शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

मनरुपी इंजिनाला भक्तीमार्गाकडे वळवा; इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 18:08 IST

इंजिना पाठोपाठ रेल्वेचे डबे धावतात. डब्याच्या पाठोपाठ इंजिन धावत नाही तसेच मनाच्या मागे इतर इंद्रिये धावत असतात मग या मनरुपी इंजिनालाच जर भक्तीमार्गाकडे वळविले तर प्रश्नच निर्माण होत नाही. इतर इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील..!

- ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

राघवाच्या अनंत पंथाकडे जाण्यासाठी मन जर भक्तीच्या मार्गाने तर श्रीहरी सहज प्राप्त होईल. भक्ती मार्गासाठी मनाचे सहाय्य नसले तर; कांहीही उपयोग नाही. मन हे सहावें इंद्रिय आहे. गीता माऊली म्हणते -

मनः षष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ।

इंजिना पाठोपाठ रेल्वेचे डबे धावतात. डब्याच्या पाठोपाठ इंजिन धावत नाही तसेच मनाच्या मागे इतर इंद्रिये धावत असतात मग या मनरुपी इंजिनालाच जर भक्तीमार्गाकडे वळविले तर प्रश्नच निर्माण होत नाही. इतर इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील पण सगळ्यात अवघड हेच आहे की - मन हे भक्तीमार्गाकडे सहज वळत नाही. दासगणू महाराज म्हणतात -

करुं कायी करुं कायी । मन हे ऐकत नाही ।बुद्धी कराया पुण्य जाय । परिमन खेचि अघडोही ॥

मन हे सगळ्यांत अवखळ इंद्रिय आहे. मन हे नाठाळ मुलासारखे आहे. मन हे अवखळ जनावरासारखे आहे. अवखळ जनावराला वठणीवर आणण्यासाठी त्याच्या गळ्यात जसे लोढणे घालतात तसे मनाला लोढणे हवे आहे. बहिणाबाई चौधरी एका काव्यात बहारीचे वर्णन करतात -

मन वढाय वढाय । उभ्या पिकातलं ढोरं ।किती हाकला हाकला । पुन्हा येते पिकावर ॥

नामस्मरणामध्ये, भक्तिमार्गामध्ये कितीही अवीट गोडी असली तरी विषयाच्या ध्यासाने वेडे झालेले मन, मनुष्य देहाला येण्यापूर्वी फक्त विषय सुखाचीच गोडी अनुभवलेली असल्यामुळे या ही जन्मांत पुन्हा विषयांकडेच धाव घेते.तुकाराम महाराज देखील म्हणतात -

काय करुं आता या मना । न सांडी विषय वासना ॥प्रार्थिता राही राहेना । आदरे पतना नेऊ पाहे ॥आता धावे धावे गा श्रीहरी । गेलो वाया नाही तरी ॥न दिसे कोणी आवटी । आणिक दुजा तयासी ॥

मन विषयाचेच चिंतन करीत असल्यामुळे ते विषयासक्त झालेले असते. खरं तर मन इंद्रियांच्या आधीन होऊन बुद्धीचा दरवाजा झाकते आणि बुद्धीच नष्ट झाल्यामुळे -

बुद्धी नाशात् प्रणश्यति ।

सर्वनाश होतो म्हणून तर श्रीसमर्थ रामदास स्वामी मनांच्या दुसर्‍याच श्लोकांत या मनालाच उपदेश करतात की - बा मना.! तूं भक्तीच्याच मार्गाने जा..!

मना सज्जना भक्तीपंथेचि जावे ।तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी ८७ ९३ ०३ ०३ ०३. )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक