शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: ताटात मीठ शिल्लक ठेवणे ठरते अशुभ; तेच ठरू शकते आर्थिक ऱ्हासाचे कारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 14:54 IST

Vastu Tips: मिठाशिवाय अन्न अळणी लागते. तो आपल्या जेवणातला अविभाज्य घटक आहे. ते वाया घालवणे हा लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा अपमान आहे. त्यामुळे होणारे नुकसान जाणून घ्या.

पैसे कमवण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात पण काही चुका करतात ज्यामुळे कष्टाने कमवलेला पैसाही टिकत नाही. धर्म पुराण, वास्तुशास्त्र इत्यादींमध्ये या चुका, वाईट सवयींबद्दल माहिती देण्यात आली आहे, जेणेकरून व्यक्तीला त्रास, आर्थिक नुकसान, आरोग्य समस्या इत्यादीपासून वाचवता येईल. आज आपण खाण्याशी संबंधित वाईट सवयींबद्दल जाणून घेऊया ज्या माणसाला गरिबीकडे घेऊन जाऊ शकतात .

ताटात मीठ सोडणे फारच अशुभ आहे

मीठ हे समुद्रातून उत्पन्न होते. लक्ष्मीदेखील समुद्रातून आली आहे. त्यामुळे मीठ हा लक्ष्मीचा भाऊ. त्याचा अपमान झाल्यास लक्ष्मी रुष्ट होते. तसेच जेवताना ताटात मीठ तसेच टाकल्याने अन्नपूर्णादेखील रुष्ट होते. अन्नपूर्णा हे देखील देवीचे रूप आहे. म्हणून तिची नाराजी दारिद्रयाचे कारण बनते. त्यामुळे नेहमी जेवढे हवे तेवढेच अन्न तसेच मीठ ताटात घ्या. मीठ शेवटी उरले किंवा जास्त झाले असेल तर मिठावर पाणी टाकून मनोमन अन्नपूर्णेची माफी मागावी. त्यामुळे अन्नपूर्णा आणि लक्ष्मी मातेची अवकृपा होण्याचे प्रमाण कमी होते. 

त्याचप्रमाणे आणखीही काही वाईट सवयी - 

काही लोकांना सवय असते की ते बेडवर बसून खातात. असे करणारे लोक नेहमी पैशाच्या तुटवड्याला बळी पडतात. इतकंच नाही तर शास्त्रात असंही सांगण्यात आलं आहे की, ही सवय व्यक्तीला कर्जबाजारी करते. ही स्थिती माणसाला गरीब बनवते. पलंगावर बसून जेवणे हा अन्नपूर्णेचा आणि लक्ष्मी मातेचा अपमान समजला जातो. ती जागा आपण बसण्यासाठी, झोपण्यासाठी वापरतो. तिथे आपल्या पायाची माती लागते. ती आपल्या अन्नात जाऊ नये, हासुद्धा विचार त्याला जोडलेला असावा. म्हणून, जेवताना किंवा काहीही खाताना नेहमी जमिनीवर बसा आणि आपले ताट पाटावर, चौरंगावर ठेवा. जमिनीवर ताट ठेऊन अन्न खाणे देखील चांगले मानले जात नाही. त्यामुळे सूक्ष्म जीव जंतू ताटात जाण्याची भीती असते. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र