शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

Vidur Niti : विदुरनीतीनुसार जगात तीच व्यक्ती सुखी राहू शकते, जी 'या' नियमांचे काटेकोरपणे पालन करते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 23:33 IST

Vidur Niti: युद्धाचे भीषण पडसाद आपल्या दूरदृष्टीने ओळखून विदुराने केलेली चर्चा इतिहासात विदुर नीति म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याचा अंश आपल्याही कामी येईल!

भारतात पूर्वापार तत्त्ववेत्यांची जणू खाणच होती, आजही आहे. अनेक ऋषीमुनींनी, तपस्वींनी, राजा महाराजांनी, धर्मप्रचारकांनी, अभ्यासकांनी आपल्या स्वानुभवातून आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी नियमावली घालून दिली. तिलाच आपण नीति असे म्हणता़े  भीष्म नीति, मनु नीति, चर्वाक नीति, शुक्र नीति, बृहस्पति नीति, परशुराम नीति, गर्ग नीति इ. नीतिज्ञ आपल्याकडे होऊन गेले. चाणक्य यांच्यानंतरही भर्तृहरी, हर्षवर्धन, बाणभट्ट यांची नीति अभ्यासली जाते. आज आपण विदुर नीति समजून घेणार आहोत.

विदुर हे महाभारतातील बुद्धिमान अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जात असत. ते धृतराष्ट्र आणि पांडु यांचे सावत्र भाऊ होते. तर कौरव आणि पांडवांचे काका होते. त्यांचा जन्म एका दासीच्या पोटी झाला. परंतु त्यांनी अथक मेहनत घेऊन ज्ञान प्राप्त केले आणि स्वत:ची ओळख बनवली. 

विदुर नीति म्हणजे महाभारताच्या युद्धपूर्वकाळात विदुर आणि धृतराष्ट्र यांच्यात झालेला मार्मिक संवाद आहे. युद्धाचे भीषण पडसाद आपल्या दूरदृष्टीने ओळखून विदुराने केलेली चर्चा इतिहासात विदुर नीति म्हणून ओळखली जाऊ लागली. त्याचा काही अंश पुढीलप्रमाणे-

  • जे धन मिळवताना तुम्हाला शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो, धर्माविरुद्ध आचरण करावे लागते, शत्रूशी लाचारी पत्करावी लागते, असे धन मिळूनही त्याचा उपयोग होत नाही, त्यापेक्षा त्याचा त्याग करणे योग्य!
  • परस्त्री आणि परधन यांचे आकर्षण षडरिपूंना आमंत्रित करते. त्याचा मोह ठेवू नये.
  • परमेश्वराव्यतिरिक्त अन्य कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. व्यक्ती आणि विचार कधीही बदलू शकतात.
  • संसार सुखासाठी फक्त पुरेशी धनप्राप्ती, निरोगी शरीर, पतिव्रता पत्नी, गुणी मुले, उत्पन्न मिळवून देईल असे शिक्षण किंवा कला आवश्यक असते़
  • क्षमा करण्यात दुर्बलता नसून, तुमच्या मनाचा मोठेपणा दर्शवणारा गुण आहे.
  • काम, क्रोध, लोभ नरकाकडे नेणारे मार्ग आहेत. त्यावर नियंत्रण मिळवले पाहिजे.    
  • दुसऱ्यांशी सतत स्पर्धा करणारी, असंतुष्ट राहणारी, दुसऱ्याचा मत्सर करणारी, असूया करणारी व्यक्ती स्वत: आनंदी राहू शकत नाही आणि दुसऱ्याला आनंदी ठेवू शकत नाही.
  • जो यशाने फुलून जात नाही आणि अपयशाने खचून जात नाही, अशी व्यक्ती जीवनाचा उत्कर्ष साधू शकते.
  • ज्याच्याकडे धन, पैसा, संपत्ती, सौंदर्य असूनही अहंकार नाही, अशा व्यक्तीला सर्व प्रकारचे सुख आपणहून प्राप्त होते.
  • दोन प्रकारचे लोक स्वर्गप्राप्ती करतात, जे बलवान असूनही दुसऱ्याला अभय देतात आणि जे गरीब असूनही दुसऱ्याला मदत करतात.
  • केवळ धर्म कल्याणकारक आहे. क्षमा हाच शांती मिळवण्याचा मार्ग आहे. विद्या समाधान देणारी बाब आहे, तर अहिंसा हा सुखाचा राजमार्ग आहे.