शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दीर्घायुष्य हवंय ? मग 'या' आहारपद्धतीचा अवलंब करा.

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 1, 2021 13:48 IST

आहाराचे व्यवस्थापन उचित वेळी झाले नाही, तर अन्नापेक्षा जास्त गोळ्यांचा भडीमार शरीरावर होऊ लागतो.

आपण काय खावे आणि काय खाऊ नये, याबद्दल आपल्यापेक्षा लोकांनाच आपल्या स्वाथ्याची काळजी दिसून येते. जो उठतो, तो वेगवेगळे सल्ले देतो. इंटरनेटवर तर सगळाच भुलभुलैया आहे. कोणी दोन वेळेस जेवणाचा सल्ला देतो, तर कोणी दर दोन तासांनी! कोणी म्हणतो पोळी खाऊ नका, कोणी म्हणतो भात खाऊ नका! सकाळी उठल्यावर अंश पोटी खाण्याच्या पदार्थांची यादी काढली, तर ती एवढी मोठी निघेल, की ते खाल्यानंतर दिवसभर जेवायची वेळच येणार नाही. 

अशीच सगळी माहिती वाचून गोंधळलेल्या एक मावशी डॉक्टरांकडे गेल्या. 'काही केल्या माझे वजन कमी होत नाही, त्यावर काहीतरी उपाय सांगा डॉक्टर', असे म्हणाल्या.

डॉक्टरांनी त्यांना दहा बारा प्रकारच्या रंगीबेरंगी गोळ्या दिल्या. गोळ्यांची पुडी मावशींच्या हाती दिली. मावशींचा पुढचा प्रश्न तयार होता. त्या म्हणाल्या, 'डॉक्टर या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या, की जेवणानंतर?'डॉक्टर म्हणाले, `मावशी, या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या नाहीत, किंवा जेवणानंतरही घ्यायच्या नाहीत...'`मऽऽऽग?' मावशींनी आ वासला.'या गोळ्या जेवणा`ऐवजी' घ्या...!'

या प्रसंगातला गमतीचा भाग सोडा, परंतु खरोखरच, आहाराचे व्यवस्थापन उचित वेळी झाले नाही, तर अन्नापेक्षा जास्त गोळ्यांचा भडीमार शरीरावर होऊ लागतो. म्हणून शरीराची गरज ओळखून त्याला उचित वेळी अन्नपुरवठा केला पाहिजे. ज्यामुळे अन्नाचे रुपांतर आळसात किंवा मेदात न होता ऊर्जेत होईल. याबद्दल आयुर्वेद सांगते,

आयुष्यं भोजनं जीर्णे वेगानां चाविधारण्ब्रह्मचर्यमहिंसान च साहसानां च वर्जनम्

सुश्रुतसंहितेतीतल या श्लोकानुसार, आधी जेवलेले अन्न पूर्ण जिरल्यावरच पुन्हा जेवावे. केवळ जेवणाची वेळ झाली म्हणून किंवा वेळ जात नाही म्हणून खात राहणे योग्य नाही. शरीराची चयापचय प्रक्रीया पूर्ण होण्यासाठी त्याला पुरेसा अवधी दिला पाहिजे. तरच, शरीराचे यंत्र सुरळीत चालेल. शिवाय, अन्नाचे पचन नीट होण्यासाठी वाघ मागे लावल्यागत न जेवता सावकाश जेवावे. जेवणात रुची घ्यावी. जेवणाचा आनंद आणि समाधान पंचेंद्रियांपर्यंत पोहोचले पाहिजे. 

याचबरोबर मलमूत्र विसर्जनात दिरंगाई करता कामा नये. ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे. म्हणजेच कामवासनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. हिंसा आणि नको तिथे साहस टाळले पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे शरीराचे चक्र नियंत्रित राहते. आपल्या षडविकारांवर नियंत्रण राहते आणि सुदृढ देह व प्रसन्न जीनवशैलीमुळे आयुष्य वृद्धिंगत होते.