शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

एका देवघरात दोन शंख ठेवू नये आणि ठेवायचे असल्यास शास्त्रदंडक असा आहे की... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:28 IST

शंखास अक्षता वाहू नये. फक्त गंधतुलसीपत्र किंवा गंधपुष्प अर्पण करावे. 

देवपूजेत शंख आणि घंटा असणे ही अत्यावश्यक बाब समजली जाते. काही ठिकाणी गव्याचे शिंगही ठेवले जाते. शंखोदकात औषधी गुणधर्म असतात. वास्तविक देवाच्या अंगावर समर्पण करावयाचे शंखोदक हे रात्रभर त्या शंखात ठेवलेले असावे. पण हा औषधी गुणधर्म सहसा लक्षात आलेला नसतो.

पूजा करण्यापूर्वी शंख धुवून, पुसून तो भरण्यात येतो व त्याची पूजा करून त्यात कलशोदक मिसळून ते पूजाद्रव्य व आपणावर शिंपडले जाते. नंतर देवाच्या मूर्तींना स्नान घालताना तो शंख पात्रात बुडवून कधीही पाणी त्यात भरू नये असा शास्त्रदंडक आहे. कारण त्यामुळे शंख बुडवलेले पाणी सुरापानाप्रमाणे ठरते. म्हणून शंखात पात्राने वरून पाणी घालून तो शंख भरावा व देवांना शंखोदक अर्पण करावे. 

देवांच्या मूर्तींमध्ये पंचायतनाची स्थापना असेल तर त्यातील बाणलिंगावर शंखोदक घालण्यास हरकत नाही. पण महादेवाची पिंड असेल तर तिला शंखोदकाने स्नान घालू नये. एकाच देवघरात दोन शंख ठेवू नयेत. पण उजवा शंख शंखोदकासाठी व डावा शंख ध्वनिसाठी ठेवायचा झाल्यास ते वेगळे व वेगवेगळ्या कोपऱ्यात ठेवावेत. शंखास अक्षता वाहू नये. फक्त गंधतुलसीपत्र किंवा गंधपुष्प अर्पण करावे. 

शंखाचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व: 

महाभारतात युद्धाचेवेळी भगवान श्री कृष्णाजवळ पांचजन्य शंख होता. तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचा मोठा असा शंख होता. युधिष्ठिराजवळ अनंतविजय, नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता. यापैकी एका शंखाचा आवाज करुन युद्धाची सुरुवात केली जायची. 

भारताच्या पुरातन इतिहास कालात शंख हे एक राष्ट्रीय नादवाद्य होते, मांगल्याचे प्रतीक होते. आपल्याकडील रत्नशास्त्रात फिक्कट गुलाबी रंगी गोलसर, स्वच्छ चकचकीत, सुंदर शंख हा रत्न मानतात. उजवा शंख व डावा शंख असे शंखात प्रकार आहेत. ते उजवीकडे व डावीकडे वळलेले असतात. उजवा शंख दुर्मिळ व पुण्यप्रद समजतात.