शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

एका देवघरात दोन शंख ठेवू नये आणि ठेवायचे असल्यास शास्त्रदंडक असा आहे की... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:28 IST

शंखास अक्षता वाहू नये. फक्त गंधतुलसीपत्र किंवा गंधपुष्प अर्पण करावे. 

देवपूजेत शंख आणि घंटा असणे ही अत्यावश्यक बाब समजली जाते. काही ठिकाणी गव्याचे शिंगही ठेवले जाते. शंखोदकात औषधी गुणधर्म असतात. वास्तविक देवाच्या अंगावर समर्पण करावयाचे शंखोदक हे रात्रभर त्या शंखात ठेवलेले असावे. पण हा औषधी गुणधर्म सहसा लक्षात आलेला नसतो.

पूजा करण्यापूर्वी शंख धुवून, पुसून तो भरण्यात येतो व त्याची पूजा करून त्यात कलशोदक मिसळून ते पूजाद्रव्य व आपणावर शिंपडले जाते. नंतर देवाच्या मूर्तींना स्नान घालताना तो शंख पात्रात बुडवून कधीही पाणी त्यात भरू नये असा शास्त्रदंडक आहे. कारण त्यामुळे शंख बुडवलेले पाणी सुरापानाप्रमाणे ठरते. म्हणून शंखात पात्राने वरून पाणी घालून तो शंख भरावा व देवांना शंखोदक अर्पण करावे. 

देवांच्या मूर्तींमध्ये पंचायतनाची स्थापना असेल तर त्यातील बाणलिंगावर शंखोदक घालण्यास हरकत नाही. पण महादेवाची पिंड असेल तर तिला शंखोदकाने स्नान घालू नये. एकाच देवघरात दोन शंख ठेवू नयेत. पण उजवा शंख शंखोदकासाठी व डावा शंख ध्वनिसाठी ठेवायचा झाल्यास ते वेगळे व वेगवेगळ्या कोपऱ्यात ठेवावेत. शंखास अक्षता वाहू नये. फक्त गंधतुलसीपत्र किंवा गंधपुष्प अर्पण करावे. 

शंखाचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व: 

महाभारतात युद्धाचेवेळी भगवान श्री कृष्णाजवळ पांचजन्य शंख होता. तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचा मोठा असा शंख होता. युधिष्ठिराजवळ अनंतविजय, नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता. यापैकी एका शंखाचा आवाज करुन युद्धाची सुरुवात केली जायची. 

भारताच्या पुरातन इतिहास कालात शंख हे एक राष्ट्रीय नादवाद्य होते, मांगल्याचे प्रतीक होते. आपल्याकडील रत्नशास्त्रात फिक्कट गुलाबी रंगी गोलसर, स्वच्छ चकचकीत, सुंदर शंख हा रत्न मानतात. उजवा शंख व डावा शंख असे शंखात प्रकार आहेत. ते उजवीकडे व डावीकडे वळलेले असतात. उजवा शंख दुर्मिळ व पुण्यप्रद समजतात.