शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Waman Jayanti 2023: वामन अवतारात विष्णूंनी ज्या बलीराजाचा उद्धार केला तो आपल्या शेतकऱ्यांचा बळी राजा नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 15:37 IST

Waman Jayanti 2023: बटू वामनाने दैत्यराज बळी याचा पराभव केला असा गैरसमज करून अनेक जण अज्ञानापोटी वामन अवतारावर आक्षेप घेतात; त्यासाठी ही माहिती!

>> रोहन उपळेकर  

आज भाद्रपद शुद्ध द्वादशी, भगवान श्रीमहाविष्णूंच्या पाचव्या श्रीवामन अवताराची जयंती आणि श्रीज्ञानेश्वरकन्या प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज यांची पुण्यतिथी! श्रीभगवंत अत्यंत भक्तवत्सल आहेत, त्यांचे आपल्या भक्तांवर स्वत:पेक्षाही जास्त प्रेम असते आणि विविध प्रसंगांनी आपले ते निखळ प्रेम श्रीभगवंत व्यक्त करतातच. अशीच एक निरतिशय प्रेमाची सुखद लीला म्हणजेच श्रीभगवंतांचा श्रीवामन अवतार होय!

प्रात:स्मरणीय भक्तराज श्री बलिराजा यांच्या उद्धारासाठी आणि देवतांचे राज्य त्यांना पुन्हा प्रदान करण्यासाठी हा अवतार झाला. पण भक्तिशास्त्रात सांगितलेले भक्तांचे माहात्म्यच खरेतर या लीलेतून अधिक उजळून निघताना दिसते. भक्त कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही थराला जाऊनही आपल्या लाडक्या श्रीभगवंतांना धरूनच ठेवतात, त्यांची प्राप्ती करूनच घेतात, हेच या सुमधुर लीलेतून दृग्गोचर होते.

येथे एका मुद्द्याचे स्पष्टीकरण करावेसे वाटते. सध्याच्या काळात अनेक धर्मविरोधी शक्ती आपापल्या अकलेचे तारे तोडून काहीही वाटेल ते, बिनबुडाचे मेसेज सोशलमिडियावर पाठवीत असतात. त्यांपैकीच एक म्हणजे, श्रीवामनावताराचा उगीचच निषेध करणे होय. आपल्याकडे शेतकऱ्याला 'बळीराजा' म्हणतात, त्यात या दैत्यराज बळीचा काहीही संबंध नाही. काही लोक लिहितात की, या श्रीवामनांनी भारताच्या मूळनिवासी बळीराजाचा व त्याच्या प्रजेचा नाश केला, बलीचे राज्य हरण केले वगैरे... 

मुळात शेतकऱ्यांचा राजा बळी म्हणजे हा दैत्यराज बळी नव्हे. भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू भगवान श्रीबलिभद्र, श्रीबलराम हे शेतकऱ्यांचे राजे मानले जातात. म्हणूनच तर त्यांचे आयुध हल किंवा नांगर आहे, जे सर्व शेतकऱ्यांचे अत्यंत आवश्यक असे हत्यार आहे. 'हलधर' हे त्यामुळेच श्रीबलरामांचे एक नाव आहे. काही लोक नीट अभ्यास न करता श्रीवामनावताराचा फुकटच निषेध करीत बसतात. त्यांच्या समाजविरोधी, धर्मविरोधी बाष्कळ बडबडीकडे लक्ष देऊ नये ही विनंती. भगवान श्रीवामन हे प्रत्यक्ष भगवान श्रीमहाविष्णू आहेत. श्रीभगवंत कधीच कोणाचेही अकल्याण करीत नाहीत, हे आपण नेहमीच पक्के लक्षात ठेवले पाहिजे !