शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दोन चमचे तूप, फायदे होतील खूप!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 3, 2021 13:24 IST

स्मरणशक्ती, बुद्धी, अग्नी, शुक्र, ओज, कफ, मेद यांचे वर्धन करणारे तूप सर्व स्नेहात उत्तम असून त्याचा रस आणि विपाक मधुर असल्याने ते सर्व गुणांनी युक्त असते. 

जाड व्यक्ती दिसली, की उपहासाने लोक म्हणतात, तूप जरा कमी खात जा. वास्तविक पाहता, जाडेपणाचा आणि तुपाचा दुरान्वये संबंध नाही. अर्थात अतिप्रमाणात सेवन केले, तर कोणतीही गोष्ट वाईटच! परंतु तूप हे शरीराला अपायकारक नसून उपायकारक आहे. थंडीत तर तूप खाणे 'मस्ट' आहे! एका श्लोकात वर्णन केलेले आहे, 

स्मृती, बुद्धी, अग्नी, शुक्र, ओझ: कफमेदोविवर्धनम सर्वंस्नेहोत्तमम शीतम मधुरं रसपाकयो: 

स्मरणशक्ती, बुद्धी, अग्नी, शुक्र, ओज, कफ, मेद यांचे वर्धन करणारे तूप सर्व स्नेहात उत्तम असून त्याचा रस आणि विपाक मधुर असल्याने ते सर्व गुणांनी युक्त असते. 

१. तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते.

२. रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही.

३. शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते.

४. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.

५. हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते.

६. गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदेशीर ठरतं.

७. उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं.

८. डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.

९. शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते. शुद्ध तुपाने चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं.

१०.तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे.

११. आहारात नियमित तुपाचे सेवन केले असता बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. 

१२. उचकी थांबत नसेल तर अर्धा चमचा गायीचे तूप खावे. 

१३. अर्धशिशीचा त्रास असणाऱ्यांनी नाकात गायीच्या तुपाचे २ थेंब टाकावेत. 

१४. मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटरमुळे शिणलेल्या डोळ्यांचा दिवसभराचा ताण घालवायचा असेल, तर रात्री झोपताना डोळ्यात दोन थेंब तूप टाका. 

१५ . तुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. 

१६. हाता-पायाची जळजळ होत असल्यास गायीच्या तुपाने, पायाच्या तळव्यांना मालिश केल्यास जळजळ कमी होण्यास मदत होते.

१७. मूत्रमार्गाशी संबंधित आजार असल्यास जेवणाआधी आणि जेवणानंतर दोन चमचे औषधी तूप खावे. 

१८. हे सर्व फायदे आपल्याप्रमाणे एखाद्या गरजवंताला देखील मिळावेत म्हणून शास्त्रात घृत दानाला अर्थात तुपाचे दान करण्याला महत्त्व दिले आहे. त्यानुसार सणासुदीला यथाशक्ती तुपाचे दान करावे अन्यथा साजूक तुपात केलेले पदार्थ दान करावेत.