शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान चालिसाचे रचेते तुलसीदास आणि बादशहा अकबर ही दोन नावे एकत्र येण्यामागे आहे एक गोष्ट; जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 13:54 IST

हनुमान चालीसा हे देशभरच काय तर जगभर सर्वाधिक म्हटले जाणारे हनुमान स्तोत्र आहे, त्याच्या निर्मितीची रंजक कथादेखील जाणून घ्या!

समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेले मारुती स्तोत्र आणि संत तुलसी दासांनी लिहिलेले हनुमान चालीसा हे स्तोत्र आपण हनुमंताच्या उपासनेसाठी वापरतो. समर्थांनी बलोपासनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी गावोगावी हनुमंताची मंदिरे उभारली, व्यायामशाळा सुरु केल्या आणि तरुणांना स्फूर्ती चढावी म्हणून हनुमंताचे स्तोत्राची रचना केली, हे आपण जाणतोच, मग हनुमान चालीसा स्तोत्र निर्मितीमागेही काही कथा आहे का? ते आपण जाणून घेऊ! ती कथा सांगत आहेत लेखक राहुल करूरकर!

जय हनुमान ज्ञान गुण सागर। जय कपिसतिहु लोक उजागर ॥रामदुत अतुलित बल धामा । अंजनीपुत्र पवनसुत नामा ॥

तुलसीदासांच्या आयुष्यात त्यांच्या साधनेतुन प्रभु श्रीराम व हनुमानाने बऱ्याचदा दर्शन दिले. अकबराने तुलसीदासजींवर मलाही रामाचे दर्शन घडवून द्या म्हणुन मागणी टाकली. अर्थात तुलसीदासजी म्हणाले की रामाची खरी भक्ती केल्याशिवाय दर्शन होणे शक्य नाही. मग अकबराने रागात तुलसीदासजींना तुरुंगात डांबले. तिथे तुरुंगात तुलसीदासांनी हनुमान चालीसा लिहीली. त्या चालीसेतील शेवटची ओळ जशी रचली गेली तसे संपुर्ण दिल्ली शहरात वानरांनी धुडगुस घालायला सुरवात केली. प्रकरण हाताबाहेर जातंय पाहुन शेवटी अकबरास लोकांनी सांगितले की हा हनुमानाचा कोप दिसतोय व नंतर त्याने तुलसीदासांना सोडवले. व तुलसीदासांना वानरांना शांत करण्याची विनंती केली.  तर अशी रचली गेली हनुमान चालिसा. 

हनुमान हे शक्ती सामर्थ्य बुद्धि चे प्रतिक आहे. अहिंसेचे व्रत अंगिकारण्यापूर्वी बलोपासना आवश्यक आहे. कारण क्षीण मनुष्याचे अहींसेचे व्रत हे दुर्बलतेचे लक्षण असु शकते. यामुळे तुम्हाला शांती प्रस्थापित करायची असेल तरीही हनुमानाची साधना आवश्यकच आहे. 

विवेकानंदांचे यावर भाष्य फार खोलवर विचार करायला लावणारे आहे. जेव्हा शिष्याने विचारले की मला शांती मिळत नाहीये (I am not able to find peace) काय करु? तेव्हा विवेकानंदांनी स्पष्ट शब्दात सांगितले की search for strength, seek strength & you will find peace. शक्तीचा शोध घे, शक्तीची साधना तुला शांती मिळवून देईल. या शक्तीचे साक्षात रुप असलेल्या हनुमानाची आपल्यावर सदैव कृपा असो!