शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शांत झोपेसाठी दिशा बदलून पाहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 22:43 IST

अनेक जण तर रात्रीचे जागरण होणार, या कल्पनेने एवढे धास्तावतात, की त्यांना रात्रच नकोशी वाटते. या सर्वांवर वास्तु शास्त्रात सोपा उपाय आहे.

ठळक मुद्देझोपण्याची दिशा बदलून पहा.झोपण्याआधी तासभर मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर पाहू नका.परमेश्वराचे नाव घेऊन, एखादा श्लोक म्हणून किंवा ऐकून मगच झोपा.

आपल्या रात्रीच्या झोपेवर संपूर्ण दिवस अवलंबून असतो. झोप नीट झाली नाही, की दिवसभर थकवा जाणवतो, चिडचिड होते आणि कोणत्याही विषयात लक्ष लागत नाही. म्हणून झोप ही आपल्या शारीरिक, मानसिक स्वाथ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते. 

मऊ गाद्या, जाड पांघरूण, वातानुकुलित खोली, अशा सगळ्या सोयीसुविधा असूनही अनेकांना रात्रीची झोप लागत नाही. पूर्ण रात्र छताकडे बघण्यात, मोबाईल बघण्यात आणि वारंवार कूस बदण्यात काढावी लागते. तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना झोप न लागण्याची समस्या जास्त सतावते. अनेक जण तर रात्रीचे जागरण होणार, या कल्पनेने एवढे धास्तावतात, की त्यांना रात्रच नकोशी वाटते. या सर्वांवर वास्तु शास्त्रात सोपा उपाय, म्हणजे झोपण्याची दिशा बदलून पहा. त्याचा नक्कीच लाभ होईल.

तुमचे अंथरुण कोणत्या दिशेने टाकता, यावर तुमची झोप अवलंबून आहे. म्हणून वास्तुशास्त्रात मन:शांतीसाठी उपाय विचारले असता, सर्वप्रथम शयनगृहाची मांडणी तपासली जाते. त्यानुसार उपाय सुचवले जातात. तुम्हीही तुमची झोपण्याची स्थिती आणि दिशा पुढील माहितीनुसार तपासून पहा.

१. नेहमी झोपताना डोक्याची बाजू पूर्वेला किंवा दक्षिणेला करा. तुम्ही, जर उत्तर किंवा पश्चिम दिशेला डोक्याची बाजू ठेवून झोपत असाल, तर सर्वप्रथम ती चूक टाळा. वाईट स्वप्न, निद्रानाश, अतिविचार इ. दुष्परिणाम टाळता येतील. 

हेही वाचा: संस्कृतीचं, मांगल्याचं प्रतीक आहे 'स्वस्तिक'; सकारात्मक ऊर्जा देणारं शुभचिन्ह

२. ज्येष्ठ नागरिकांनी नैऋत्य-वायव्य दिशेने झोपावे. अर्थात नैऋत्य दिशेला डोक्याची व वायव्य दिशेला पायाची बाजू आली पाहिजे. ज्येष्ठांना उतारवयात झोप कमी लागते. परंतु, झोपेची दिशा बदलून पाहिली, तर थोड्या वेळापुरती का होईना, पण शांत झोप लागू शकते.

३. अविवाहित मुलींनी वायव्य-अग्नेय अशी झोपताना स्थिती ठेवावी. डोक्याची बाजू वायव्य दिशेला आणि पाय अग्नेय दिशेला केले असता, त्यांचे चित्त स्थिर होऊन शांत झोप लागते. याउलट  नैऋत्य-ईशान्य दिशेने झोपले असता, मनाची चलबिचल वाढून निद्रानाश होतो, असा अनेकांना अनुभव आहे.

शांत झोप लागावी, म्हणून औषधोपचारांपासून ध्यानधारणेपर्यंत सर्वकाही उपाय करतो. त्याच उपायात ही भर घालून पहा. हे विनाखर्चिक उपाय गुणकारी ठरले, तर त्याचा परिणाम तुमच्या तना-मनावर आणि कुटुंबावर निश्चित दिसून येईल. 

या सर्व उपायांबरोबर आणखी एक दोन गोष्टी करायला विसरू नका. एक म्हणजे, झोपण्याआधी आणि झोपून उठल्यावर तासभर मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर पाहू नका. म्हणजे विचारचक्राचा वेग नियंत्रित राहिल. तसेच, दुसरा उपाय म्हणजे, परमेश्वराचे नाव घेऊन, एखादा श्लोक म्हणून किंवा ऐकून मगच झोपा. म्हणजे इतर विचारांची दारे आपोआप बंद होतील. सहज-सोपे उपाय मोठा बदल घडवतील.

(ही माहिती वेगवेगळ्या स्रोतांमधून जमा केली आहे. अधिक माहितीसाठी वास्तुशास्त्र अभ्यासकांचा सल्ला घ्यावा.)

हेही वाचा: Adhik  Maas 2020: दारात तुळशी वृंदावन लावा, लक्ष्मीसोबत लक्ष्मीपतीही येतील!