शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम महाराज या अभंगात विठोबाची निंदा करत आहेत की स्तुती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 17:44 IST

या अभंगात तुकाराम महाराजांनी निंदा करण्याच्या निमित्ताने पांडुरंगाचे गुणच वर्णन केले आहेत. तू पतितपावन आहेस, तू कृपानिधी आहेस, तू परिस आहेस, तू कल्पतरु आहेस असे नुसते म्हणून विनोदाने रंजक विधान नसते झाले. इते भक्ताची शरणता लक्षांश आहे व प्रभूची भक्ताबद्दलची अपेक्षाही लक्ष्यांश आहे. अशी गमतीची भाषा तुकाराम महाराजच करू शकतात, कारण सलगीचे नाते त्यांनीच साधलेले होते. 

माय-लेकाचे, बाप-लेकीचे, दोन मित्रांचे, दोन मैत्रिणींचे किंवा सख्या शेजाऱ्यांचे एकमेकांशी असलेले अतूट नाते पाहताना, ते नेमके कोणत्या धाग्याने जोडले गेले आहेत, हे सांगणे अवघड असते. प्रेम हा प्रत्येक नात्याचा पाया असला, तरी नात्यांमधील प्रेमाचे स्वरूप वेगवेगळे असते. जिव्हाळ्याचे विषय वेगवेगळे असतात. या नात्यांमध्ये कधी वादविवाद तर कधी दुराव्याचे प्रसंगही ओढावतात, परंतु नाते तुटत नाही, दुरावत नाही. ते लाडिक किंवा प्रासंगिक भांडण असते. मनातले मळभ दूर झाले, की नात्यात पुन्हा पूर्वीइतकीच पारदर्शकता येते. असेच एक नाते आहे, भक्त आणि भगवंताचे. ते दोघेही परस्परपुरक आहेत. भक्ताशिवाय भगवंताला आणि भगवंताशिवाय भक्ताला ओळख मिळणे कठीण. याच नात्याचा उमाळा येऊन संत तुकाराम महाराज वर्णन करतात,

हेही वाचा : आपणच काय, तर संतदेखील करत असत देवाशी भांडण!

जरी मी नव्हतो पतित, तरी तू पावन कैचा येथ।म्हणोनि माझे नाव आधी, मग तू पावन कृपानिधी।लाहो महिमान परिसा, नाही तरी दगड कैसा ।तुका म्हणे याचक भावे, कल्पतरु मान पावे।

शिष्याशिवाय गुरु नाही, श्रोत्याशिवाय वक्ता नाही व पापी माणसांशिवाय उद्धारकर्ता नाही. जर कोणी पतित नसेल, पापी नसेल, जर कोणी दीन नसेल तर पावन, उद्धारकर्ता कसा असणार? खरोखर याचकच नसला, दान घेणाराच नसला तर दातृत्वगुण कसा प्रकट होणार? तेव्हा भगवंताचे जे काही गुण आहेत ते भक्तांच्यामुळे प्रकट होतात. महाराज म्हणतात, देवा, पतितपावन हे जे तुझे नाव आहे त्यात पतिताचे नाव प्रथम, माझे नाव प्रथम येते व मगच तुझे नाव येते. मी जर पतित नसतो तर तुला काय किंमत असती? परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, पण लोखंडच नसेल तर परिसाचा गुण कसा व्यक्त होणार? तो नुसता दगडच म्हटला गेला असता? कल्पतरु म्हणे कल्पना करावी, मागावे त्या प्रमाणे इच्छा पूर्ण करतो. पण मागणारा नसेल, तर ते एक नुसते इतर झाडांसारखे झाडच म्हटले असते.

या अभंगात तुकाराम महाराजांनी निंदा करण्याच्या निमित्ताने पांडुरंगाचे गुणच वर्णन केले आहेत. तू पतितपावन आहेस, तू कृपानिधी आहेस, तू परिस आहेस, तू कल्पतरु आहेस असे नुसते म्हणून विनोदाने रंजक विधान नसते झाले. इते भक्ताची शरणता लक्षांश आहे व प्रभूची भक्ताबद्दलची अपेक्षाही लक्ष्यांश आहे. अशी गमतीची भाषा तुकाराम महाराजच करू शकतात, कारण सलगीचे नाते त्यांनीच साधलेले होते. 

अशाप्रकारे कोणा एकाशिवाय दुसऱ्याला परिपूर्णता येणे कठीण असते. म्हणून प्रत्येक नात्याची किंमत ओळखून नात्यांचा आदर करावा. त्या नात्यांच्या ठायी असलेले निष्काम प्रेम भगवंतावरील प्रेमाचेच प्रतिक असते. अशी नाती मिळणे दुर्मिळ बाब आहे. नात्यांच अनमोल ठेवा जपून ठेवा आणि दुसऱ्यांबरोबर आपल्याही आयुष्याला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा : लागली समाधी ज्ञानेशाची; इंद्रायणी काठी आळंदी यात्रेचे ७२४ वे वर्ष!