शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पोथ्यापुराणातला देवधर्म सोप्या भाषेत सांगणारे तुकोबा राय, यांची आज तुकाराम बीज!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 30, 2021 12:34 IST

तुकोबांनी समाजातले ढोंगी गुरुपण, अडाणी क्रूर देवभक्ती आणि मूर्ख समजुती यांच्या दावणीतून लोकांना सोडवून साध्या, सोप्या व शुद्ध भक्तीने स्वत:चा उद्धार कसा करता येतो, हे स्वत:च्या उदाहरणावरून समाजाला दाखवून दिले.

ज्योत्स्ना गाडगीळ 

संत तुकाराम बीज अर्थात तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले तो आजचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीया ही आजची तिथी. द्वितीयेलाच बीजेची तिथी असेही म्हणतात. फाल्गुन मासातील ही तिथी तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाने पावन झाली, म्हणून दरवर्षी 'तुकाराम बीज' ही महाराजांचा पुण्यतिथीचा दिवसही सोहळ्याप्रमाणे साजरा केला जातो. कारण, महाराज देहाने गेले तरी परमार्थाचे 'बीज' जनात रोवून गेले. 

इंद्रायणीच्या काठी एका सुखवस्तू घरात जन्माला आलेले तुकाराम आंबिले. तीन भावांमध्ये तुकोबा मधले. थोरला भाऊ विरक्त. घर संसार व्यवस्थित असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. आई वडील गेले. थोरल्या भावाची बायको गेली. तुकोबांची नेहमी आजारी असणारी बायको रखमाबाई गेली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. या आघातात सर्व सामान्य माणसे खचून जातात, देहत्याग करतात. पण तुकोबा हरिचिंतनात मग्न झाले. त्यांनी स्वत: विठोबा पाहिला आणि आपल्या अभंगातून हरिकीर्तनातून लोकांना दाखवला. चारचौघांप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला येऊनही तुकोबांनी संकटातून मार्ग काढण्याचा, हरिनामात रंगून जाण्याचा, पाखंडांचे खंडण आणि धर्माचे रक्षण करण्याचा मार्ग दाखवला. 

तुकोबांनी समाजातले ढोंगी गुरुपण, अडाणी क्रूर देवभक्ती आणि मूर्ख समजुती यांच्या दावणीतून लोकांना सोडवून साध्या, सोप्या व शुद्ध भक्तीने स्वत:चा उद्धार कसा करता येतो, हे स्वत:च्या उदाहरणावरून समाजाला दाखवून दिले. समाजाला धर्म शिकवण्याआधी तुकोबा धर्ममय झाले. भागवतधर्माची ध्वजा पुन्हा वर चढू लागली. पोथ्यापुराणातला देवधर्म संस्कृत भाषेत अडकला होता, तो त्यांनी सोपा करून सांगितला. शुद्ध प्रेमाने उच्चारलेल्या विठ्ठलनामात वेदाचे सार आणि ब्रह्मविद्येचा साक्षात्कार होऊ शकतो, हे लोकांना पटवून दिले.

मऊ मेणाहून हृदयाचे तुकोबा खोट्या धर्मबाजीवर कडक शब्दांचे आसूड ओढत. वाद जिंकण्यापेक्षा ते मने जिंकीत असत. समाजाकडून मिळालेले कटू अनुभवांचे हलाहल पचवून जगाला सद्विचारांचे अमृत उपलब्ध करून देणारे तुकोबा जणू महादेवाचा अवतारच!

तुकोबा हेदेखील संतवृत्तीचे तत्कालीन समाजसुधारकच! ते म्हणत, 

आम्ही वैकुंठीचे वासी, आलो याचि कारणासी,बोलले जे ऋषी, साच भावे वर्तावया।

भजन कीर्तनातून तुकोबांनी केलेली सामाजिक चळवळ एवढी प्रभावी ठरली, की सामुदायिक भक्तीला पूर आला.महाराष्ट्रात शिवशक्ती जागृत झाली. टाळमृदंगात रणवाद्यांचे सामर्थ्य आले. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनाही प्रेरणा मिळाली. अजगराप्रमाणे सुस्त पडलेल्या समाजातून जाणता राजा निर्माण झाला आणि त्यांनी स्वराज्य स्थापन करून धर्माची पताका उंचावली. 

अशा तुकाराम महाराजांचे चरित्र म्हणजे म्हणजे प्रपंचाकडून परमार्थाकडे नेणारा सुंदर प्रवास. असे प्रेरणादायी चरित्र आपणही वाचावे आणि त्यांनी आखून दिलेल्या सन्मार्गावर प्रवास करावा. जेणेकरून 'आनंदाचे डोही आनंद तरंग' उमटल्यावाचून राहणार नाही...!