शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मनरुपी इंजिनाला भक्तीमार्गाकडे वळवा; इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 18:08 IST

इंजिना पाठोपाठ रेल्वेचे डबे धावतात. डब्याच्या पाठोपाठ इंजिन धावत नाही तसेच मनाच्या मागे इतर इंद्रिये धावत असतात मग या मनरुपी इंजिनालाच जर भक्तीमार्गाकडे वळविले तर प्रश्नच निर्माण होत नाही. इतर इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील..!

- ह.भ.प. ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

राघवाच्या अनंत पंथाकडे जाण्यासाठी मन जर भक्तीच्या मार्गाने तर श्रीहरी सहज प्राप्त होईल. भक्ती मार्गासाठी मनाचे सहाय्य नसले तर; कांहीही उपयोग नाही. मन हे सहावें इंद्रिय आहे. गीता माऊली म्हणते -

मनः षष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ।

इंजिना पाठोपाठ रेल्वेचे डबे धावतात. डब्याच्या पाठोपाठ इंजिन धावत नाही तसेच मनाच्या मागे इतर इंद्रिये धावत असतात मग या मनरुपी इंजिनालाच जर भक्तीमार्गाकडे वळविले तर प्रश्नच निर्माण होत नाही. इतर इंद्रिये आपोआप त्या मार्गाने जातील पण सगळ्यात अवघड हेच आहे की - मन हे भक्तीमार्गाकडे सहज वळत नाही. दासगणू महाराज म्हणतात -

करुं कायी करुं कायी । मन हे ऐकत नाही ।बुद्धी कराया पुण्य जाय । परिमन खेचि अघडोही ॥

मन हे सगळ्यांत अवखळ इंद्रिय आहे. मन हे नाठाळ मुलासारखे आहे. मन हे अवखळ जनावरासारखे आहे. अवखळ जनावराला वठणीवर आणण्यासाठी त्याच्या गळ्यात जसे लोढणे घालतात तसे मनाला लोढणे हवे आहे. बहिणाबाई चौधरी एका काव्यात बहारीचे वर्णन करतात -

मन वढाय वढाय । उभ्या पिकातलं ढोरं ।किती हाकला हाकला । पुन्हा येते पिकावर ॥

नामस्मरणामध्ये, भक्तिमार्गामध्ये कितीही अवीट गोडी असली तरी विषयाच्या ध्यासाने वेडे झालेले मन, मनुष्य देहाला येण्यापूर्वी फक्त विषय सुखाचीच गोडी अनुभवलेली असल्यामुळे या ही जन्मांत पुन्हा विषयांकडेच धाव घेते.तुकाराम महाराज देखील म्हणतात -

काय करुं आता या मना । न सांडी विषय वासना ॥प्रार्थिता राही राहेना । आदरे पतना नेऊ पाहे ॥आता धावे धावे गा श्रीहरी । गेलो वाया नाही तरी ॥न दिसे कोणी आवटी । आणिक दुजा तयासी ॥

मन विषयाचेच चिंतन करीत असल्यामुळे ते विषयासक्त झालेले असते. खरं तर मन इंद्रियांच्या आधीन होऊन बुद्धीचा दरवाजा झाकते आणि बुद्धीच नष्ट झाल्यामुळे -

बुद्धी नाशात् प्रणश्यति ।

सर्वनाश होतो म्हणून तर श्रीसमर्थ रामदास स्वामी मनांच्या दुसर्‍याच श्लोकांत या मनालाच उपदेश करतात की - बा मना.! तूं भक्तीच्याच मार्गाने जा..!

मना सज्जना भक्तीपंथेचि जावे ।तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ।

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी ८७ ९३ ०३ ०३ ०३. )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक