शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Valentines Day 2024: प्रेमळ नात्यात व्हॅलेंटाइन्स डे ३६५ दिवस असावा यासाठी जाणून घ्या नात्यातले मर्म!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 12:11 IST

Relationship Goals: व्हॅलेंटाईन सप्ताह सुरु झाला आहे, त्यानिमित्ताने या गोड नात्यात सुरुंग कशामुळे लागतो, त्याचे कारण जाणून घेत वेळेतच नात्याची डागडुजी करा!

सध्या प्रेम सप्ताह सुरू झाला आहे. सगळीकडे प्रेमाला बहर काय नि पुर काय येऊ लागलाय. पण हे प्रेम एक दिवस किंवा सप्ताहापुरते मर्यादित का? जर ते आयुष्यभर करता येत असेल आणि मिळवता येत असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात ते जाणून घेऊ.

अलीकडच्या काळात सर्वात मोठे आव्हान आहे, ते म्हणजे लग्न टिकवणे. दर दहा घरांपैकी चार ते पाच घरात घटस्फोटाची उदाहरणे सापडतील! त्याला कारण काय आहे? एकाएक असे काय झाले की भारतीय विवाह पद्धतीचा समतोल ढासळू लागला? लोक लिव्ह इन रिलेशनशिपची मागणी करू लागले? एकमेकांचा सहवास जोडप्यांना असह्य वाटू लागला? मग आधीच्या पिढीने कोणत्या पायावर वैवाहिक जीवनाची पन्नास वर्ष एकत्र काढली? त्याचे मुख्य कारण आहे, विवाह या शब्दाबद्दल असलेली अनभिज्ञता!

विवाह या शब्दाचा अर्थ आहे वाहून घेणे, समर्पित होणे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाच्या पूर्ततेसाठी मनुष्याला जोडीदाराची, सह्चर्याची गरज असते. त्यासाठी विवाह पद्धतीचा संस्कार पूर्वजांनी घालून दिला. कोणतेही नाते एकदिवसात तयार होत नाही, ते रुजायला अनेक वर्षं जावी लागतात. सहवासाने नाते फुलते, बहरते, पण त्यासाठी समर्पण भाव दोहोंच्या ठायी असायला हवा. यासाठी जोडीदार निवडून त्याच्याप्रती समर्पण करणे हे विवाह संस्थेला अभिप्रेत आहे. अन्यथा मनुष्य मन एवढे चंचल आहे, की ते सतत नाविन्याचा शोध घेत राहते. परंतु अनेक नात्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तीची प्रत्येक पातळीवर ओढाताण देखील होते. म्हणून जोडीदाराशी एकनिष्ठ राहून त्याच्याशी प्रतारणा न करणे आणि त्याला सर्वस्व मानून सुखाने संसार करणे हा विवाहाचा मूळ उद्देश आहे. 

इतर नात्यांच्या तुलनेत विवाहाचे नाते हे एकमेव असे नाते आहे जे समानता दर्शवते. त्याचे उदाहरण भगवान महादेव अर्धनारीनटेश्वर या रूपात दर्शवतात. इतर नात्यांमध्ये न दिसणारी समानता नवरा बायकोच्या नात्यात असते. कारण ते परस्पर पूरक असतात. दोघे कमावते असो किंवा नसो त्यांनी संसाराची जबाबदारी समसमान वाटून घेत संसार गाडा पुढे न्यायचा असतो. या रथाचे एक चाक जरी कमकुवत असले तरी हा रथ सुरळीत चालणार नाही. म्हणून दोघांनी एकमेकांचा सन्मान करणे अपेक्षित असते. तसे झाले नाही की वादाची ठिणगी पडते, अहंकाराची वाळवी लागते आणि नात्याला सुरुंग लागून दोन व्यक्तींचे विलगीकरण होते. 

माणसाला सुख दुःखात भागीदार लागतोच! अन्य नाती अशा क्षणी जरी जवळ असली तरी जोडीदार हे आपले अर्धांग असतो. तो आपल्याला पूर्णपणे ओळखून असतो. नाते दृढ असेल तर शब्दांचीही गरज लागत नाही, केवळ नजरेने किंवा देहबोलीने जोडीदाराची मानसिक स्थिती कळू लागते. पण हे कधी? जेव्हा दोघांच्या ठायी ते समर्पण असते. अशात जोडीदाराकडून समर्पणाची अपेक्षा करताना आपण आपल्याकडून पूर्णपणे समर्पित आहोत का, हे आधी ताडून पहा, तसे असेल तर समोरूनही तेवढेच प्रेम, सहृदयता, आत्मीयता, आपुलकी, आदर मिळेल याची शाश्वती बाळगा!

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीकRelationship Tipsरिलेशनशिप