शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मनरुपी इंजिनाला भक्तीमार्गाकडे वळवा; इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 18:08 IST

इंजिना पाठोपाठ रेल्वेचे डबे धावतात. डब्याच्या पाठोपाठ इंजिन धावत नाही तसेच मनाच्या मागे इतर इंद्रिये धावत असतात मग या मनरुपी इंजिनालाच जर भक्तीमार्गाकडे वळविले तर प्रश्नच निर्माण होत नाही. इतर इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील..!

- ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

राघवाच्या अनंत पंथाकडे जाण्यासाठी मन जर भक्तीच्या मार्गाने तर श्रीहरी सहज प्राप्त होईल. भक्ती मार्गासाठी मनाचे सहाय्य नसले तर; कांहीही उपयोग नाही. मन हे सहावें इंद्रिय आहे. गीता माऊली म्हणते -

मनः षष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ।

इंजिना पाठोपाठ रेल्वेचे डबे धावतात. डब्याच्या पाठोपाठ इंजिन धावत नाही तसेच मनाच्या मागे इतर इंद्रिये धावत असतात मग या मनरुपी इंजिनालाच जर भक्तीमार्गाकडे वळविले तर प्रश्नच निर्माण होत नाही. इतर इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील पण सगळ्यात अवघड हेच आहे की - मन हे भक्तीमार्गाकडे सहज वळत नाही. दासगणू महाराज म्हणतात -

करुं कायी करुं कायी । मन हे ऐकत नाही ।बुद्धी कराया पुण्य जाय । परिमन खेचि अघडोही ॥

मन हे सगळ्यांत अवखळ इंद्रिय आहे. मन हे नाठाळ मुलासारखे आहे. मन हे अवखळ जनावरासारखे आहे. अवखळ जनावराला वठणीवर आणण्यासाठी त्याच्या गळ्यात जसे लोढणे घालतात तसे मनाला लोढणे हवे आहे. बहिणाबाई चौधरी एका काव्यात बहारीचे वर्णन करतात -

मन वढाय वढाय । उभ्या पिकातलं ढोरं ।किती हाकला हाकला । पुन्हा येते पिकावर ॥

नामस्मरणामध्ये, भक्तिमार्गामध्ये कितीही अवीट गोडी असली तरी विषयाच्या ध्यासाने वेडे झालेले मन, मनुष्य देहाला येण्यापूर्वी फक्त विषय सुखाचीच गोडी अनुभवलेली असल्यामुळे या ही जन्मांत पुन्हा विषयांकडेच धाव घेते.तुकाराम महाराज देखील म्हणतात -

काय करुं आता या मना । न सांडी विषय वासना ॥प्रार्थिता राही राहेना । आदरे पतना नेऊ पाहे ॥आता धावे धावे गा श्रीहरी । गेलो वाया नाही तरी ॥न दिसे कोणी आवटी । आणिक दुजा तयासी ॥

मन विषयाचेच चिंतन करीत असल्यामुळे ते विषयासक्त झालेले असते. खरं तर मन इंद्रियांच्या आधीन होऊन बुद्धीचा दरवाजा झाकते आणि बुद्धीच नष्ट झाल्यामुळे -

बुद्धी नाशात् प्रणश्यति ।

सर्वनाश होतो म्हणून तर श्रीसमर्थ रामदास स्वामी मनांच्या दुसर्‍याच श्लोकांत या मनालाच उपदेश करतात की - बा मना.! तूं भक्तीच्याच मार्गाने जा..!

मना सज्जना भक्तीपंथेचि जावे ।तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी ८७ ९३ ०३ ०३ ०३. )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक