शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तुकाराम महाराज या अभंगात विठोबाची निंदा करत आहेत की स्तुती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 17:44 IST

या अभंगात तुकाराम महाराजांनी निंदा करण्याच्या निमित्ताने पांडुरंगाचे गुणच वर्णन केले आहेत. तू पतितपावन आहेस, तू कृपानिधी आहेस, तू परिस आहेस, तू कल्पतरु आहेस असे नुसते म्हणून विनोदाने रंजक विधान नसते झाले. इते भक्ताची शरणता लक्षांश आहे व प्रभूची भक्ताबद्दलची अपेक्षाही लक्ष्यांश आहे. अशी गमतीची भाषा तुकाराम महाराजच करू शकतात, कारण सलगीचे नाते त्यांनीच साधलेले होते. 

माय-लेकाचे, बाप-लेकीचे, दोन मित्रांचे, दोन मैत्रिणींचे किंवा सख्या शेजाऱ्यांचे एकमेकांशी असलेले अतूट नाते पाहताना, ते नेमके कोणत्या धाग्याने जोडले गेले आहेत, हे सांगणे अवघड असते. प्रेम हा प्रत्येक नात्याचा पाया असला, तरी नात्यांमधील प्रेमाचे स्वरूप वेगवेगळे असते. जिव्हाळ्याचे विषय वेगवेगळे असतात. या नात्यांमध्ये कधी वादविवाद तर कधी दुराव्याचे प्रसंगही ओढावतात, परंतु नाते तुटत नाही, दुरावत नाही. ते लाडिक किंवा प्रासंगिक भांडण असते. मनातले मळभ दूर झाले, की नात्यात पुन्हा पूर्वीइतकीच पारदर्शकता येते. असेच एक नाते आहे, भक्त आणि भगवंताचे. ते दोघेही परस्परपुरक आहेत. भक्ताशिवाय भगवंताला आणि भगवंताशिवाय भक्ताला ओळख मिळणे कठीण. याच नात्याचा उमाळा येऊन संत तुकाराम महाराज वर्णन करतात,

हेही वाचा : आपणच काय, तर संतदेखील करत असत देवाशी भांडण!

जरी मी नव्हतो पतित, तरी तू पावन कैचा येथ।म्हणोनि माझे नाव आधी, मग तू पावन कृपानिधी।लाहो महिमान परिसा, नाही तरी दगड कैसा ।तुका म्हणे याचक भावे, कल्पतरु मान पावे।

शिष्याशिवाय गुरु नाही, श्रोत्याशिवाय वक्ता नाही व पापी माणसांशिवाय उद्धारकर्ता नाही. जर कोणी पतित नसेल, पापी नसेल, जर कोणी दीन नसेल तर पावन, उद्धारकर्ता कसा असणार? खरोखर याचकच नसला, दान घेणाराच नसला तर दातृत्वगुण कसा प्रकट होणार? तेव्हा भगवंताचे जे काही गुण आहेत ते भक्तांच्यामुळे प्रकट होतात. महाराज म्हणतात, देवा, पतितपावन हे जे तुझे नाव आहे त्यात पतिताचे नाव प्रथम, माझे नाव प्रथम येते व मगच तुझे नाव येते. मी जर पतित नसतो तर तुला काय किंमत असती? परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, पण लोखंडच नसेल तर परिसाचा गुण कसा व्यक्त होणार? तो नुसता दगडच म्हटला गेला असता? कल्पतरु म्हणे कल्पना करावी, मागावे त्या प्रमाणे इच्छा पूर्ण करतो. पण मागणारा नसेल, तर ते एक नुसते इतर झाडांसारखे झाडच म्हटले असते.

या अभंगात तुकाराम महाराजांनी निंदा करण्याच्या निमित्ताने पांडुरंगाचे गुणच वर्णन केले आहेत. तू पतितपावन आहेस, तू कृपानिधी आहेस, तू परिस आहेस, तू कल्पतरु आहेस असे नुसते म्हणून विनोदाने रंजक विधान नसते झाले. इते भक्ताची शरणता लक्षांश आहे व प्रभूची भक्ताबद्दलची अपेक्षाही लक्ष्यांश आहे. अशी गमतीची भाषा तुकाराम महाराजच करू शकतात, कारण सलगीचे नाते त्यांनीच साधलेले होते. 

अशाप्रकारे कोणा एकाशिवाय दुसऱ्याला परिपूर्णता येणे कठीण असते. म्हणून प्रत्येक नात्याची किंमत ओळखून नात्यांचा आदर करावा. त्या नात्यांच्या ठायी असलेले निष्काम प्रेम भगवंतावरील प्रेमाचेच प्रतिक असते. अशी नाती मिळणे दुर्मिळ बाब आहे. नात्यांच अनमोल ठेवा जपून ठेवा आणि दुसऱ्यांबरोबर आपल्याही आयुष्याला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा : लागली समाधी ज्ञानेशाची; इंद्रायणी काठी आळंदी यात्रेचे ७२४ वे वर्ष!