शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

पोथ्यापुराणातला देवधर्म सोप्या भाषेत सांगणारे तुकोबा राय, यांची आज तुकाराम बीज!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 30, 2021 12:34 IST

तुकोबांनी समाजातले ढोंगी गुरुपण, अडाणी क्रूर देवभक्ती आणि मूर्ख समजुती यांच्या दावणीतून लोकांना सोडवून साध्या, सोप्या व शुद्ध भक्तीने स्वत:चा उद्धार कसा करता येतो, हे स्वत:च्या उदाहरणावरून समाजाला दाखवून दिले.

ज्योत्स्ना गाडगीळ 

संत तुकाराम बीज अर्थात तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले तो आजचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीया ही आजची तिथी. द्वितीयेलाच बीजेची तिथी असेही म्हणतात. फाल्गुन मासातील ही तिथी तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाने पावन झाली, म्हणून दरवर्षी 'तुकाराम बीज' ही महाराजांचा पुण्यतिथीचा दिवसही सोहळ्याप्रमाणे साजरा केला जातो. कारण, महाराज देहाने गेले तरी परमार्थाचे 'बीज' जनात रोवून गेले. 

इंद्रायणीच्या काठी एका सुखवस्तू घरात जन्माला आलेले तुकाराम आंबिले. तीन भावांमध्ये तुकोबा मधले. थोरला भाऊ विरक्त. घर संसार व्यवस्थित असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. आई वडील गेले. थोरल्या भावाची बायको गेली. तुकोबांची नेहमी आजारी असणारी बायको रखमाबाई गेली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. या आघातात सर्व सामान्य माणसे खचून जातात, देहत्याग करतात. पण तुकोबा हरिचिंतनात मग्न झाले. त्यांनी स्वत: विठोबा पाहिला आणि आपल्या अभंगातून हरिकीर्तनातून लोकांना दाखवला. चारचौघांप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला येऊनही तुकोबांनी संकटातून मार्ग काढण्याचा, हरिनामात रंगून जाण्याचा, पाखंडांचे खंडण आणि धर्माचे रक्षण करण्याचा मार्ग दाखवला. 

तुकोबांनी समाजातले ढोंगी गुरुपण, अडाणी क्रूर देवभक्ती आणि मूर्ख समजुती यांच्या दावणीतून लोकांना सोडवून साध्या, सोप्या व शुद्ध भक्तीने स्वत:चा उद्धार कसा करता येतो, हे स्वत:च्या उदाहरणावरून समाजाला दाखवून दिले. समाजाला धर्म शिकवण्याआधी तुकोबा धर्ममय झाले. भागवतधर्माची ध्वजा पुन्हा वर चढू लागली. पोथ्यापुराणातला देवधर्म संस्कृत भाषेत अडकला होता, तो त्यांनी सोपा करून सांगितला. शुद्ध प्रेमाने उच्चारलेल्या विठ्ठलनामात वेदाचे सार आणि ब्रह्मविद्येचा साक्षात्कार होऊ शकतो, हे लोकांना पटवून दिले.

मऊ मेणाहून हृदयाचे तुकोबा खोट्या धर्मबाजीवर कडक शब्दांचे आसूड ओढत. वाद जिंकण्यापेक्षा ते मने जिंकीत असत. समाजाकडून मिळालेले कटू अनुभवांचे हलाहल पचवून जगाला सद्विचारांचे अमृत उपलब्ध करून देणारे तुकोबा जणू महादेवाचा अवतारच!

तुकोबा हेदेखील संतवृत्तीचे तत्कालीन समाजसुधारकच! ते म्हणत, 

आम्ही वैकुंठीचे वासी, आलो याचि कारणासी,बोलले जे ऋषी, साच भावे वर्तावया।

भजन कीर्तनातून तुकोबांनी केलेली सामाजिक चळवळ एवढी प्रभावी ठरली, की सामुदायिक भक्तीला पूर आला.महाराष्ट्रात शिवशक्ती जागृत झाली. टाळमृदंगात रणवाद्यांचे सामर्थ्य आले. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनाही प्रेरणा मिळाली. अजगराप्रमाणे सुस्त पडलेल्या समाजातून जाणता राजा निर्माण झाला आणि त्यांनी स्वराज्य स्थापन करून धर्माची पताका उंचावली. 

अशा तुकाराम महाराजांचे चरित्र म्हणजे म्हणजे प्रपंचाकडून परमार्थाकडे नेणारा सुंदर प्रवास. असे प्रेरणादायी चरित्र आपणही वाचावे आणि त्यांनी आखून दिलेल्या सन्मार्गावर प्रवास करावा. जेणेकरून 'आनंदाचे डोही आनंद तरंग' उमटल्यावाचून राहणार नाही...!