शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शांत आणि समाधानी आयुष्य जगायचे आहे? मग चाणक्य नीतीनुसार तीन गोष्टींवर नियंत्रण मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 12:40 IST

वादात पडायला कोणालाही आवडत नाही. मात्र अनेकदा आपण विनाकारण वादविवादात अडकतो आणि समोरच्याशी वैर घेऊन बसतो. त्यामुळे होणार मनःस्ताप आणखीनच वेगळा. या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी ...

चाणक्य नीती हा महान कूटनीतीज्ञ आणि अर्थतज्ञ आचार्य चाणक्य यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्यात त्यांनी मानवी आयुष्यातील अनेक बाजूंवर सखोल विचार करून त्यावर तोडगे दिले आहेत. ते अमलात आणले तर आपल्यालाही यशस्वी आयुष्याच्या दिशेने निश्चितपणे घोडदौड करता येईल. यासाठी त्यांनी शिकवलेल्या नीतिमूल्यांचा बारकाईने अभ्यास करू आणि ते मंत्र आत्त्मसात करू. 

वादात पडायला कोणालाही आवडत नाही. मात्र अनेकदा आपण विनाकारण वादविवादात अडकतो आणि समोरच्याशी वैर घेऊन बसतो. त्यामुळे होणार मनःस्ताप आणखीनच वेगळा. या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आचार्य चाणक्य तीन गोष्टींवर ताबा मिळवा असे सुचवतात. त्या तीन गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊया. 

अहंकार : अहंकाराची बाधा झालेला मनुष्य कधीच यशस्वी होऊ शकत नाही. स्वतःला सर्वेसर्वा समजण्यात आणि स्वतःची योग्यता सिद्ध करण्यात त्यांचे आयुष्य खर्च होते. गर्वाचे घर खाली, अशी आपल्याकडे म्हण आहे, ती यासाठीच! स्वाभिमान असावा पण अभिमान नसावा. स्वाभिमान आत्मविश्वास वाढवतो तर अभिमान अहंकाराला खतपाणी घालतो! अहंकाराची पट्टी डोळ्यावर बांधली गेली की आपण आपल्या कलागुणांचा योग्य वापर करू शकत नाही. इतरांकडून चांगले शिकण्याची क्षमता गमावून बसतो. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, अशी देवाजवळ प्रार्थना करायची आणि आपण स्वतःशी कायम प्रामाणिक राहायचे!

स्वार्थ : स्वार्थाने बरबटलेली व्यक्ती दुसऱ्यांचे हित पाहू शकत नाही. ती आपल्याच कोशात असते. आपले भले कशात आहे, हे पाहण्याची क्षमता गमावून बसते. त्यातही ताणतणाव आणि वादग्रस्त परिस्थिती असेल, तर अशावेळी स्वार्थी व्यक्ती दुसऱ्यांसमोर लाचार होते. त्यांच्या तालावर नाचते आणि आत्मसन्मान गमावून बसते.

क्रोध : तुम्ही जेवढे आजवर काही कमावले, ते सगळे एका क्षणात गमावण्याची ताकद रागात असते. कारण तुमचा राग तुमच्या व्यक्तिमत्त्वाची उणी बाजू दाखवतो. राग, क्रोध रास्त जागी असेल तर समोरच्या जरब बसते. याउलट तो अनाठायी व्यक्त झाला तर केवळ एका शब्दाने नाहीतर कृतीने तुम्ही आजवर कमावलेला चांगुलपणा गमावून बसतो. 

अशा या तीन महत्त्वाच्या गोष्टी दिल्यानुसार आटोक्यात ठेवल्या तर या शहरी कोलाहलातही तुम्हाला शांतता आणि समाधान नक्की गवसेल!