शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

भूतकाळ विसरायचा आहे? भगवान बुद्धांची शिकवण देणारी ही कथा वाचा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 2, 2021 09:00 IST

भूतकाळात अडकून राहिलात तर आयुष्यात पुढे कधीच जाऊ शकणार नाही. सदैव दुसऱ्यांना मदत करा आणि केलेल्या मदतीची जाणीवही मनातून पुसून टाका

भविष्याकडे वाटचाल करताना अनेकदा भूतकाळ आडवा येतो. मात्र भूतकाळामुळे भविष्यच नाही, तर वर्तमानाचा विकासही थांबतो. म्हणून शक्य तेवढ्या लवकर भूतकाळातील गोष्टी विसरून वर्तमानकाळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे सोपे नाही, परंतु अशक्यही नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न कसे असायला हवेत, वाचा ही गोष्ट!

भगवान गौतम बुद्ध यांच्या असंख्य शिष्यपरिवारापैकी दोन शिष्य भिक्षा मागण्यासाठी गावात गेले होते. गाव मठापासून दूर होते. पावसाचे दिवस होते. सायंकाळी लवकर काळोख होत होता. अशात आभाळ आले आणि काही क्षणात पावसाला सुरुवात झाली. भिक्षा मिळवली होती, परंतु पाऊस थांबण्याची वाट पाहत बसलो, तर मठात पोहोचायला उशीर झाला असता. 

त्या दोघांपैकी एक भिखू तरुण तर दुसरा थोडा बुजूर्ग होता. दोघांनी पावसात भिजत भिजत पुढे निघायचे ठरवले आणि दोघे चालू लागले. वाटेत एक नदी होती. पावसाच्या पाण्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढत होती. आणखी पूर येण्याआधी नदी ओलांडलेली बरी, अशा बेताने दोघे जण नदी पार करण्यासाठी कटीबद्ध झाले.

तेवढ्यात काही अंतरावरून एका तरुणीचा आवाज आला. त्या दोघांनी मागे वळून पाहिले, तर एक तरुणी राजकुमारीसारखा पोशाख आणि अलंकार लेवून मदतीसाठी विनवणी करत होती. दोन्ही शिष्यांना अडवून ती त्यांच्याजवळ पोहोचली. तिने राजकुमारी म्हणून आपली ओळख करून दिली आणि शिकारीसाठी आले असताना शिपायांशी ताटातूट झाली, असे तिने सांगितले. नदीच्या पलीकडे आपल्या वडिलांचा राजवाडा आहे आणि ते आपली वाट बघत असतील. कृपया नदी ओलांडण्यासाठी सहाय्य करावे, असे ती सांगू लागली. 

वास्तविक पाहता संन्यस्त जीवन जगणाऱ्या व्यक्तीने परस्त्रीला स्पर्श करू नये, असा नियम होता. परंतु, तिला मदतीची गरज आहे पाहून तरुण भिखूने तिला खांद्यावर घेत नदी पार करून दिली. पाठोपाठ ज्येष्ठ भिखूदेखील चालत आले. 

दोघेजण मठात पोहोचले. तरुण भिखूने परस्त्रीला स्पर्श केला आणि आजवरची शिकवण वाया घालवली, याचा राग ज्येष्ठ भिखूंच्या मनात होता. रागारागात ते जेवले आणि जेवण झाल्यावर त्यांनी भगवान बुद्धांची भेट घेतली. त्यांना घडलेला प्रसंग सांगितला आणि तरुण भिखू शिष्य म्हणून कामाचे नाहीत, हे पटवून दिले. त्यांचे सर्व बोलणे ऐकून भगवानांनी तरुण भिखूला बोलावून घेतले आणि परस्त्रीला स्पर्श केला का, अशी विचारणा केली. त्यावर थोडासा डोक्यावर ताण देत तरुण भिखू म्हणाला, `हो भगवान, मी राजकुमारीला मदत म्हणून खांद्यावर घेतले आणि नदी पार करून तिला तिच्या मार्गाने जाऊ दिले. माझ्या खांद्यावरून राजकुमारी कधीच उतरली, परंतु ज्येष्ठ भिखू अजूनही राजकुमारीला घेऊन इथवर आले आहेत. म्हणजे ओझे कोण वाहतेय ते तुम्हीच ओळखा!'

तरुण भिखुच्या बोलण्यावर मंद स्मित करून भगवान, ज्येष्ठ भिखुला उद्देशून म्हणाले, `परस्त्रीला मदत करण्यासाठी केलेला स्पर्श आणि वासनेने केलेला स्पर्श यात खूप अंतर आहे. तरुण भिखूने मदत केली आणि तो विसरूनही गेला. तुम्ही मनावर ओझे ठेवत त्याची तक्रार केलीत. याचा अर्थ तुम्ही त्या राजकुमारीला प्रत्यक्ष स्पर्श न करताही खांद्यावर घेऊन वावरलात. असे वागण्याची दिक्षा मी दिली नाही. तुम्ही एवढी वर्षे मठात काढूनही जो बोध घेतला नाहीत, तो तरुण भिखूने घेतला. चांगले कार्य करा आणि विसरून जा. भूतकाळात अडकून राहिलात तर आयुष्यात पुढे कधीच जाऊ शकणार नाही. सदैव दुसऱ्यांना मदत करा आणि केलेल्या मदतीची जाणीवही मनातून पुसून टाका. तरच आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकाल.