शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

Utpanna Ekadashi 2024: काय आहे उत्पत्ती एकादशीचे महत्त्व आणि फळ? सविस्तर जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 07:00 IST

Utpana Ekadashhi 2024: यंदा २६ नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी आहे, हे व्रत केले असतं मोक्षाची वाट सुकर होते असे म्हणतात, कशी ते पहा!

सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावाने वर्तमानासह मागील जन्माची पापे नष्ट होतात. यासोबतच अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो. ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचा आहे ते उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरु करू शकतात. या एकादशीच्या तिथीला देवीचा जन्म झाला म्हणून तिला उत्पन्ना एकादशी असेही म्हणतात. जाणून घेऊ एकादशीचे महत्त्व आणि कथा. 

पौराणिक कथा : 

सत्ययुगात नदीजंग नावाचा एक राक्षस होता, त्याच्या मुलाचे नाव मुर होते. पराक्रमी आणि बलवान राक्षस मुरने इंद्र, वरुण, यम, अग्नि, वायू, ईश, चंद्रमा, नैरुत इत्यादी स्थानांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्याच्याकडून सर्व देवांचा पराभव झाला होता. आपले दु:ख घेऊन सर्वजण कैलाशपती शिवाच्या आश्रयाला पोहोचले आणि सर्व हकीकत सांगितली. या समस्येच्या निराकरणासाठी देवांचा देव महादेवाने देवांना जगाचा रक्षक, दुःखाचा नाश करणारे भगवान विष्णू यांच्याकडे जाण्यास सांगितले.

मुर-हरी यांच्यातील युद्ध दहा हजार वर्षे चालले

मायावी मूरने स्वर्गीय जगाचा ताबा घेतला होता, सर्व देव त्याच्यापासून बचाव करण्यासाठी पळत होते. भोलेनाथांच्या आज्ञेचे पालन करून देवता श्री हरी विष्णू यांच्याकडे पोहोचले आणि त्यांनी आपले दुःख इंद्राला तपशीलवार सांगितले. देवतांना वाचवण्याचे वचन देऊन भगवान विष्णू युद्धभूमीवर पोहोचले. येथे मुर सैन्यासह देवांशी लढत होते. विष्णूना पाहताच त्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. असे म्हणतात की मुर-श्री हरी यांच्यातील हे युद्ध 10 हजार वर्षे चालले, विष्णूंच्या बाणाने मुरचे शरीर छिन्नभिन्न झाले परंतु वराचा पराभव झाला नाही.

उत्पन्ना देवीचा जन्म :

भगवान विष्णू युद्ध करताना थकले आणि बद्रिकाश्रम गुहेत जाऊन विश्रांती घेऊ लागले. राक्षस मुरही विष्णूचा पाठलाग करत तिथे पोहोचला. भगवान विष्णूच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली देवी जन्माला आली तेव्हा तो श्रीहरीवर हल्ला करणार होता.त्या देवीने त्या राक्षसाचा वध केला. भगवान विष्णूंनी देवीला सांगितले की, तुझा जन्म माझ्या आवडत्या एकादशी तिथीला झाला आहे, म्हणून आजपासून तुझे नाव उत्पन्ना एकादशी असे होईल.तिच्यामुळे राक्षसाचे जन्मोजन्मीचे पाप नष्ट होऊन त्याला मोक्ष मिळाला. म्हणून ही एकादशी पापक्षालन करणारी म्हणून ओळखली जाऊ लागली. 

एकादशीचे व्रत :

या एकादशीला दोन्ही वेळेस उपास करावा. शक्यतो फलाहार करावा. दैनंदिन काम करावे. मुखाने 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा मंत्रोच्चार करावा. विष्णू सहस्त्रनामाचे श्रवण किंवा पठण करावे. दुसऱ्या दिवशी स्नान, देवदर्शन झाले की एकादशीचा उपास सोडावा.