शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'खेडी सुधारत नाहीत, तोवर भारत सुधारला असे म्हणता येणार नाही!' - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 11:33 IST

साध्या सोप्या शब्दात रचलेली ग्रामगीता आपण याआधी कधी वाचली नसेल, तर तुकडोजी महाराजांच्या जयंतीहून दुसरे चांगले औचित्य ते काय?

राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हायला हवे. खेडे हे एक स्वयंपूर्ण घटक म्हणून भारतात असायला हवे, तरच भारत प्रगत राष्ट्रांमध्ये मान्यता पावेल, असा उदात्त विचार देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ३० एप्रिल रोजी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून घेऊ. 

तुकडोजी महाराज विशेषकरून ओळखले जातात, ते त्यांच्या समाजसेवेमुळे आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेमुळे. `सर्व जीव देवासमान समजून पूजा करा' हे गीतेचे सार तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून सोपे करून मांडले आहे.

बालपणीच अडकोजी महाराजांचे शिष्यत्त्व पत्करून त्यांनी परमार्थ मार्गातील साधना करण्यात काही वर्षे घालवली. ही साधना चालू असताना त्यांनी जगास उपदेश करण्याचे कार्य सुरू केले. महात्माजींच्या प्रेरणेने त्यांनी ईशस्तवनाबरोबर गावातील सामाजिक सुधारणा, सर्वांगीण सुधारणा, शिक्षण, ग्रामविकास इ. गोष्टींवर भर दिला. 

गावोगावी फिरून समाज प्रबोधन केले. `श्रीगुरुदेव' नावाचे मासिक काढून अनेक वर्षे चालवले. वऱ्हाडात 'मोझेरी' या गावी एक आश्रम बांधला. गावोगावी त्याच्या शाखा उपशाखा काम करत असत. त्यामुळे नागपूर-वऱ्हाडात त्या सेवामंडळाचा मोठा अनुयायी वर्ग निर्माण झाला.

ग्रामसफाई, सुतकताई, दवाखाने, शाळा, प्रार्थना वगैरे अनेक गोष्टींद्वारा त्यांनी ठिकठिकाणी खेड्यांना शिस्तीचे आणि समाजसेवेचे वळण लावले. त्या कार्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची केले. प्रकृती ठीक नसतानाही जपानमध्ये जाऊन तेथे भरलेल्या धर्मपरिषदेत आपल्या मानवताधर्माचे स्वरूप विशद करून सांगितले.

तुकडोजी महाराजांच्या कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. गावोगावी सामुदायिक प्रार्थना होऊ लागल्या. शेकडो सेवक निर्माण झाले. आधुनिक विज्ञानाचे भांडवल नसतानाही निष्ठा व श्रद्धा या शिदोरीवर जगून समाजाच्या मूलभूत प्रेरणेला जागृत करण्याचे काम होऊ लागले. खेड्यातील अज्ञ जनता शिक्षाबद्ध होऊ लागली. खेड्यात खराटे खरखरू लागले, रस्ते नाल्या बांधल्या जाऊ लागल्या. हे कार्य ज्या शब्दांनी, ज्या भावनांनी, ज्या विचारांनी साधले त्या सगळ्याचा सुव्यवस्थित संग्रह म्हणजे 'ग्रामगीता'!

तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत ४१ अध्यायांमध्ये जे विषय हाताळले आहेत, त्यांच्या नुसत्या शीर्षकावरून आपल्याला ग्रामगीतेचे मर्म लक्षात येईल. देवदर्शन, धर्माध्ययन, आश्रमधर्म, संसार-परमार्थ, वर्ण व्यवस्था, संसर्ग प्रभाव, आचार प्राबल्य, प्रचार महिमा, सेवा सामथ्र्य, संघटनशक्ति, ग्रामरक्षण, ग्रामशुद्धी, ग्राम निर्माण कला, ग्राम आरोग्य, गोवंश सुधार, वेष वैभव, गरीबी श्रीमंती, श्रम संपत्ती, जीवनशिक्षण, महिलोन्नती, वैवाहिक जीवन, अंत्यसंस्कार, सणोत्सव, यात्रा मेळे, देव देवळे, मूर्तीउपासना, सामुदायिक प्रार्थना, प्रार्थना व विश्वधर्म, दलित सेवा, भजन प्रभाव, संत चमत्कार, संत स्वरूप, अवतारकार्य, प्रारब्धवाद, प्रयत्नवाद, जीवन कला, आत्मानुभव, ग्रामकुटुंब, भूवैकुंठ, ग्रंथाध्ययन, ग्रंथ महिमा!

साध्या सोप्या शब्दात रचलेली ग्रामगीता आपण याआधी कधी वाचली नसेल, तर तुकडोजी महाराजांच्या जयंतीहून दुसरे चांगले औचित्य ते काय?