शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Vijaya Ekadashi 2023: भगवंत प्रत्येकावर बारीक नजर ठेवून आहे, याची साक्ष पटवून देणारी छोटीशी कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 18:12 IST

Vijaya Ekadashi 2023: ज्याने चोच दिली तो चारा देतोच, असे म्हणतात, अशी उदाहरणं वाचली, अनुभवली की आपलीही खात्री पटते, नाही का?

आपण सगळेच जण कोणा न कोणाला उत्तर देण्यासाठी बांधील असतो. आपण वरिष्ठांना उत्तर देतो, वरिष्ठ त्यांच्या वरिष्ठांना उत्तर देतात. सगळ्या कर्मचाऱ्यांचा मालक असतो, तो कर्मचाऱ्यांना उत्तर देण्यास बांधील असतो. याचाच अर्थ आपल्या कामावर लक्ष ठेवणारे असतातच. मग तुम्ही मालक असाल नाहीतर सेवक. अहो आपले जाऊद्या, पण खुद्द परमेश्वरालासुद्धा आपल्या कामाची पावती द्यावी लागते, तिथे आपली काय कथा? पण कामात चोख असणाऱ्याला शिक्षेची भीती नसते. भगवान विष्णूंच्या बाबतीत एकदा असेच झाले. लक्ष्मी मातेने त्यांची एकदा परीक्षा घेतली, त्यात ते उत्तीर्ण झाले की नाही, हे जाणून घेण्यासाठी पुढील कथा वाचा. 

परमपिता परमात्म्याने ब्रह्मा विष्णू महेश या देवांना निर्माण करून सृष्टीचे चलन वलन करण्याचे कार्य सोपवले. त्यांच्यापैकी भगवान विष्णू यांना सृष्टीच्या पालनपोषणाची जबाबदारी दिली.

एकदा माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणली, 'भगवान आज आपण भूतलावरील सर्व प्राणिमात्रांच्या भर पोषणाची जाबदारी योग्यरित्या पार पाडून आलात का?'भगवान विष्णू म्हणाले, 'होय देवी. या धरतीवरील प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जगत असतो. विधात्याच्या नियमाुसार प्रत्येक जीव उपाशी राहू नये याची मी काळजी घेत असतो.'माता लक्ष्मी म्हणाल्या, 'परंतु भगवान या क्षणी मात्र एक जीव उपाशी आहे. त्याच्या भोजनाची व्यवस्था आपण कशी करणार?'भगवान विष्णू म्हणाले, 'मी माझ्या कर्तव्यात कसर ठेवली नाही. या क्षणी कोणताही जीव उपाशी नाही, हे मी खात्रीने सांगतो.'माता लक्ष्मी म्हणाल्या, 'हातच्या कंकणाला आरसा कशाला? आता मी पुराव्यासह दाखवते.' 

असे म्हणून लक्ष्मीमातेने एक बंद डबी दाखवली. 'भगवान, या डबीत एक चिमुकला जीव कालपासून उपाशी आहे. कालच मी एका मुंगीला पकडून या डबीत बंद करून ठेवले आहे. तिला अन्न कुठून मिळणार बरं?'भगवान विष्णू म्हणाले, 'आणा ती डबी इथे!'

त्यांनी डबी उघडून दाखवली. आतमध्ये मुंगी तांदळाच्या दाण्याचा मजेत आस्वाद घेत होती. ते दृष्य पाहून माता लक्ष्मी ओशाळल्या. त्या क्षमा मागत म्हणाल्या, 'भगवान एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही, की ज्यावेळी मी हा जीव डबीत कोंडून ठेवला तेव्हा तिथे तांदळाचा दाणा कसा आला?'भगवान विष्णू म्हणाले, 'देवी प्रत्येक जीवामध्ये मी साक्ष रूपाने असतो. ज्यावेळी तुम्ही मुंगीला बंद करणयासाठी डबी उघडली, तेव्हा तुमच्या कपाळावरील तांदळाचा दाणा त्या डबीत पडला आणि त्या जीवाची भोजनाची व्यवस्था झाली.'

ईश्वर प्रत्येक प्राणिमात्राचा भार वाहत असतो. परंतु आपल्याला ईश्वरी कृपेचा ठाव लागत नाही. म्हणून संत कबीर म्हणतात,  चिटी के पग में घुंगरू बांधे, वह भी अल्ला सुनता है!रामनाम तू भजले प्यारे काहे को मगरूरी करता है!

जर भगवंत त्यांची कामगिरी चोखपणे बजावत आहेत, तर आपण आपल्या कामात कसूर का ठेवा? नाही का?