लक्षात असेल, तरीही त्याला नाम जोडले गेले, की ओळख लवकर पटते. 

नुसत्या नावानेही अनेकांची कामे होतात. दुसऱ्याच्या नावावर स्वत:चे पोट भरणारेही अप्पलपोटी लोक असतात. आपले कर्तृत्त्व शून्य असेल, तर 'नाव मोठे आणि लक्षण खोटे' असा उपरोधिक टोलाही लगावला जातो. नाव कमावण्यासाठी लोकांची हयात खर्ची होते. नाव टिकून राहावे, म्हणून चारित्र्य जपले जाते. 

अशी नामाची व्यावहारिक उदाहरणे पाहता, नामाचे महत्त्व लक्षात आले असेल. भौतिक जगतात नामाचे एवढे महत्त्व, तर पारमार्थिक दृष्ट्या किती, याची कल्पनाच केलेली बरी! नुसत्या नामाने अनेक भक्त हा भवसागर तरून गेले. त्या नामाची गोडी आपल्यालाही लागावे असे वाटत असेल, तर नाम सातत्याने घेतलेच पाहिजे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनात म्हणतात, `जसे आपले आपलेपण आपल्या नावात आहे, तसे देवाचे देवपण देवाच्या नामात आहे. नाम घेता घेता नामरूप झाले पाहिजे, तरच भगवंताची भेट होऊ शकेल.' 

हेही वाचा : विश्वनाट्य सूत्रधार तूच श्यामसुंदरा...; सृष्टीच्या निर्मात्याला - परमेश्वरासाठी रचलेली 'नांदी'